शिवाजी महाराज निबंध मराठी Shivaji Maharaj Essay in Marathi

Shivaji Maharaj Essay in Marathi – Shivaji Maharaj Nibandh Marathi शिवाजी महाराज निबंध मराठी मित्रांनो, आपल्या सर्वांचा महाराष्ट्राचा लाडका राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजा. छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्य स्थापन करणारे एक कर्तृत्ववान युगपुरुष होते. शून्यातून निर्माण केलेले हे स्वराज्य त्यांनी त्यांच्या स्वतःच्या हिमतीवर आणि स्वतःच्या बुद्धी चातुर्यावर उभे केले आहे. शिवाय, शिवाजी महाराज हे स्वराज्य स्थापन करून त्याचा कारभार करण्यात यशस्वी ठरलेले महाराष्ट्राचे पहिले छत्रपती आहेत.

shivaji maharaj essay in marathi

शिवाजी महाराज निबंध मराठी – Shivaji Maharaj Essay in Marathi

Shivaji maharaj nibandh marathi, जन्म आणि बालपण.

जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर मासाहेब जिजाऊंच्या पोटी दिनांक १९ फेब्रुवारी १६३० रोजी फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शिवाई देवीच्या नावाने राजांचे नाव “शिवाजी” असे ठेवण्यात आले. वडिलांचे नाव शहाजी भोसले आणि आईचे नाव जिजाबाई भोसले होते. त्यांचे वडील म्हणजेच शहाजीराजे भोसले हे सरदार म्हणून कार्यरत होते.

शिवाजी महाराजांची बालपणाची सगळी वर्ष ही घोडेस्वारी, गनिमी कावा राज्यकारभार आणि युद्धकला शिकण्यात गेली. त्यांची आई म्हणजेच जिजाऊ शिवरायांना लहानपणी रामायण, महाभारत, तसेच इतर महापुरुषांच्या कथा सांगत असतं. ह्या सगळ्या कथा ऐकून त्यांना स्वराज्य स्थापन करायला प्रोत्साहन मिळाले.

त्यामुळे, लहानपणीच त्यांच्या अंगी पराक्रम, प्रजादक्षता हे गुण बाणवले गेले. त्यांचे वडील त्यांना वेळ मिळेल तेंव्हा त्यांना युद्धकला आणि  घोडेबाजी शिकवत असतं. याखेरीज, दादोजी कोंडदेव ह्यांनी शिवाजी महाराजांना युध्यकौशल्य आणि नीतिशास्त्र शिकवले.

पूर्वी लग्न ही न कळत्या वयातच होत होती. त्यामुळे, शिवाजी महाराज यांचे लग्न सुद्धा किशोर वयातच झाले. निंबाळकर घराण्यातील “जिऊबाई ” ही महाराजांची पहिली राणी होती. तिचे सासरचे नाव “ सईबाई ” असे ठेवण्यात आले होते. मुघली सत्तांचा रयतेवर होणारा अन्याय त्यांच्या दृष्टीस येत होता,  म्हणून त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली.

आयुष्यातील महत्वपूर्ण प्रसंग

निश्चयाचा महामेरू…बहुतजनांसी आधारु…. अखंडस्थितीचा निर्धारु…असा श्रीमंत योगी रयतेचा जाणता राजा म्हणजे शिवाजी राजा होय. मित्रांनो, त्याकाळी गोवळकोंड्याला कुतुब शहा, उत्तरेला शहाजहान आणि विजापूरला आदिलशाह ह्यांची सत्ता होती. शिवाय, पोर्तुगीजांनी सगळे समुद्रकिनारे ताब्यात घेतले होते. शिवाजी महाराज यांचे वडील शहाजीराजे भोसले हे मुघलांच्या चाकरीत सामील होते.

ते आदिलशहाच्या चाकरीत उच्च पदावर कार्यरत होते. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी महाराजांनी तोरणा, चाकण आणि कोंढाणा हे किल्ले ताब्यात घेतले. तोरणा हा पहिला किल्ला त्यांनी आपल्या ताब्यात घेतला आणि स्वराज्य स्थापनेची मुहूर्तमेढ रोवली. नंतर त्यांनी ठाणे, कल्याण आणि भिवंडी येथील किल्ल्यांवर ताबा मिळवला.

त्यामुळे, इकडे महाराजांना लगाम लावण्याकरता त्यांच्या वडिलांना बंदी करण्यात आले. त्यामुळे, पुढची ७ वर्षे  राजांनी आदिलशहावर थेट आक्रमण केले नाही. शिवाजी महाराजांच्या इतिहासानुसार राजांनी ३०० हून अधिक किल्ले जिंकले आहेत. यांतील, शिवनेरी, प्रतापगड , सिंधुदुर्ग , रायगड , विजयदुर्ग , तोरणा, पन्हाळा , सिंहगड आणि प्रबळगड असे असंख्य किल्ले जिंकून महाराजांनी स्वराज्य स्थापन केले.

प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही आदिलशहाला काही केल्या महाराज हाती येत नव्हते. त्यामुळे, दरबारात शिवाजी महाराजांना कोण पडकुन आणेल, त्याला मोठा नजराणा देण्यात येईल असा सवाल करण्यात आला. अफजलखानाने महाराजांना पकडुन आणायचा विडा उचलला.

मित्रांनो, अफजलखान हा भरभक्कम खांदा असलेला, उंचबांधा असलेला आणि युद्ध कौशल्य असलेला सरदार होता. तरीदेखील, शिवाजी महाराजांनी त्याला गनिमी काव्याने भुईसपाट करून टाकले. शिवाय, लाल किल्ल्यावर तर शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची तीन बोटे कापली होती आणि या सगळ्या प्रसंगात शाहिस्तेखान एवढा भयभीत झाला होता की दुसऱ्या दिवशीच तो औरंगाबादला पळून गेला.

याखेरीज मित्रहो, शिवाजी महाराजांच्या शूरसैनिकांपैकी तानाजी मालुसरे हा एक विश्वासू आणि होतकरू असा मावळा होता. कोंढाणा किल्ला जिंकून आणण्यासाठी जीवाची बाजी लावायला अनेक शूरवीर तयार होते, पण महाराजांच्या मनात एकच वीराचे नाव आले ते म्हणजे ‘ तानाजी मालुसरे ‘, कारण  महाराजांच्या प्रत्येक संकटकाळात तानाजी मालुसरे यांनी मोलाची साथ दिली होती.

त्यामुळे, कोंढाणा किल्ल्यावर आक्रमण करताना तानाजीने शिवाजी महाराजांना जे वाक्य म्हटले होते, ते त्यांनी खरे देखील करून दाखवले. ते वाक्य पुढीलप्रमाणे…

   ” आधी लगीन कोंढाण्याचे    मग माझ्या रायबाचे!”

कोंढाणा किल्ला जिंकला पण, सिंहासारखा तानाजी मात्र कायमचा गेला. म्हणूनच, त्यावेळी “ गड आला पण, सिंह गेला ” असे गौरवोद्गार महाराजांच्या तोंडातून निघाले आणि राजांना अश्रू अनावर झाले. खरंतर, तेंव्हापासून महाराजांनी कोंढाणा किल्ल्याचे नाव सिंहगड असे ठेवले. अजूनही कोंढाणा उर्फ सिंहगड किल्ला हा तानाजी मालुसरे आणि त्यांच्या साथीदारांच्या शौर्याच्या पाऊलखुणा कणाकणात साठवून, आपल्या इतिहासाची साक्ष देत उभा आहे.

खरंच, धन्य ते तानाजी आणि धन्य त्यांचा पराक्रम!

राज्याभिषेक

मित्रांनो, दिनांक ६ जून १६७४ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा अतिउत्साहामध्ये रायगड किल्ल्यावर पार पडला.  शिवराज्याभिषेकावेळी गागाभट्टाना ७००० होन तर, इतर सर्व ब्राम्हणांना १७००० होन दक्षिणा दिली गेली. शिवराज्याभिषेकाला रायगडावर खूप गर्दी झाली होती. राज्याभिषेकावेळी प्रजेने राजांना भरभरून आशीर्वाद दिले.

“शिवराय की जय”, “शिवराय की जय” अशा घोषणा मोठमोठ्याने देण्यात आल्या. सुरांच्या घोषात सगळा आसमंत भरून गेला. संपूर्ण रायगड आनंदाने नाचू गाऊ लागला. सर्व मंत्री सिहांसनापुढे जाऊन राजांना अभिवादन करू लागले. धन, घोडे, शस्त्रे यांचे दान करण्यात आले. रायगडावर राजांची मिरवणूक जात असताना प्रजेने राजांवर फुल उधळली आणि दिवे देखील ओवाळले.

राज्याभिषेकानंतरच्या मोहिमा

महाराजांनी जंजिऱ्याचे सिद्धी आणि इंग्रज या दोहोंवर दडपण आणले आणि विजापूरवर आक्रमण केले. या स्वारीत शिवाजी राजांनी सुपे, अकोला आणि  कारवारपर्यंत आपली हद्द कायम केली. इसवी सन  १६७४ ते १६७५ या काळात राजेंनी खानदेशवर चढाई केली.

शिवाय, विजापूर राज्यातील अथणी आणि संपगाव इथेदेखील आक्रमणे केली आणि मे १६७५ मध्ये त्यांनी आदिलशाहीकडून फोंड्याचा किल्ला ताब्यात घेतला. जानेवारी – फेब्रुवारी १६७६ दरम्यान महाराज सातारला आजारी होते, त्यासंबधी अनेक अफवा चहूबाजूंनी प्रस्तुत झाल्या.

त्यावेळी सुद्धा महाराजांनी ती परिस्थिती व्यवस्थितपणे हाताळली. शिवाजी महाराजांनी नेतोजी पालकरांना त्यांच्या कृतीचा पश्चाताप झाल्यावर, जेंव्हा ते दिलेरखानाची छावणी सोडून महाराजांना शरण आले तेंव्हा, राजांनी पालकरांचे शुध्दीकरण करून त्यांना हिंदू धर्मात येण्यासाठी परवानगी दिली.

मित्रांनो, जेंव्हा शिवाजी महाराज पुण्याचा कारभार पाहू लागले, तेंव्हा शहाजी राजांनी त्यांना स्वतंत्र राजमुद्रा तयार करून दिली आणि ही राजमुद्रा संस्कृत भाषेत होती.

           “प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता ।।             शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।”

खरंतर, ह्याचा मराठीतून अर्थ असा आहे की, चंद्र जसा कलेकलेने वाढत जातो व साऱ्या विश्वात वंदनीय होतो, त्याप्रकारे शाहजीचा पुत्र शिवाजी महाराजांच्या मुद्रेचा लौकिक वाढवत जाईल व ही राजमुद्रा फक्त लोककल्याणासाठीच चमकेल.

शिवाजी महाराजांच्या पत्नी

शिवाजी महाराजांना एकूण आठ राण्या होत्या. सईबाई ही त्यांची पहिली पत्नी. सईबाईंचा मुलगा संभाजी हा होता. त्यांनतर, सोयराबाई मोहिते, पुतळाबाई पालकर, सकवारबाई गायकवाड, काशीबाई जाधव, सगुणाबाई शिंदे, गुणवंताबाई इंगळे आणि लक्ष्मीबाई विचारे अशा त्यांच्या सगळ्या मिळून आठ राण्या होत्या. यांतील इसवी सन १६५९ मध्ये सईबाई यांचे निधन झाले.

राज्यविस्तार

शिवाजी महाराजांनी कधी जातिभेद केला नाही. त्यांनी सगळ्या जातींच्या लोकांना मावळा असे नाव देऊन संघटित केले आणि त्यांच्याशी बोलून आजूबाजूच्या परिसराचा अभ्यास करून त्या प्रदेशाची माहिती घेतली. शिवाय, तरुणांना एकत्र आणून किल्ले बांधले. त्यादरम्यान आदिलशाहा आजारी पडला ह्या संधीचा फायदा घेऊन महाराजांनी विजापूरमध्ये प्रवेश घेतला.

तेथील आजूबाजूचे सगळे किल्ले त्यांनी ताब्यात घेतले. महाराज चाकण ते निरा प्रदेशाचे अधिपती झाले. कोकणसह एकूण नऊ किल्ले त्यांनी ताब्यात घेतले. महाराजांनी स्वराज्याचा कारभार अगदी गनिमी काव्याने सांभाळला. त्यांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी अपार कष्ट घेतले. शिवाय, शिवाजी महाराज येतील त्या संकटाना अगदी न घाबरता सामोरे गेले.

महाराजांचा मृत्यू

मित्रांनो, हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला शिवाजी महाराज तापाने आजारी पडले आणि दिनांक ३ एप्रिल  १६८० च्या सुमारास आपल्या लाडक्या राजाची प्राणज्योत मावळली. अखेर, आपल्यातून आपले छत्रपती शिवाजी महाराज कायमचे निघून गेले.

आम्ही दिलेल्या shivaji maharaj essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर शिवाजी महाराज निबंध मराठी  बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या shivaji maharaj information in marathi essay या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि chhatrapati shivaji maharaj essay in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये chatrapati shivaji maharaj nibandh in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या : इनमराठी.नेट

Share this:

2 thoughts on “शिवाजी महाराज निबंध मराठी shivaji maharaj essay in marathi”.

Thank you तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चांगले सांगितले आहे .

Leave a Comment उत्तर रद्द करा.

पुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.

Notify me of follow-up comments by email.

Notify me of new posts by email.

essay writing on shivaji maharaj in marathi

Marathi Read

छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी । Chhatrapati Shivaji Maharaj Essay in Marathi

छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी । Chhatrapati Shivaji Maharaj Essay in Marathi

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या माती मध्ये जन्मलेले एक शूरवीर आणि महान पुरुष होते. स्वतंत्र सम्राटाचे स्वप्न साकार करणारे स्वराज्य संस्थापक म्हणजेच “शिवाजी महाराज” होय.

छत्रपती शिवाजी महाराज हे थोर कर्तुत्वान पुरुष होते, त्यांनी अतिशय खडतर परिस्थिती मधून केलेली स्वराज्य निर्मिती हे सर्व जनतेसाठी प्रेरणादायी आहे.

आदर्शवत स्वराज्य कारभार करण्यात यशस्वी ठरलेले पहिले छत्रपति महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराज होते.

अशा या शूर वीर आणि पराक्रम व जन्मताच स्वराज्य निर्मिती ची शपथ घेतलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 रोजी जुन्नर तालुक्यात बसलेल्या शिवनेरी किल्ल्यावर झाला. अशा या शूरवीर बालकाला जन्म देणाऱ्या माऊली चे नाव राजमाता जिजाऊ भोसले आणि शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले असे होते.

शहाजी राजे हे त्याकाळचे सरदार होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण राजमाता जिजाऊ आणि शहाजी राजे यांच्या संस्कारा खाली गेले. लहानपणापासूनच शिवाजी महाराजांना राज्यव्यवस्था, युद्धकला, नीतिमत्ता, गनिमी कावा, आणि घोडेस्वार ची विद्या शिकवण्यात आली.

या व्यतिरिक्त शिवाजी महाराज हे त्यांच्या वयाच्या मावळ्यांसोबत खेळ म्हणून मावळे हेच शिवरायांचे पहिले सवंगडी आणि सोबती होते.

राजमाता जिजाऊ यांनीदेखील शिवरायांना लहान वयामध्ये चांगल्या गोष्टी शिकवण्याची भर घातली. जिजाऊंनी शिवरायांना रामायण-महाभारत तसेच इतर महान पुरुषांच्या कथा सांगायच्या त्यामुळे छत्रपती शिवाजीमहाराजांच्या मनावर दृढ परिणाम झाला.

लहानपणीच प्रजादक्ष आणि पराक्रम हे गुण शिवाजी महाराज यांच्या अंगी रुजले. माता जिजाऊ प्रमाणेच शहाजीराजे देखील वेळ मिळेल तेव्हा लहान शिवरायांना युद्धकला, घोडेबाजीचे आणि वाचन करायला शिकवीत. अशाप्रकारे आई-वडिलांच्या छत्रछायेखालीच भविष्याचा एक महान पुरुषा आणि स्वराज्य निर्मितीची इच्छा बाळगणारे छत्रपती शिवाजी महाराज मोठे होत होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे लग्न आहे लहान वयामध्ये झाले होते. जिजाऊंनी फलटणच्या नाईक निंबाळकर या घराण्यातील मुलगी सईबाई हिला भोसले घराण्याची सून आणि शिवरायांची पत्नी म्हणून पसंत केले. शिवराय जसे जसे मोठे होऊ लागले त्यांना परकीय सत्तांचा आपल्या जनतेवर, रयतेवर होणाऱ्या छळा चा अनुभव होऊ लागला. आपली जनता किती संकटातून जात आहे, जनतेवर किती छळ होत आहे याची कल्पना शिवरायांना झाली. व शिवरायांनी रायरेश्वरावर च्या मंदिरात स्वराज्य निर्मिती ची प्रतिज्ञा घेतली.

आदिलशाही, निजामशाही आणि मुघलसाम्राज्य यांच्या विरोधामध्ये महाराजांना लढावे लागणार होते याची सुरुवात त्यांनी तोरणा किल्ला जिंकून केली. अत्यंत लहान वयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला जिंकला व त्याचे नाव तोरणा असे ठेवले.

तोरणा किल्ला जिंकून छत्रपति शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीची मुहूर्तमेढ रोवली होती.

त्यानंतर स्वराज्यावर आलेल्या प्रत्येक संकटाला अतिशय धैर्याने तोंड देऊन शिवाजी महाराज यशस्वी ठरले. छत्रपती शिवाजी महाराज यांचे धैर्य आणि पराक्रम

” अफजलखानाचा वध” ” शाहिस्तेखानाची बोटे कापणे” या प्रसंगांमधून हा दिसून येतो.

शिवाजी महाराजांच्या पराक्रमी आणि धाडसी वृत्तीने स्वकीय शत्रूंचा देखिला धडा शिकविला. याव्यतिरिक्त पुरंदरचा तह, दिल्लीमध्ये झालेली औरंगजेबाची भेट आणि सुटका अशा बिकट परिस्थितीला देखील शिवाजी महाराजांनी संयमाने आणि धैर्याने तोंड दिले. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यनिर्मीतीच्या लढाईमध्ये त्यांच्यासोबत होते ते म्हणजे मावळे आणि योग्य साथीदार यांच्या मदतीने शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले जिंकले. प्रत्येक प्रसंगांमध्ये मावळे जिकरीने शिवाजी महाराजा यांच्या सोबतीला आले. शिवरायांसाठी पर्यायाने स्वराज्यासाठी स्वतःचे प्राण सुद्धा गमाविले.

तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, प्रतापराव गुजर व मुरारजी ते शूर वीर तर स्वराज्याच्या स्वप्नासाठी धरणी तीर्थ झाले.

इसवी सन 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला.

त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला एक राजा मिळाला. त्यानंतर महाराजांनी स्वराज्याचा कारभार सुरळीत आणि सुव्यवस्थित चालावा यासाठी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले. स्वतंत्र स्वराज्याचे चलन चालू केले. तसेच आरमार व्यवस्था, सुयोग्य कर वसुली, गड- किल्ले सुरक्षा अशा विविध पर्यावरणीय मोहीम छत्रपती शिवाजी महाराज यांनी राबवल्या.

शिवाजी राजे असताना त्यांच्या पाठीमागे स्वराज्य सांभाळण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज घडवण्यासाठी राजमाता जिजाऊ आणि शिवाजी महाराज यांनी प्रयत्न केले आणि त्यांच्या या प्रयत्नांना यश सुद्धा आले. स्वराज्याच्या शाखा संपूर्ण दक्षिण भारतात पसरवण्यात छत्रपती शिवाजीराजे सफल झाले होते. त्यामुळे परकीय सत्तांनी सुद्धा शिवरायांचे स्वराज्य अस्तित्व मान्य केले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम आणि गाथा सर्वत्र नावाजली जात होती.

अखेर 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर अशा या वीर पराक्रमी युगपुरुषाची प्राणज्योत मावळली.

असा हा प्रजादक्ष राजा, राष्ट्रपुरुष शिवाजी महाराज स्वतःच्या पराक्रमाने आणि कर्तुत्वाने ” छत्रपती” म्हणून अनंत काळासाठी आपले नाव इतिहासाच्या पानावर छापून प्रत्येक मराठी माणसाच्या, महाराष्ट्राच्या माती मध्ये अजरामर झालेला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी । Chhatrapati Shivaji Maharaj Essay in Marathi   हे निबंध कसा वाटलं तुम्हाला हे अवश्य सांगा खाली Comment करून, धन्यवाद…

हे पण अवश्य वाचा =

  • माझा गाव निबंध मराठी । Maze Gav Marathi Nibandh
  • आजचा आदर्श विद्यार्थी मराठी निबंध । Adarsh Vidyarthi Nibandh in Marathi
  • मी सरपंच झालो तर मराठी निबंध । Mi Sarpanch Zalo tr Marathi Nibandh
  • माझे स्वप्न निबंध मराठी । Maze Swapna Essay in Marathi
  • माझा आवडता छंद वाचन मराठी निबंध । Maza Avadta Chand Nibandh Marathi

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी Shivaji Maharaj Nibandh Marathi

Shivaji Maharaj Essay in Marathi छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी Chhatrapati Shivaji Maharaj Nibandh Marathi यांचावर छान निबंध २००, ३००, ४००, ५००, ६०० शब्दात या लेखात उपलब्ध आहे.

निबंध क्र. १ छत्रपती शिवाजी महाराज निबंध Shivaji Maharaj Nibandh

छत्रपती शिवाजी महाराज: महान योद्धा – Chhatrapati Shivaji Maharaj Essay in Marathi (200 शब्द)

छत्रपती शिवाजी महाराज , 1630 मध्ये जन्मलेले, एक महान भारतीय योद्धा राजा आणि पश्चिम भारतातील मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. मुघल साम्राज्याच्या वर्चस्वाला त्यांनी यशस्वीपणे आव्हान दिल्याने त्यांच्या कारकिर्दीने भारतीय इतिहासात एक महत्त्वपूर्ण वळण घेतले.

शिवाजी एक दूरदर्शी नेता होता ज्यांना तटबंदी आणि नौदल शक्तीचे महत्त्व समजले होते. त्याने आपल्या राज्याच्या सुरक्षिततेची खात्री करून पश्चिम किनारपट्टीवर मजबूत किल्ल्यांचे जाळे तयार केले. मराठा नौदल म्हणून ओळखल्या जाणार्‍या त्यांच्या नौदल ताफ्याने त्यांच्या प्रदेशांचे संरक्षण करण्यात आणि सागरी वर्चस्व प्रस्थापित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

त्याच्या लष्करी पराक्रमाव्यतिरिक्त, शिवाजी त्याच्या प्रशासकीय सुधारणा आणि धार्मिक सहिष्णुतेसाठी देखील ओळखले जात होते. त्यांनी स्थानिक स्वराज्याला प्रोत्साहन देऊन विकेंद्रित प्रशासनाला चालना दिली. सर्व धर्मांबद्दलच्या आदरामुळे त्यांना विविध पार्श्वभूमीतील लोकांची प्रशंसा मिळाली.

कोट्यवधी भारतीयांच्या हृदयात शिवरायांचा वारसा जिवंत आहे. तो धैर्य, दृढनिश्चय आणि स्वातंत्र्याच्या भावनेचे प्रतीक आहे. त्यांची जीवनकहाणी पिढ्यांना प्रेरणा देत राहते, आम्हाला अदम्य मानवी भावनेची आणि न्यायाच्या शोधाची आठवण करून देते.

हे सुद्धा वाचा :

  • सावित्रीबाई फुले निबंध मराठी
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर निबंध मराठी

निबंध क्र. २ छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी

छत्रपती शिवाजी महाराज: मराठा साम्राज्याचे शिल्पकार – Shivaji Maharaj Nibandh Marathi (300 शब्द)

छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय इतिहासातील एक प्रमुख व्यक्तिमत्व, 17 व्या शतकात मराठा साम्राज्याच्या स्थापनेतील त्यांच्या भूमिकेसाठी साजरा केला जातो. शिवनेरी किल्ल्यावर 1630 मध्ये जन्मलेल्या, लहानपणापासूनच त्यांना मोठेपणा प्राप्त झाला होता. शिवाजीच्या कारकिर्दीत भारतीय राजकारण आणि लष्करी रणनीतीमध्ये महत्त्वपूर्ण बदल घडून आला.

शिवाजीच्या उल्लेखनीय कामगिरीपैकी एक म्हणजे बलाढ्य मुघल साम्राज्याविरुद्ध गनिमी युद्ध रणनीतीचा अभिनव वापर. त्याला युद्धातील गतिशीलता आणि लवचिकतेचे महत्त्व कळले, ज्यामुळे त्याच्या लहान सैन्याने मोठ्या मुघल सैन्याला मागे टाकले. या सामरिक तेजामुळे त्यांना “छत्रपती” किंवा “सर्वोच्च सार्वभौम” ही पदवी मिळाली.

शिवाजी हा केवळ कुशल लष्करी नेता नव्हता तर एक चतुर प्रशासकही होता. त्यांनी स्थानिक स्वायत्तता, न्याय आणि न्याय्य कर प्रणालीवर भर देणारी शासन प्रणाली लागू केली. विविध पार्श्‍वभूमीतील प्रतिभावान व्यक्तींना आकर्षित करून त्याच्या राजवटीत त्याचे राज्य समृद्ध झाले.

शिवाय, आपल्या राज्याची किनारपट्टी आणि व्यापारी मार्ग सुरक्षित करण्यासाठी शिवाजीचे नौदल पराक्रम महत्त्वपूर्ण होते. त्याने एक शक्तिशाली नौदल स्थापन केले ज्याने त्याच्या प्रदेशांचे विदेशी आक्रमणांपासून संरक्षण केले.

त्यांच्या लष्करी आणि प्रशासकीय कामगिरी व्यतिरिक्त, शिवाजी त्यांच्या धार्मिक सहिष्णुतेसाठी ओळखले जात होते. त्याने सर्व धर्मांचा आदर केला आणि आपली प्रजा मुक्तपणे आपल्या धर्माचे पालन करू शकेल याची खात्री केली.

छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा शौर्य, नेतृत्व आणि दूरदर्शी शासनाचे प्रतीक आहे. त्यांनी मराठा साम्राज्याचा पाया घातला, जो भारताच्या इतिहासातील सर्वात प्रभावशाली शक्ती बनला. त्यांची जीवनकथा पुढारी आणि देशभक्तांना प्रेरणा देत राहते, धोरणात्मक विचार, सांस्कृतिक विविधता आणि न्याय मिळवण्याच्या महत्त्वावर जोर देते.

  • संगणक म्हणजे काय? कंप्यूटर माहिती
  • भारत माझा देश निबंध मराठी
  • निरोप समारंभ भाषण

निबंध क्र. ३ Chhatrapati Shivaji Maharaj Nibandh Marathi Madhe

छत्रपती शिवाजी महाराज: नेतृत्व आणि शासनाचे एक प्रतीक – छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी (400 शब्द)

छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय इतिहासातील एक नाव कोरले गेलेले, एक बहुआयामी नेते होते जे त्यांच्या लष्करी प्रतिभा, प्रशासकीय चातुर्य आणि न्यायप्रती अटूट वचनबद्धतेसाठी ओळखले जातात. 1630 मध्ये शहाजी भोंसले आणि जिजाबाई यांच्या पोटी जन्मलेल्या शिवाजीचा वारसा काळाच्या पलीकडे आहे आणि पिढ्यांना प्रेरणा देत आहे.

शिवरायांचे लष्करी कारनामे पौराणिक आहेत. जुलमी मुघल राजवटीने प्रादेशिक स्थैर्याला गंभीर धोका निर्माण केला होता हे त्याच्या लवकर लक्षात आले. याचा प्रतिकार करण्यासाठी, त्याने गनिमी युद्धाच्या रणनीती वापरल्या, भूप्रदेशातील त्याच्या ज्ञानाचा उपयोग मोठ्या मुघल सैन्याला मागे टाकण्यासाठी केला. या रणनीतीमुळे त्यांना स्वतंत्र मराठा राज्य स्थापन करता आले.

शिवाजी राजवटीत मराठा साम्राज्य केवळ त्यांच्या लष्करी पराक्रमामुळेच नव्हे तर प्रशासकीय सुधारणांमुळेही भरभराटीला आले. त्यांनी विकेंद्रित शासन प्रणालीची स्थापना केली, स्थानिक नेत्यांना त्यांचे प्रदेश कार्यक्षमतेने व्यवस्थापित करण्यासाठी सक्षम केले. या पध्दतीने उत्तरदायित्वाला चालना दिली आणि सर्वांसाठी न्याय उपलब्ध असल्याचे सुनिश्चित केले.

शिवाजीचे नौदल कर्तृत्वही तितकेच प्रभावी होते. त्याने अरबी समुद्राचे सामरिक महत्त्व ओळखले आणि एक मजबूत नौदल तयार केले ज्याने त्याचा किनारा आणि व्यापार मार्ग सुरक्षित केला. हे नौदल सामर्थ्य त्याच्या प्रदेशांचे संरक्षण आणि व्यापार वाढविण्यात महत्त्वपूर्ण ठरले.

धार्मिक सहिष्णुतेबद्दलची त्यांची बांधिलकी ही शिवाजीला वेगळे करते. धार्मिक संघर्षांनी चिन्हांकित केलेल्या युगात, त्याने विविधता स्वीकारली आणि सर्व धर्मांचा आदर केला. त्याच्या प्रजेला छळाची भीती न बाळगता त्यांच्या धर्माचे पालन करण्यास मोकळे होते, धार्मिक सौहार्दाचे उदाहरण मांडले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा त्यांच्या हयातीतही विस्तारलेला आहे. त्यांची दृष्टी, नेतृत्व आणि तत्त्वे यांनी भारताच्या इतिहासावर अमिट छाप सोडली आहे. त्यांची जीवनकथा आशेचा आणि प्रेरणेचा किरण म्हणून काम करते, आम्हाला धोरणात्मक विचार, प्रभावी शासन आणि विविधतेत एकता यांचे महत्त्व लक्षात आणून देते.

  • डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण
  • मोबाईल शाप की वरदान निबंध मराठी
  • विज्ञान शाप की वरदान मराठी निबंध

निबंध क्र. ४ शिवाजी महाराज निबंध Shivaji Maharaj Nibandh

छत्रपती शिवाजी महाराज: मराठा साम्राज्याचे शिल्पकार आणि न्यायाचे समर्थक – Shivaji Maharaj Nibandh Marathi (५०० शब्द)

शौर्य, नेतृत्व आणि न्याय यांचे समानार्थी नाव असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १६३० मध्ये महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या जीवनाचा प्रवास म्हणजे धैर्य, दृष्टी आणि त्यांच्या लोकांच्या कल्याणासाठी अटूट बांधिलकीची एक उल्लेखनीय गाथा आहे.

शिवाजीचे लष्करी यश त्यांच्या सामरिक तेजाचा पुरावा आहे. मुघल साम्राज्याच्या प्रबळ पराक्रमाचा सामना करत, त्याने नाविन्यपूर्ण गनिमी युद्धाच्या रणनीती वापरल्या ज्यामुळे त्याच्या लहान सैन्याने मोठ्या मुघल सैन्याचा पराभव केला. भिकाऱ्याच्या वेशात आग्रा किल्ल्यावरून त्याची प्रसिद्ध पलायन हे त्याच्या साधनसंपन्नतेचा पुरावा आहे.

शिवाजीच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्याची स्थापना भारतीय इतिहासातील एक महत्त्वपूर्ण वळण ठरली. त्याचे राज्य पश्चिम भारतातील महत्त्वपूर्ण भागांमध्ये विस्तारले होते आणि स्थानिक स्वायत्ततेवर जोर देणारी एक अद्वितीय प्रशासकीय प्रणाली हे त्याचे वैशिष्ट्य होते. त्याने आपले क्षेत्र प्रांतांमध्ये विभागले, प्रत्येकाची स्वतःची परिषद आणि महसूल संकलन प्रणाली, न्याय त्याच्या साम्राज्याच्या अगदी दुर्गम कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचेल याची खात्री करून.

शिवरायांचे नौदल पराक्रमही तितकेच उल्लेखनीय होते. मजबूत नौदलाचे सामरिक महत्त्व ओळखून, त्याने एक मजबूत नौदला तयार केला ज्याने त्याचा किनारा सुरक्षित केला आणि व्यापार सुलभ केला. या सागरी सामर्थ्याने त्याच्या प्रदेशांचे विदेशी आक्रमणांपासून संरक्षण केले आणि आर्थिक समृद्धीला चालना दिली.

शिवाजीच्या सर्वात चिरस्थायी वारशांपैकी एक म्हणजे त्यांची धार्मिक सहिष्णुता. धार्मिक संघर्षाने ग्रासलेल्या युगात ते विविधतेचे आणि सर्वसमावेशकतेचे चॅम्पियन होते. त्यांनी हे सुनिश्चित केले की त्यांच्या प्रजेला छळाची भीती न बाळगता त्यांच्या धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य आहे, एकोपा आणि सहअस्तित्वाचे उदाहरण ठेवले.

शिवाजीच्या कारकिर्दीचे वैशिष्ट्य न्याय आणि कल्याणासाठी समर्पित होते. त्यांनी एक न्याय्य कर प्रणाली लागू केली, ज्याने पीडित आणि गरीबांना दिलासा दिला. आपल्या प्रजेच्या कल्याणाविषयीच्या त्याच्या चिंतेमुळे त्यांना त्यांची अतूट निष्ठा मिळाली.

छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आणि वारसा लाखो भारतीयांना प्रेरणा देत आहे. तो स्वातंत्र्याच्या अदम्य भावनेचे आणि न्यायाच्या शोधाचे प्रतीक आहे. त्यांची धोरणात्मक प्रतिभा, प्रशासकीय सुधारणा, नौदल उपलब्धी आणि धार्मिक सहिष्णुतेची बांधिलकी त्यांना भारतीय इतिहासातील एक आदरणीय व्यक्तिमत्त्व बनवते.

  • इंदिरा गांधी मराठी माहिती
  • डॉ. राजेंद्र प्रसाद यांची माहिती
  • विराट कोहली माहिती मराठी

निबंध क्र. ५ Chhatrapati Shivaji Maharaj Essay in Marathi

छत्रपती शिवाजी महाराज: भारताचे नशीब घडवणारे दूरदर्शी नेते – छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी (600 शब्द)

1630 मध्ये जन्मलेले छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या इतिहासात एक उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणून उभे आहेत. त्यांचा जीवनप्रवास त्यांच्या अपवादात्मक नेतृत्व, लष्करी प्रतिभा, प्रशासकीय कौशल्य आणि न्याय आणि कल्याणासाठी अटूट बांधिलकीचा पुरावा आहे. शिवरायांचा वारसा केवळ ऐतिहासिक कथा नसून पिढ्यांसाठी प्रेरणास्रोत आहे.

शिवाजीच्या लष्करी मोहिमा पौराणिक आहेत. त्यांनी मुघल साम्राज्याच्या जुलमी राजवटीला प्रादेशिक स्थिरतेसाठी गंभीर धोका असल्याचे ओळखले आणि स्वतंत्र मराठा राज्य स्थापन करण्याच्या मोहिमेला सुरुवात केली. गनिमी युद्ध रणनीती, भूप्रदेशाचे ज्ञान आणि लष्करी रणनीतीचा त्याचा अभिनव वापर यामुळे त्याच्या लहान सैन्याने मोठ्या मुघल सैन्यावर विजय मिळवला.

त्यांच्या नेतृत्वाखाली, मराठा साम्राज्याचा उदय झाला, ज्याने पश्चिम भारतातील महत्त्वपूर्ण भाग व्यापला. तथापि, शिवाजीला ज्याने वेगळे केले ते केवळ त्यांचे लष्करी विजय नव्हते तर राज्यकारभाराबाबतचा त्यांचा दूरदर्शी दृष्टिकोन होता. त्यांनी प्रशासनाचे विकेंद्रीकरण केले, त्यांच्या स्वतःच्या परिषदा आणि महसूल संकलन प्रणालीसह प्रांत निर्माण केले. या दृष्टिकोनामुळे त्याच्या साम्राज्याच्या अगदी दुर्गम प्रदेशातही न्याय उपलब्ध होता याची खात्री झाली.

शिवाजी केवळ योद्धाच नव्हता तर एक मुत्सद्दीही होता. त्यांनी न्याय्य कर प्रणालीची स्थापना केली, ज्याने दलितांना दिलासा दिला आणि आर्थिक समृद्धी सुनिश्चित केली. त्याच्या प्रशासनाची कार्यक्षमता, उत्तरदायित्व आणि त्याच्या प्रजेच्या कल्याणावर लक्ष केंद्रित करण्याचे वैशिष्ट्य होते.

शिवरायांच्या नौदल कर्तृत्वाचे महत्त्व जास्त सांगता येणार नाही. त्याने अरबी समुद्राचे सामरिक महत्त्व ओळखले आणि एक मजबूत नौदल तयार केले. या नौदल सामर्थ्याने त्याचा किनारा सुरक्षित केला, व्यापार मार्गांचे संरक्षण केले आणि परकीय आक्रमणे थोपवली. शिवाजीचे सागरी सामर्थ्य हे त्यांच्या साम्राज्याच्या यशात आणि दीर्घायुष्याचे प्रमुख घटक होते.

धार्मिक सहिष्णुता हे शिवाजी राजवटीचे आणखी एक वैशिष्ट्य होते. ज्या वेळी धार्मिक संघर्ष प्रचलित होता, त्यांनी विविधता स्वीकारली आणि सर्व धर्मांचा आदर केला. त्याची प्रजा छळाची भीती न बाळगता आपापल्या धर्माचे आचरण करण्यास मोकळी होती, एकोपा आणि सहअस्तित्वाचे उदाहरण मांडले.

शिवाजीचे जीवन त्यांच्या न्याय आणि लोकांच्या कल्याणाप्रती असलेल्या वचनबद्धतेच्या उदाहरणांनी भरलेले आहे. सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण करण्यासाठी ते ओळखले जात होते. समाजातील शोषित आणि उपेक्षित वर्गांबद्दलच्या त्यांच्या काळजीमुळे त्यांना त्यांच्या प्रजेचे प्रेम आणि निष्ठा मिळाली.

छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा त्यांच्या हयातीत खूप पुढे आहे. तो धैर्य, दृष्टी आणि स्वातंत्र्याच्या अदम्य आत्म्याचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. त्यांची जीवनकथा पुढारी आणि देशभक्तांना प्रेरणा देत राहते, धोरणात्मक विचार, प्रभावी शासन आणि न्याय मिळवण्याच्या महत्त्वावर जोर देते.

शेवटी, छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय इतिहासातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व राहिले आहेत. त्यांचे जीवन आणि कर्तृत्व हे नेतृत्व, शासन आणि न्यायाचे दिवाण म्हणून काम करतात. प्रशासकीय पराक्रम, नौदल सामर्थ्य आणि धार्मिक सहिष्णुता यांच्याशी लष्करी सामर्थ्याची सांगड घालण्याची शिवाजीची क्षमता त्यांना एक दूरदर्शी नेता म्हणून वेगळे करते ज्याने भारताचे भाग्य घडवले. त्यांचा वारसा आम्हाला न्याय्य आणि समृद्ध समाजाच्या शोधात प्रेरणा आणि मार्गदर्शन करत आहे.

  • संत जनाबाई यांची संपूर्ण माहिती
  • सरोजिनी नायडू यांची संपूर्ण माहिती
  • डॉ. होमी जहांगीर भाभा माहिती

Shivaji Maharaj Essay in Marathi छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी Shivaji Maharaj Nibandh Marathi

छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी Shivaji Maharaj Nibandh Marathi

शिवाजी महाराजांवर 10 ओळींचा निबंध Shivaji Maharaj Nibandh

  • 1630 मध्ये जन्मलेले छत्रपती शिवाजी महाराज हे भारतातील एक आदरणीय ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व आहे. १७ व्या शतकात मराठा साम्राज्याची स्थापना करणारे ते दूरदर्शी नेते होते.
  • शिवाजी त्यांच्या अपवादात्मक लष्करी कौशल्यासाठी आणि सामरिक कौशल्यासाठी ओळखले जात होते. बलाढ्य मुघल साम्राज्याला आव्हान देण्यासाठी त्यांनी नाविन्यपूर्ण गनिमी युद्ध रणनीती वापरली.
  • त्यांच्या नेतृत्वाखाली, न्याय आणि कार्यक्षमता सुनिश्चित करणाऱ्या विकेंद्रित प्रशासकीय व्यवस्थेद्वारे मराठा साम्राज्याची भरभराट झाली.
  • शिवाजीने नौदल सामर्थ्याचे महत्त्व ओळखले आणि एक मजबूत नौदल तयार केले ज्याने आपला किनारपट्टी आणि व्यापार मार्ग सुरक्षित केले.
  • धार्मिक सहिष्णुता हे त्यांच्या शासनाचे वैशिष्ट्य होते, कारण त्यांनी सर्व धर्मातील लोकांच्या हक्कांचा आदर केला आणि त्यांचे संरक्षण केले.
  • न्याय्य कर प्रणालीसह त्याच्या प्रजेच्या कल्याणासाठीच्या त्याच्या वचनबद्धतेमुळे त्याला त्यांची निष्ठा आणि प्रशंसा मिळाली.
  • शिवाजीचे जीवन धैर्य, न्याय आणि स्वातंत्र्याच्या अदम्य आत्म्याचे प्रतीक म्हणून पिढ्यांना प्रेरणा देत आहे.
  • त्यांचा वारसा नेता आणि देशभक्तांसाठी मार्गदर्शक प्रकाश म्हणून काम करतो, दूरदर्शी शासन आणि विविधतेतील एकतेच्या महत्त्वावर जोर देतो.
  • भारताच्या इतिहासावर छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रभाव खोलवर आहे आणि त्यांचे नाव शौर्य आणि नेतृत्वाचा समानार्थी आहे.
  • डॉ. वसंत गोवारीकर यांची माहिती
  • RTI Act माहिती अधिकार कायदा संपूर्ण माहिती
  • गिरनार पर्वत माहिती मराठी

FAQs: छत्रपती शिवाजी महाराजांवर वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न: छत्रपती शिवाजी महाराज कोण होते? उत्तर: छत्रपती शिवाजी महाराज हे 17 व्या शतकातील एक महान भारतीय योद्धा राजा आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.

प्रश्न : छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी व कुठे झाला? उत्तर: शिवाजीचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी महाराष्ट्रातील पुण्याजवळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर झाला.

प्रश्न : ‘छत्रपती’ या उपाधीचे महत्त्व काय? उत्तर: “छत्रपती” या उपाधीचा अर्थ “सर्वोच्च सार्वभौम” किंवा “सम्राट” असा होतो. विशाल साम्राज्याचा शासक म्हणून त्याचा दर्जा दर्शवण्यासाठी शिवाजीला बहाल करण्यात आले.

प्रश्न: लष्करी नेता म्हणून शिवाजीचे मोठे यश कोणते होते? उत्तर: शिवाजी त्याच्या नाविन्यपूर्ण गनिमी युद्धाच्या रणनीतीसाठी प्रसिद्ध आहे, ज्यामुळे तो शक्तिशाली मुघल साम्राज्याला आव्हान देऊ शकला आणि त्याचा पराभव करू शकला. त्याने मजबूत नौदल स्थापन केले आणि सामरिकदृष्ट्या स्थित किल्ल्यांचे जाळे तयार केले.

प्रश्न: शिवाजीने आपल्या कारकिर्दीत धार्मिक सहिष्णुतेचा प्रसार कसा केला? उत्तर: शिवाजी त्यांच्या धार्मिक सहिष्णुतेसाठी ओळखले जात होते. त्यांनी वेगवेगळ्या धर्मातील लोकांच्या हक्कांचा आदर केला आणि त्यांचे संरक्षण केले, त्यांना त्यांच्या धर्मांचे मुक्तपणे पालन करण्याची परवानगी दिली.

प्रश्न: शिवाजी महाराजांचे प्रशासन आणि राज्यकारभारात काय योगदान होते? उत्तर: शिवाजीने स्थानिक स्वायत्तता आणि न्यायावर भर देणारी विकेंद्रित प्रशासकीय व्यवस्था स्थापन केली. त्यांनी प्रभावी महसूल गोळा करण्याच्या पद्धती आणल्या आणि आपल्या प्रजेच्या कल्याणावर लक्ष केंद्रित केले.

प्रश्न: शिवाजीच्या राजवटीत नौदलाचे महत्त्व काय होते? उत्तर: शिवाजीने नौदल शक्तीचे महत्त्व ओळखले आणि आपली किनारपट्टी सुरक्षित करण्यासाठी, व्यापार मार्गांचे संरक्षण करण्यासाठी आणि परकीय आक्रमणांपासून आपल्या प्रदेशांचे रक्षण करण्यासाठी एक शक्तिशाली नौदल तयार केले.

प्रश्न : शिवरायांच्या किल्ल्यांचे महत्त्व काय? उत्तर: शिवाजीने पश्चिम किनारपट्टीवर मजबूत किल्ल्यांचे जाळे तयार केले, ज्याने त्याच्या राज्याचे रक्षण करण्यात आणि सामरिक प्रदेशांवर नियंत्रण राखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती मराठी
  • BJP भारतीय जनता पार्टी माहिती
  • RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघ माहिती

प्रश्न: शिवाजीच्या वारशाचा भारतीय इतिहासावर कसा परिणाम झाला? उत्तर: शिवाजीचा वारसा पिढ्यान्पिढ्यांना प्रेरणा देत राहतो, धोरणात्मक विचार, दूरदर्शी शासन आणि धार्मिक सहिष्णुतेच्या महत्त्वावर जोर देतो. त्याला धैर्य आणि स्वातंत्र्याचे प्रतीक मानले जाते.

प्रश्न: शिवाजीने इतर राज्यकर्त्यांशी किंवा राज्यांशी काही उल्लेखनीय युती केली होती का? उत्तर: शिवाजीने आपले स्थान मजबूत करण्यासाठी आणि आपल्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी विविध प्रादेशिक राज्यकर्ते आणि राज्यांशी युती केली.

प्रश्न: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशात शिवाजी राजवटीचे योगदान कसे होते? उत्तर: शिवाजीच्या कारकिर्दीत मराठी भाषा आणि संस्कृतीचा प्रसार झाला. त्याने आपल्या राज्यात कला, साहित्य आणि स्थापत्यशास्त्राच्या विकासास प्रोत्साहन दिले.

प्रश्न: शिवाजी महाराजांच्या जीवनाविषयी काही प्रसिद्ध किस्से किंवा कथा काय आहेत? उत्तर: शिवाजीच्या जीवनाविषयी अनेक कथा आणि दंतकथा आहेत, ज्यात आग्रा किल्ल्यावरून पलायन आणि मुघल सेनापती अफझलखान याच्याशी सामना यांचा समावेश आहे.

प्रश्न: शिवाजीचे निधन कसे झाले आणि त्यांचा मृत्यू केव्हा झाला? उत्तर: शिवाजीचे 3 एप्रिल 1680 रोजी आजारपणामुळे निधन झाले. त्यांच्या निधनाने भारतीय इतिहासातील एका युगाचा अंत झाला.

प्रश्न: शिवाजी महाराजांना समर्पित काही स्मारके किंवा खुणा आहेत का? उत्तर: होय, महाराष्ट्रात आणि भारताच्या इतर भागात शिवाजी महाराजांना समर्पित अनेक किल्ले, पुतळे आणि स्मारके आहेत.

प्रश्न: आज शिवाजी महाराजांचे स्मरण कसे केले जाते? उत्तर: शिवाजी महाराजांचे स्मरण विविध सांस्कृतिक कार्यक्रम, उत्सव आणि सार्वजनिक स्मरणार्थ केले जाते. त्यांचा वारसा भारताच्या, विशेषतः महाराष्ट्र राज्यातील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचा अविभाज्य भाग आहे.

  • कुसुमाग्रज यांची माहिती
  • शेअर बाजार माहिती
  • बाबा आमटे यांची माहिती

Related Posts

Leave a comment cancel reply.

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Recent Posts

weight loss

वजन कमी करण्यासाठी आहारात पोळी आणि भाताचा समावेश करू शकता का?

Latest जीबी व्हाट्सएप डाउनलोड करें

Latest जीबी व्हाट्सएप डाउनलोड करें

पेट में गैस हो तो क्या खाना चाहिए और क्या नहीं

पेट में गैस हो तो क्या खाना चाहिए और क्या नहीं

हाई ब्लड प्रेशर को तुरंत कंट्रोल कैसे करे

हाई ब्लड प्रेशर को तुरंत कंट्रोल कैसे करे ।जानिए

essay writing on shivaji maharaj in marathi

थायराइड का रामबाण इलाज, लक्षण और उपाय

Health: शुगर को जड़ से खत्म करने के लिए क्या खाना चाहिए?: (What should be eaten to eliminate sugar completely

शुगर को जड़ से खत्म करने के लिए क्या खाना चाहिए

मुद्रा लोन ऑनलाइन अप्लाई कैसे करे ! Mudra Loan Online Apply

मुद्रा लोन ऑनलाइन अप्लाई कैसे करे ! जानिए

मुझे तुरंत लोन चाहिए? तुरंत लोन कैसे मिलेगा

मुझे तुरंत लोन चाहिए? तुरंत लोन कैसे मिलेगा जानिए !

© 2023 englishmarathi.in | All rights reserved

Privacy Policy | Disclaimer | About Us | Contact Us

 भाषण मराठी - निबंध, भाषणे, उपयुक्त माहिती आणि बरेच काही

  • जीवन चरित्र
  • ज्ञानवर्धक माहिती
  • पक्षी माहिती
  • प्राणी माहिती

[निबंध] छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी | shivaji maharaj essay in marathi

Shivaji maharaj essay in  Marathi : मित्रांनो मराठा साम्राज्याचे जनक आणि प्रतापी राजा शिवाजी महाराज महाराष्ट्रासोबतच भारत व संपूर्ण जगासाठी आदर्श आहेत. 

आजच्या या लेखात आम्ही तुमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज मराठी निबंध घेऊन आलो आहोत. हा  Shivaji maharaj essay in  Marathi  निबंध आपण सराव म्हणून वापरू शकतात. याशिवाय शिवाजी  महाराज मराठी माहिती आपण या लिंक वर वाचू शकतात. तर चला सुरू करूया.. 

शिवाजी महाराज निबंध मराठी |  Shivaji maharaj essay in  Marathi

आपल्या देशातील महान मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दरवर्षी 19 फेब्रुवारी ला साजरी केली जाते. शिवाजी महाराजांनी अतिशय कमी वयात आपली जवाबदारी समजून स्वराज्यासाठी कार्य केले. त्यांना मराठी साम्राज्याचे संस्थापक देखील म्हटले जाते. 

शत्रूविरुद्ध लढ्याकरता महाराष्ट्रातल्या डोंगर-दर्‍यांमधे अनुकूल असलेली गनिमी काव्याची पद्धत वापरून त्यांनी तत्कालीन विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि बलाढ्य मुघल साम्राज्यशाही ह्यांच्याशी लढा दिला, आणि मराठी साम्राज्याचे बीजारोपण केले. शिवरायांच्या काळात प्रजा सुखी आणि समृद्ध होती. 

शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 ला महाराष्ट्रातील पुण्यात असलेल्या जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला.एक आदर्श शासनकर्ता, उत्कृष्ट योद्धा व सहिष्णू राजा म्हणून त्यांनी भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीय इतिहासात आपला विशेष ठसा उमटवला आहे. शिवरायांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले व आईचे नाव जिजाबाई असे होते. जिजाबाई या धार्मिक स्वभावाच्या सात्विक स्त्री होत्या, त्या शिवरायांना लहान असताना युद्धाच्या गोष्टी सांगत असत. रामायण महाभारतातील कथा सुद्धा त्या सांगायच्या. या सर्व गोष्टींचा शिवरायांवर खूप प्रभाव झाला. 

ज्या काळात शिवरायांचा जन्म झाला त्यावेळी अनेक परकीय सत्ता महाराष्ट्रात धुमाकूळ माजवत होत्या. मुघलांच्या कैदेत लाखो मराठा सैनिक खितपत पडले होते. स्त्रियांची अब्रु लुटली जात होती. अनेक बायकांचा कुंकवाचा धनी मारला जात होता. शेतकऱ्यांच्या कोणी कैवारी नव्हता.

शिवारांच्या जन्मामुळे गेल्या कित्येक वर्षापासून अंधारात चाचपडणाऱ्या महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू प्रकाशाचे किरण पसरू लागले. वयाच्या सोळाव्या वर्षापासून शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सूत्रे आपल्या हाती घेतली आणि स्वराज्याची घोडदौड सुरू झाली. यासाठी त्यांनी पुणे, मावळ यासारख्या आसपासच्या प्रांतात स्वतः फिरून तेथील परिस्थिती जाणून घेतली. सर्वसामान्य लोकांच्या समस्या समजावून घेतल्या. त्यांच्या मनात स्वराज्य बद्दल आस्था निर्माण केली. 

शिवरायांच्या या कार्यात त्यांना अनेक सहकाऱ्यांची साथ लाभली. तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशिद, मुरारबाजी, येसाजी कंक यासारख्या अनेक सवंगड्यांनी लढाईच्या काळात शिवरायांसाठी आपल्या प्राण्यांचीही बलिदान देतांना मागेपुढे पाहिले नाही.

शिवरायांच्या पूर्वी अनेक राजे होऊन गेले शिवरायां नंतरही अनेक राजे उदयास आले. पण सर्वात आदर्श राजा म्हणून शिवाजी महाराजांना ओळखले जाते. याचे कारण आहे त्यांचे स्वराज्य बद्दल असणारे प्रेम, निष्ठा, पराक्रम व निष्कलंक चारित्र्य. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये. असे म्हणत शेतकऱ्यांवर जीवापाड प्रेम करणारे व परस्त्रीला आई समान मानणारे शिवाजी महाराज हे एकमेव प्रजादक्ष राजे होते. 

शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांसोबत नेहमी प्रेमाने व आपुलकीने वागत असत. उन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता घरदार विसरून ते आपल्या मावळ्यासोबत स्वराज्यासाठी दिवस-रात्र झटायचे. शिवाजी महाराज गोरिल्ला युद्ध कलेचे जनक म्हणून देखील ओळखले जातात. मराठा साम्राज्याचे जनक शिवाजी महाराज यांचे 3 एप्रिल 1680 साली अवघ्या चाळीस वर्षाच्या वयात निधन झाले. परंतु अवघ्या 340 वर्षानंतर आजही महाराष्ट्रीयन जनतेच्या मनात ते जिवंत आहेत.  जय हिंद जय शिवराय.

तर मित्रांनो हा होता शिवाजी महाराज निबंध मराठी  तुम्हाला  Shivaji maharaj essay in  Marathi  कसा वाटला आम्हाला कमेन्ट मध्ये सांगा. व इतर कोणत्याही विषयावरील मराठी निबंध आणि भाषणे मिळवण्यासाठी आमच्या या वेबसाइट वर सर्च करा. 

2 टिप्पण्या

essay writing on shivaji maharaj in marathi

CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ 40 YEAR NAHI TR 50 YEAR JAGLE TEVHD DURUST KARA

खूप छान निबंध होता.

  • Birthday Wishes in Marathi

Contact form

Indian tech मराठी - ऑनलाइन जगाची सर्व माहिती

  • टेक्नॉलॉजी
  • इंटरनेट
  • स्मार्टफोन
  • बँकिंग
  • टिप्स-ट्रिक्स
  • शैक्षणिक-माहिती
  • महान व्यक्ती
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सरकारी-योजना

छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी | Shivaji Maharaj Essay In Marathi

मित्रांनो आपल्या भारताच्या इतिहासात असंख्य देशशक्तींनी आणि शूरविरांनी आपले बलिदान दिले आहेत. त्या शूरविरांपैकी एक म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. ज्यांचे शौर्य, धाडस आणि पराक्रम अतुलनीय आहे. त्यांनी मुघल साम्राज्याला हादरवून मराठा साम्राज्य उभे केले आहे. तर आजच्या पोस्टमधे आपण छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी | Shivaji Maharaj Essay In Marathi या विषयाबद्दल माहिती जाणून घेऊया...

छत्रपती_शिवाजी_महाराज_निबंध_मराठी_Shivaji_Maharaj_Essay_In_Marathi

श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज भारतातील एक शूर, हुशार आणि बुद्धिमान राजे आहेत. बरेच लोक त्यांना हिंदु हृदय सम्राट म्हणून ओळखतात. त्यांची गाथा आणि पराक्रम खूप अगणित आहे. त्यांनी आपल्याला साडेतिनशे वर्षाच्‍या गुलामगीरीच्‍या बंधनातुन मुक्‍त करून शांतीने जीवन जगण्याचा अधिकार दिला आहे.

छत्रपती शिवरायांचे अखंड कर्तृत्व या निबंधात मांडण्याचा केलेला हा छोटासा प्रयत्न आहे. आपण हा निबंध आपल्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी वापरू शकता.

निबंधामध्ये समाविष्ट केलेले मुद्दे

शिवाजी महाराज यांच्या विषयी माहिती - Shivaji Maharaj Information In Marathi

अष्टपैलू छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यामुळे त्यांना एक आदर्श मानून संपूर्ण महाराष्ट्रात 19 फेब्रुवारी रोजी त्यांची जयंती साजरी केली जाते.

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ या दिवशी म्हणजेच १९ फेब्रुवारी १६३० रोजी महाराष्ट्राच्या जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव शिवाजी शहाजीराजे भोसले होते. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले आणि आईचे नाव जिजाबाई होते.

शिवरायांचे वडील शहाजीराजे हे त्याकाळी विजापूरच्या मोगल शासकाचे सरदार म्हणून कार्यरत होते आणि त्यांची आई जिजाबाई वीर, बुद्धिमान आणि हिंदवी स्वराज्यासाठी आपले जीवन समर्पित करणारी माता होती.

शिवाजी महाराज बालपण

शिवरायांचे बालपण हे त्यांच्या आईच्या मार्गदर्शनाखाली घडले. बालपणामध्ये शिवरायांबरोबर मावळे खेळायचे. शिवराय जेव्हा खेळ खेळायचे तेव्हा ते एक नेता व्हायचे आणि धैर्य दाखवायचे. मावळे हेच शिवरायांचे प्रथम सवंगडी होते. जिजाबाई शिवाजी महाराजांना लहानपणापासूनच राम, कृष्णाच्या, कर्तृत्ववान योध्यांच्या आणि पराक्रमी भिम अर्जुनाच्या गोष्टी सांगत असत. या गोष्टी सांगत सांगत जिजामाता त्यांच्यावर संस्कार करीत होत्या.

बालपणामध्ये शिवरायांना तलवार चालवणे, धर्म, संस्कृती, नीतिमत्ता, राज्यव्यवस्था, सुसंस्कार, शिक्षण, युद्धशास्त्र, राजकारण न्यायशास्त्र, प्रजाहितदक्ष राज्यकारभार, गनिमी कावा आणि घोडेस्वारी शिकण्यात आली.

त्यांनी शिवाजी महाराजांना धार्मिक शिक्षणासह निर्भयपणे जगण्याची शिकवण दिली. ज्यामुळे शिवाजी महाराजांमध्ये धार्मिक सहिष्णुतेची भावना ओसरली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्मांचा समान आदर केला.

वयाच्या 10 व्या वर्षी म्हणजे 14 मे 1640 रोजी शिवाजी महाराजांचे लग्न साईबाई निंबाळकर यांच्याशी झाले. त्यांच्या मुलाचे नाव संभाजी होते.  ते शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र होते. शिवाजी महाराजांना 8 पत्नी होत्या.

शिवाजी महाराजांचे शिक्षण

शिवाजी महाराजांच्या संगोपनापासून ते शिक्षण या सर्व गोष्टी आई जिजाबाईंच्या संरक्षणाखाली घडल्या.

दादा कोनदेव यांच्या मार्गदर्शनाखाली, शिवरायांना सर्व प्रकारच्या युद्धनौका इत्यादी गोष्टी शिकविण्यात आल्या. धर्म, संस्कृती, युद्धाचे आणि राजकारणाशी संबंधित योग्य शिक्षण दिले गेले. त्या काळातील, परम संत रामदेव यांच्या संपर्कात येऊन शिवाजी पूर्णपणे देशभक्त, कर्तव्यदक्ष आणि कष्टकरी योद्धा बनले. शिवाजी महाराजांना आपल्या देशावर प्रेम करायला गुरु रामदास यांनी शिकवले.

शिवाजी महाराजांनी युद्धाशी संबंधित अनेक विषय शिकले होते. त्या काळातील वातावरण आणि घटना त्यांना चांगल्या प्रकारे समजण्यास सुरवात झाली.  स्वातंत्र्याची ज्योत त्यांच्या हृदयात पेटली. त्यांनी एकत्र येऊन काही विश्वासू मित्रांना, सहकार्‍यांना आणि मर्द मावळ्यांना एकत्र केले आणि गनिमी युद्धासाठी तयार केले.

मुघलांनी राज्य केले तेव्हा हिंदूंना बर्‍याच अडचणी, अन्याय सहन करावा लागत होता आणि विशेष कर द्यावा लागत होता. पण छत्रपती जन्माला आल्यापासून छत्रपतींना कोणत्याही माणसाला कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन करण्याची गरज नाही अशी त्यांची इच्छा होती. म्हणून शिवाजी महाराजांनी मुघलांशी युद्ध करण्याचा संकल्प केला.

शिवाजी महाराजांचे साम्राज्यावर आक्रमण

छत्रपती शिवाजी महाराज इतके धैर्यपूर्ण होते की, वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी किल्ल्यावर आपले अधिकार प्रस्थापित करण्यासाठी निजामशाहीशी लढायला सुरवात केली.

सन 1645 मध्ये शिवाजी महाराजांनी आदिलशाही सैन्याला न कळवता कोंडणा किल्ल्यावर हल्ला केला. त्यायानंतर आदिलशाही सैन्याने शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे यांना अटक केली आणि आदिलशाही सैन्याने कोंडाना किल्ला सोडण्याची मागणी केली. (जेव्हा तुम्ही कोंडाना किल्ला आम्हाला द्याल तेव्हा आम्ही शहाजी राजे यांना सोडू) वडिलांच्या सुटकेनंतर 1645 मध्ये शहाजींचा मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर शिवाजी महाराजांनी पुन्हा हल्ला करण्यास सुरवात केली.

सन 1659 मध्ये आदिलशहाने आपला धाडसी सेनापती अफजल खान याला शिवाजीला ठार मारण्यासाठी पाठवले. अफजल खान हा धिप्पाड शरीराचा माणूस होता. अफजल खानासमोर शिवाजी महाराज फार छोटे दिसत होते. तरीही शिवाजी आणि अफझल खान यांची भेट 10 नोव्हेंबर 1659 रोजी प्रतापगड किल्ल्याजवळील झोपडीत झाली.

या दोघांमध्ये एक अशी स्थिती ठेवण्यात आली होती की दोघांनीही आपल्याबरोबर एकच तलवार आणली पाहिजे.  शिवाजीला अफजलखानावर विश्वास नव्हता म्हणूनच शिवाजी महाराजांनी आपल्या कपड्याखाली चिलखत घातले, हातामधे वाघ नखे आणि बिचवा लपवला.

त्यानंतर ते अफजलखानाला भेटायला गेले. अफजलखानने शिवाजीवर हल्ला केला पण त्यांच्या अंगात चिलखत असल्यामुळे ते वाचले आणि तेव्हा शिवाजीने त्यांच्या हातामधे असलेल्या वाघ नखे आणि बिचव्याने अफजलखानावर हल्ला केला.

हा हल्ला इतका प्राणघातक होता की अफझल खान जाग्यावर गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला. त्यायानंतर शिवाजींनी आणि त्यांच्या मावळ्यांनी विजापूरवर हल्ला केला.

10 नोव्हेंबर 1659 रोजी शिवाजी महाराजांनी प्रतापगडच्या युद्धात विजापूर सैन्याचा पराभव केला. शिवाजीच्या मावळ्यांनी सतत आक्रमण करण्यास सुरवात केली आणि विजापूरच्या 3000 सैनिकांना ठार मारले आणि अफजलखानाच्या दोन मुलांना अटक केली.

शिवाजी महाराजांनी आणि मावळ्यांनी मोठ्या संख्येने शस्त्रे, घोडे आणि इतर सैन्य वस्तू ताब्यात घेतल्या. यामुळे शिवाजीचे सैन्य अधिक बळकट झाले. औरंगजेबाच्या मुघल साम्राज्यासाठी हा सर्वात मोठा धोका होता.

मुघल औरंगजेब यांचे लक्ष उत्तर भारत पासून दक्षिण भारतात सरकले. औरंगजेबाला शिवाजीबद्दल आधीच माहित होते. औरंगजेबाने त्यांचे मामा शाइस्ता खान यांना दक्षिण भारतातील सुभेदार बनविले होते. 

शाइस्ता खान आपल्या 150,000 सैनिकांसह पुण्यात पोहोचला आणि तेथे लूटमार करण्यास सुरवात केली. शिवाजी महाराजांनी आपल्या 350 मावळ्यांसोबत त्याच्यावर हल्ला केला. त्यानंतर शाइस्ता खान आपला प्राण वाचवुन पळून गेला आणि या हल्ल्यात शाइस्ते खानने आपली 3 बोटे गमावली.

या हल्ल्यात शिवाजी महाराजांनी शाइस्ते खानचा मुलगा आणि त्याच्या 40 सैनिकांचा वध केला. शाइस्ताखानाने मुघल सैन्यासह पुण्याबाहेर आश्रय घेतला आणि औरंगजेबाने शाईस्ते खानला दक्षिण भारतातून काढून बंगालचा सुभेदार बनविला.

या विजयानंतर शिवाजी महाराजांची शक्ती बळकट झाली. पण काही काळानंतर शाईस्ताखानने आपल्या 15,000 सैनिकांसह शिवाजींच्या बर्‍याच भागात जाळ लावून त्या जागा नष्ट केल्यात, नंतर शिवाजींनी या विधानाचा बदला घेण्यासाठी मुघलांच्या भागात लूटमार करण्यास सुरवात केली.

सन 1670 मध्ये, शिवाजी महाराजांनी सूरत शहरातून तब्बल 132 लाखांची मालमत्ता ताब्यात घेतली आणि परत शिवाजी महाराजांनी पुन्हा एकदा सूरत येथे मुघल सैन्याचा पराभव केला. शिवाजी महाराजांना पराभूत करण्यासाठी औरंगजेबाने बरेच प्रयत्न केले पण ते अयशस्वी झाला.

शिवरायांचा राज्याभिषेक

सन 1674 मध्ये शिवाजी महाराजांचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्यानंतर 4 ऑक्टोबर 1674 रोजी महाराष्ट्रातील रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. या कार्यक्रमात हिंदु स्वराज स्थापनेची घोषणा करण्यात आली.

त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांनी मावळ्यांच्या आणि सहकर्‍यांच्या साथीने मराठा साम्राज्य निर्माण केले आणि ते पहिले छत्रपती झाले. त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून त्यांनी प्रजेला भयमुक्त केले.

पण या स्वराज्यासाठी तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, प्रतापराव गुजर व मुरारबाजी या शूरवीरांनी प्राणाचे मोल दिले.

अखेर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज या युगपुरुषाचा मृत्यू 3 एप्रिल 1680 मध्ये रायगड येथे झाला आणि ते अजरामर झाले. नंतर महाराजांचा मुलगा संभाजी राजेंनी राज्य ताब्यात घेतले आणि मोगलांवर प्रभावीपणे राज्य केले.

निष्कर्ष

शिवरायांनी आपल्या साम्राज्यातील सर्व लोकांची काळजी घेतली. त्यांनी सर्व लोकांचे कल्याण केले आणि सर्व लोक स्वातंत्र्याने जीवन जगावे अशी त्यांची इच्छा होती. शिवाजी महाराजांनी कोणावरही अन्याय होऊ दिला नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा कोणत्याही धर्माशी नव्हता त्यांचा लढा हा अन्यायविरूद्ध होता. छत्रपती प्रजेच्या कल्याणासाठी आयुष्यभर झटले.

छत्रपती शिवाजी महाराज मराठा साम्राज्याचे संस्थापक आहेत. शिवाजी महाराजांच्या शौर्याचे जितके कौतुक होईल तितके कमी आहे. महाराष्ट्रात प्रत्येकजण शिवाजी महाराजांची जयंती आनंदाने साजरे करतात. त्यांच्या पराक्रमामुळे शिवराय एक आदर्श योद्धा म्हणून ओळखले जातात.

आज शिवाजी महाराज जिवंत असते तर त्यांना आजही लोकांकडून अफाट प्रेम आणि आदर मिळाला असता. त्यांनी अन्यायविरूद्ध लढा दिला म्हणून आपण त्याचे मनापासून आभार मानले पाहिजेत. भारत युगानुयुगे त्यांच्या बलिदानासाठी ऋणी राहील.

मला आशा आहे की, मित्रांनो तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी | Shivaji Maharaj Essay In Marathi हा मराठी निबंध आवडला असेल. तुम्हाला हा निबंध कसा वाटला याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेन्ट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि हा निबंध तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.  🙏🏻

वाचा ➡️ महात्मा गांधी निबंध मराठी ➡️ नरेंद्र मोदी यांचा मोबाईल नंबर ➡️ डॉ. ए पी जे अब्दुल कलाम माहिती मराठी

टिप्पणी पोस्ट करा

संपर्क फॉर्म.

MarathiGyaan - Essay, Speech, Stories and More

15 Shivaji Maharaj Stories In Marathi | शिवाजी महाराज च्या कथा | MarathiGyaan

15 shivaji maharaj stories in marathi | शिवाजी महाराज कथा | shivaji maharaj goshti.

छत्रपती शिवाजी महाराज हे खूपच महान मराठा शासक होते व त्यांनी आपल्या जीवनात खूप लढाया लढल्या आणि विजय हासील केली. शिवाजी महाराजांची प्रत्येक लढाई ची गोष्ट प्रेरणादायक आहे.

Shivaji Maharaj Stories In Marathi

त्यांमधून या काही शिवाजी महाराजांच्या कथा (Shivaji Maharaj Stories In Marathi) जे या आर्टिकल मध्ये सादर करत आहो. या शिवाजी महाराजांच्या गोष्टी तुम्हाला नक्की आवडेल.

  • बाजीप्रभूंना वीरगती
  • क्रूर सुलतान
  • मालोजींची कामगिरी
  • शहाजीराजेंचा विवाह
  • शिवरायांचा जन्म
  • पिता-पुत्र भेट
  • जिजाऊंचे संस्कार
  • सिंहाचा छावा
  • शिवराय-मावळे शपथविधी
  • स्वराज्याचा झेंडा
  • शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ
  • शिवरायांची दूरदृष्टी
  • पुरंदर जिंकला
  • शिवराय व मावळयांचा विजय
  • शहाजीराजांची सुटका

1. बाजीप्रभूंना वीरगती

baji prabhu veergati story in marathi

  Shivaji Maharaj Stories In Marathi : आदिलशहाने आता शिवरायांपुढे हात टेकले होते, कारण रोजच काही तरी नवीन घटना घडत होत्या त्यामुळे तो फारच काळजीत पडला होता. यासाठी काय करावे असा प्रश्न त्याच्यासमोर निर्माण झाला होता.

आदिलशहा अशा परिस्थितीत असतानाच त्याच्याकडे कर्नूलगडचा सरदार सिद्दी जौहर हा दाखल झाला. त्याने आदिलशहाला विश्वास दिला की, “तुम्ही काळजी करू नका. काहीही झाले तरी मी त्या शिवरायांना पकडल्याशिवाय गप्प बसणार नाही. मग त्यासाठी मला कितीही वेळ लागला तरी चालेल. शिवराय ज्या किल्ल्यावर असतील तेथेच त्यांना वेढा घालतो आणि मग गडावरचा दाणागोटा संपला तर त्यांना आपल्याला शरण यावेच लागेल.”

जर शिवराय पन्हाळयावर असतील तर ते पूर्णपणे अडकणार; कारण त्या गडाला चोरवाटा देखील नाहीत व भुयार देखील नाही. मग ते निसटून कोठे जाणार? विशाळगडाशिवाय दुसरा गड नाही म्हणून त्या गडाला देखील वेढा घालीन. तुम्ही बघाच मग ते माझ्या कचाटयात कसे अडकतात ते. आपण त्यासाठी दिल्लीच्या औरंगजेबाची देखील मदत घेऊ कारण त्याला देखील शिवरायांनी त्रास दिलेला आहे.”

आदिलशहाला सिद्दी जौहरच्या बोलण्यामुळे खूप धीर आला व आनंद देखील झाला. कारण सिद्दी जौहर हा अतिशय कठोर शिस्तीचा आणि जे तो बोलतो ते तो करून दाखवतो असा होता म्हणूनच आदिलशहाने लगेचच ‘सलाबतजंग’ हा किताब देऊन त्याचा गौरव केला. त्याने सिद्दीला भरपूर फौज, शस्त्रास्त्रे, दाणागोटा दिला. त्याशिवाय औरंगजेबाची मदत मिळविण्यासाठी त्याला निरोप देखील पाठविला. सिद्दी जौहर हा मान-सन्मान मिळाल्यामुळे खूपच खुश झाला होता. सिद्दी प्रचंड फौज, भरपूर शस्त्रात्रे, दारूगोळा आणि हुशार सरदार बरोबर घेऊन पन्हाळगडाकडे निघाला.

पन्हाळगडावर शिवरायांना ही बातमी समजली तेव्हा त्यांनी लगेच योजना तयार केली व त्याप्रमाणे त्यांनी आदिलशहाच्या फौजेची विभागणी व्हावी, या हेतूने सरसेनापती नेताजी पालकर यांच्याबरोबर भरपूर फौज देऊन त्यांना आदिलशाही मुलखाची धूळधाण करायला पाठविले.

सिद्दी जौहर मोठया फौजेबरोबर कोल्हापुरावर चालून येत आहे, असे शिवरायांना समजताच त्या प्रचंड मोठया फौजेसमोर मैदानावर लढायला आपले बळ कमी पडणार असे लक्षात येताच त्यांनी कोल्हापूर ठाणे मोकळे करून आपली सर्व फौज पन्हाळगडावर आणली.

सिद्दीच्या आता आपोआपच कोल्हापूर ताब्यात आले. त्यानंतर त्याने पन्हाळगड व विशाळगडाला वेढा दिला. तेव्हा पावसाळा देखील सुरू झाला होता. असे तीन महिने होत आले तरी सिद्दी गडाला वेढा देऊन वाट पाहात होता. त्यात भर म्हणून राजापुरचे इंग्रज अधिकारी लांब पल्ल्याच्या तोफा आणि भरपूर तोफगोळे घेऊन सिद्दीच्या मदतीला आले, तर औरंगजेबाने आपले मामा शाहिस्तेखानाला मोठी फौज देऊन स्वराज्यामध्ये धुमाकूळ घालायला दक्षिणेत पाठवले. शाहिस्तेखानाने बरोबर त्याप्रमाणे दक्षिणेत येऊन मुलूख जाळीत, लुटालूट करीत धुमाकूळ घातला आणि शेवटी त्याने पुण्यात येऊन शिवरायांच्या लाल महालात मुक्काम ठोकला.

सिद्दी जौहरचा पन्हाळयाचा वेढा उठण्याची कोणतीच चिन्हे दिसत नव्हती. गडावरील दाणागोटा आणि गुरांचा चारा आत संपत आला होता. आता काहीतरी हालचाल करायलाच पाहिजे असे ठरवून शिवरायांनी एका रात्री अतिशय गुप्तपणे आपल्या हेरांना गडावरून निसटून जाण्यासाठी एखादी चोरवाट कुठे मिळते का ते पाहण्यासाठी बाहेर पाठविले. त्याप्रमाणे ते हेर पुन्हा गडावर आले व त्यांनी शिवरायांना त्याची माहिती दिली.

शिवरायांनी रात्री आपल्या विश्वासू सहकाऱ्यांबरोबर विचार विनिमय करून कसे निसटून जायचे, याची युक्ती सांगितली. ही युक्ती पार पाडणे अतिशय कठीण होते परंतु त्याशिवाय दुसरा कोणताही उपाय नव्हता.

दुसऱ्या दिवशी शिवरायांचे वकील शिवरायांच्या सही-शिक्क्याचे पत्र आणि शरणागतीचे पांढरे निशाण घेऊन गड उतरून सिद्दी जौहरच्या छावणीकडे गेले व त्याला राजांचे पत्र दिले.

सिद्दीने ते पत्र वाचले तेव्हा त्याला व त्याच्या फौजेला फार आनंद झाला. आता आपली मोहिम यशस्वी होणार याची त्यांना खात्री वाटली. शिवरायांनी त्या पत्रात लिहिले होते की, ‘आमच्याकडून खर तर खूप मोठी चूक झाली आहे. आम्ही खरे तर आपल्यासारख्या हुशार सरदारापुढे केव्हाच शरण यायला पाहिजे होते. आपणास त्यामुळे उगीचच त्रास झाला. परंतु आता झाले ते झाले. आपण आता ते विसरून जावे. जर आपण शपथेवर आमच्या सुरक्षिततेची खात्री देत असाल तर उद्याच रात्री आम्ही आमच्या काही साथीदारांसह शस्त्रे खाली ठेवून, हात बांधून आपल्यासमोर हजर होऊ आणि गड आपल्या स्वाधीन करून आपल्या बरोबर विजापुर दरबारात येऊ.”

शिवरायांचे ते पत्र वाचून सिद्दीला मनातून खूपच आनंद झाला परंतु तसे न दाखविता शिवरायांच्या वकिलांना तो म्हणाला, “आम्ही रक्ताची शपथ घेऊन सांगतो की, आमच्याकडून किंवा इतरांकडून शिवरायांना कोणत्याही प्रकारची इजा अथवा दगा होऊ देणार नाही.”

सिद्दीचे हे बोलणे खोटे आहे हे राजांच्या वकिलांनी ओळखले होते परंतु त्याने तसे न भासविता ते सिद्दीचा निरोप घेऊन गडावर परत आले.

फाजलखानाने सिद्दीला सावध करण्याचा प्रयत्न केला पण त्याने सांगितले की, ‘मी अफजलखान नव्हे. आम्ही सर्व विचार करूनच मोहिमा आखतो. आता फक्त तुम्ही बघत राहा की आम्ही त्या शिवरायांची कशी फजिती करतो ते.’

शिवराय आता हात बांधून शरण येणार ही बातमी कळताच सिद्दीच्या फौजेला खूप आनंद झाला होता. कारण त्यांनी चार महिने पावसात मनात सारखी भीती धरून घालवले होते. दोन घास देखील त्यांनी कधी सुखाने खाल्ले नव्हते म्हणून फौज फार कंटाळली होती. त्यातच आता शिवराय शरण आल्यावर आपल्याला विजापुरात परत जाता येणार यामुळे सर्व सैनिक खाणे-पिणे, नाच-गाणे यामध्ये मशगुल होते त्यामुळे गडाचा वेढा सैल झाला व शत्रू गाफिल झाला.

शत्रू गाफिल आहे हे बघताच पाच-सहाशे मावळे आणि बाजीप्रभू यांच्यासह शिवराय गडावरून गुपचूप बाहेर पडले.कोणी घोडयावरून तर कोणी पायी निघाले. शिवरायांच्या चेहऱ्याशी साम्य असलेला शिवा न्हावी वेषांतर करून शिवाजीराजे बनला होता. शिवराय घोडयावरून निघाले आणि शिवराय बनलेला शिवा न्हावी पालखीत बसून निघाले. ते पुढे-पुढे सरकत आणि पहारे चुकवत निसरडया उताराजवळ आले व एक-एक जण सावधगिरीने खाली उतरून विशाळगडाच्या वाटेला लागले.

सिद्दीच्या एका माणसाने राजांची पालखी व मावळयांना वाटेत बघितले व तो लगेच त्याच्याकडे गेला. त्याने त्याला सावध करीत सांगितले, “शिवराय पालखीत बसून विशाळगडाकडे पळून चालले आहेत.”

शिवरायांना माहितच होते की, ही बातमी सिद्दीपर्यंत पोहोचणारच आहे म्हणूनच त्यांनी वेषांतर केले होते. शिवराय व बाजीप्रभू व इतर मावळयांसह एका आडवाटेने विशाळगडाकडे अतिशय वेगाने निघाले.

शिवराय पालखीत बसून पळाले हे सिद्दीला समजले. सिद्दीने लगेचच आपला जावई मसूदला काही फौज देऊन शिवरायांच्या पाठीमागे पाठविले. मसूद धावत गेला आणि पालखीत बसलेल्या राजांना काही वेळातच पकडून घेऊन आला.

पालखीतून उतरलेल्या राजांना सिद्दीने तंबूत नेऊन गादीवर बसवले व तो म्हणाला, “काय राजे, आज तुम्हाला माझ्या रूपाने शेरास सव्वाशेर भेटला की नाही?”

तितक्यात एक हेर सिद्दी जौहरकडे पाहात म्हणाला, “खाविंद, हे काही खरे शिवराय नाहीत. हा तर शिवा न्हावी शिवरायांसारखा वेष केलेला.”

ते ऐकताच सिद्दी खूपच खजील झाला. ही गोष्ट जर बेगम साहेबांना समजली तर आपले काही खरे नाही, असा विचार करून त्याने परत आपल्या जावयाला खऱ्या शिवरायांना पकडून आणण्याचा हुकूम दिला.

मसूद लगेचच मोठी फौज घेऊन शिवरायांच्या पाठलागावर निघाला. तेव्हा शिवराय व मावळे दमून गजापूरच्या खिंडीजवळ आले होते. तेवढयात त्यांना सिद्दीचे सैन्य पाठलाग करीत आहे असे समजले. तेव्हा शिवराय म्हणाले, “आता दुश्मन जवळ आलेला दिसतो व त्याची फौज देखील मोठी आहे. आपली फौज फार तर पाच-सहाशे. त्यातही ती धावपळ करून थकलेली आहे. परंत तरी देखील आता प्राणपणाने लढण्याशिवाय गत्यंतर नाही.”

ते ऐकून मावळे आणि बाजप्रभूने शिवरायांना पुढे जाण्याची विनंती केली व सांगितले, “लाख मरोत; परंतु लाखोंचा पोशिंदा जगो, अशी म्हण आहे. आमच्यासारखे अनेक सेवक मिळतील; पण स्वराज्याचा तारणहार शेकडो वर्षातून फक्त एकदाच जन्म घेतो. आपण घाई करा महाराज आणि काही मावळे घेऊन विशाळगडाकडे जा. गडावर पोहोचताच तोफांचे तीन बार उडवा. तोफांचे आवाज कानी पडेपर्यंत आम्ही आमच्या छातीचा कोट करून लढू आणि शत्रूला ही खिंड ओलांडू देणार नाही.”

शिवराय अतिशय जड अंतःकरणाने काही मावळयांना बरोबर घेऊन विशाळगडाकडे निघाले.

शिवराय गेल्यावर मावळे आणि बाजीप्रभू खिंड लढवण्यासाठी उभे राहिले. त्यातील काही मावळे खिंडीच्या वरच्या बाजूला गेले. तेवढयात दोन-दोन करीत गनिम मावळयांवर चालून आले.

खिंडीच्या वर असलेल्या मावळयांनी ‘हर हर महादेव’ अशी गर्जना केली व मोठ-मोठे दगड घेऊन त्यांनी शत्रूच्या अंगावर टाकायला सुरूवात केली. शत्रूची डोकी फुटून ते रक्तबंबाळ होत होते. बाजी व मावळे हे जीव खाऊन लढत होते. पराक्रमाची शर्थ करीत खिंडीत पाय रोवून पहाडासारखे उभे होते. भराभर शत्रूची मुंडकी उडवत प्रेतांचा खच पाडत होते. काहीजण लढता लढता स्वःत देखील कोसळत होते. तेवढयात बाजीचा भाऊ एका बाणाने धरणीवर कोसळला. परंतु तरी देखील बाजीप्रभू मात्र प्राणपणाने लढतच होते. ते बघून मावळे जोरदार लढू लागले होते. शत्रूच्या माना ते सपासप कापत होते.

बाजीप्रभू देखील रक्ताने न्हाऊन निघाले होते परंतु तरी देखील त्यांच्या हातातील तलवार त्यांनी सोडली नाही. त्यांचे सर्व लक्ष तोफेच्या आवाजाकडे होते. आता ते भोवळ येऊन जमिनीवर कोसळणार इतक्यात धडाम, धडाम असा तोफांचा आवाज आला. शिवराय विशाळगडावर सुखरूप पोहोचले हे जाणून बाजीप्रभूंनी सुखाने आपले प्राण सोडले.

शिवराय विशाळगडावर सुखरूप पोहोचून बाजीप्रभू व मावळयांची वाट बघत होते. इतक्यात काही मावळे वीर धावतच गडावर आले. बाजीप्रभूंना वीरगती प्राप्त झाली हे समजताच शिवरायांना खूपच वाईट वाटले. बाजीप्रभूंच्या पावन रक्ताने गजापूरची खिंड पावन झाली व तेव्हापासून त्या खिंडीचे नाव ‘पावनखिंड’असे पडले.

शिवरायांनी गजापूर खिंडीत ज्यांनी शौर्य गाजविले होते अशा मावळयांना बक्षिसे देऊन त्यांचा गौरव केला. जे लोक जखमी झाले होते त्यांच्या उपचाराची व्यवस्था केली. मावळयांच्या कुटुंबियांना दिलासा दिला. यानंतर शिवराय बऱ्याच दिवसांनी माँसाहेब आणि कुटुंबियांना भेटण्यासाठी राजगडाकडे गेले.

Read  Mahabharat Stories in Marathi | महाभारत कथा मराठीत

2. क्रूर सुलतान

shivaji story in marathi

Shivaji story in marathi: देवगिरीचा यादवकाळ हा अतिशय भरभराटीचा होता. तेथील प्रजा आनंदी होती. महाराष्ट्राच्या लोकमाता म्हणजेच भीमा, कृष्णा, गोदावरी, इंद्रायणी यांनी महाराष्ट्राची भूमी सुजलाम् सुफलाम् केली होती. सह्यगिरी देखील महाराष्ट्राचे रक्षण करीत होता. शेते पिकत होती. दूध-दुभते मुबलक होते. सगळी कोठारे धान्याने भरलेली होती. सण, उत्सव आले की सगळयांना अगदी जोश यायचा व सर्वजण मिळून एकत्र येऊन आनंद साजरा करायचे.

नाशिक, नेवासे नगरीमध्ये विद्येचा सुकाळ होता. सरस्वती विलसत होती. अलंकापुरीला वैभव प्राप्त झाले होते. संतवाणीने अज्ञानरूपी अंधःकार दूर होत होता. थोडक्यात असे म्हणावयास हरकत नाही की, महाराष्ट्राची भूमी ही पावन झाली होती.

महाराष्ट्राचे वैभव यादवकाळात शिखरावर पोहोचले होते. अगदी खऱ्या अर्थाने राजा रामदेवरायाचा काळ हा सुवर्णकाळ होता. साहित्य, कला, वैद्यकशास्त्र यातील प्रगती प्रशंसा करण्यासारखी होती. परंतु हे फार काळ टिकले नाही.

उत्तरेकडील शत्रू हा महाराष्ट्राच्या भूमीवर येऊन धडकला. देवगिरीवर शत्रूने आक्रमण केले. महाराष्ट्राची मंगल व पावन भूमी अफगाणी सैन्याने भ्रष्ट केली. दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दीन खिलजी हा विंध्याचल तुडवीत महाराष्ट्राच्या भूमीवर चालून आला.

देवगिरीचा राजा रामदेवराय हा अत्यंत शूर होता. तो शत्रूला घाबरून पळून जाणारा नव्हता. राजा रामदेवराय हा निधडया छातीचा होता त्यामुळे त्याने शत्रूचा नक्कीच पराभव केला असता परंतु त्याच वेळी त्याचा पुत्र शंकरदेव हा मोठे सैन्य घेऊन घरभेदी असलेल्या शत्रूचा पराभव करण्यासाठी देवगिरीपासून खूप दूर गेला होता. त्यामुळे राजा रामदेवजवळ अगदी मोजके सैन्य होते. शत्रूने बरोबर या गोष्टीचा फायदा घेतला. राजा तरीदेखील डगमगला नाही. शत्रूचा पराभव करण्यासाठी त्याने खूप प्रयत्न केला. मर्द मराठयांनी पराक्रमाची शर्थ केली. परंतु शत्रूपुढे त्यांचा निभाव लागला नाही.

इकडे शंकरदेवाला ही बातमी समजली व तो लगेचच आपली मोठी फौज घेऊन पित्याच्या मदतीस आला. दोन्ही सैन्यात परत घनघोर युध्द झाले. खिलजीला आता आपला पराभव होणार हे दिसू लागले म्हणून त्याने दिल्लीहून मोठी कुमक आल्याची खोटी अफवा पसरविली. त्या बातमीने रामदेवरायाच्या फौजेचे धैर्य खचले व सैनिक माघार घेऊ लागले. रामदेवरायाचा विजय होणार असून देखील खोटया अफवेमुळे त्याचा पराभव झाला.

युध्दात पराभव झाल्यानंतर अल्लाउद्दीन खिलजीने रामदेवरायाकडून जबरदस्त खंडणी वसूल केली. त्याने रामदेवरायाचा खजिना पूर्ण रिकामा केला. नंतर त्याने देवगिरी लुटण्याचा हुकूम आपल्या सैन्याला दिला. मग काय, त्याच्या सैनिकांनी तेथू धुमाकूळ घालून सर्व स्त्रिया व मुले यांच्यावर अत्याचार केले. त्यांनी लुटून, जाळून देवगिरी नगरी उध्वस्त केली.

आपल्या प्रजेची अवस्था बघून राजा रामदेवराय फार दुःखी झाला परंतु त्याला काहीही करता येत नव्हते. अल्लाउद्दीन खिलजीने राजा रामदेवरायाकडून वार्षिक खंडणी देण्याचे करवून घेतले व तो दिल्लीकडे जाण्यास निघाला. तेथे गेल्यावर त्याचे मोठे स्वागत करण्यात आले. दिल्लीचा सुलतान आपण व्हावे म्हणून त्याने दिल्लीच्या आधीच्या सुलतानाची हत्या केली व तो दिल्लीचा सुलतान बनला व तो अजूनच क्रूर झाला.

खिलजीने राजा रामदेवरायाकडून खंडणी वसूल करण्यास सुरूवात केली. काही काळानंतर राजाला खंडणी देणे शक्य होत नव्हते. त्यामुळे खिलजी खूपच चिडला व त्याने परत आपला सेनापती मलिक काफूरला सैन्य घेऊन देवगिरीवर चालून जाण्यास सांगितले. पुन्हा एकदा रामदेवराय व त्याचा पुत्र शंकरदेव यांनी अतिशय शर्थीने झुज दिली परंतु त्याच्या राक्षसी ताकदीपुढे देवगिरीचा निभाव लागला नाही. त्यामुळे राजा रामदेवरायाला कैद करण्यात आले. राजाचा अपमान करण्यात आला. इतकेच नाही तर त्याला अंधारकोठडीत टाकण्यात आले. काही काळानंतर नियमितपणे खंडणी देण्याचे राजाने आश्वासन दिले म्हणून राजाची सुटका करण्यात आली. परंतु रामदेवरायाचा अपमान झाल्यामुळे तो मनाने फार खचला होता व त्यामुळे काही दिवसातच त्याचा मृत्यू झाला.

रामदेररायाचा मृत्यू झाल्यावर त्याचा पुत्र शंकरदेव हा खूपच संतापला. त्याने दिल्लीच्या सुलतानाला खंडणी न पाठविण्याची जणू प्रतिज्ञाच केली होती. ते पाहून खिलजी परत सूडाने पेटला व त्याने परत एकदा मलिक काफूरला मोठे सैन्य घेऊन देवगिरीवर पाठविले.

शंकरदेवाने त्या फौजेशी निकराने झुंज दिली परंतु त्यात त्याला यश मिळाले नाही व दुर्दैवाने लढता लढता त्याचा मृत्यू झाला. शेवटी देवगिरीला कोणी वाली उरला नाही.

सुलतानशाहीने देवगिरी राज्याचे तुकडे पाडले. तेथे सुभेदारांच्या नेमणुका करण्यात आल्या व ते सुलतान स्वतःलाच सुलतान समजू लागले. त्यांच्या अत्याचाराला तेथील प्रजा खूप कंटाळली. प्रजेची ही अवस्था पाहून रामदेवरायाचा जावई हरपालदेव पुढे आला व त्याने प्रजेला धीर दिला. त्याने शत्रूला दहशत बसविली त्यामुळे काही काही का होईना प्रजेला धीर मिळाला. त्याने काही आक्रमकांना यमसदनास देखील पाठवले हे पाहून काही सुभेदार दिल्लीला पळून गेले.

दिल्लीला सुलतान अल्लाउद्दीन खिलजी याचा मृत्यू झाला. सिहांसनासाठी भांडणे सुरू झाली. या भांडणात मलिक काफूर मारला गेला व कुतुबुद्दीन दिल्लीचा सुलतान बनला. तो देखील अतिशय क्रूर होता. तो देखील काही सैन्य घेऊन देवगिरीवर चालून गेला. हरपालदेवाने देवगिरी वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला परंतु त्यांच्यापुढे त्याचे काही चालले नाही. शत्रूने त्याला ठार केले. देवगिरी परत लुटली गेली. देवगिरीची व्यवस्था पहाण्यासाठी परत जुलमी सरदारांची नेमणूक करून शत्रू दिल्लीला परतला.

परत एकदा त्यामुळे देवगिरीची अवस्था पूर्वीसारखीच दयनीय अशी झाली. ही परिस्थिती असताना दुसरीकडे सुलतानाने नेमलेले सरदार व त्यांचे शिपाई आपली स्वतःची चैन करण्यात मशगुल झालेले होते. त्यांनी प्रजेला अतिशय त्रास दिला. इतकेच नाही तर त्या सरदांरांनी दिल्लीच्या सुलतानाची सत्ता झुगारून दिली व ते स्वतःच सुलतान बनले.

अहमदनगरचा निजामशहा, विजामपुरचा आदिलशहा, बिदरचा बेरीदशहा, गोवळकोंडयाचा कुतुबशहा व एलिचपुरचा इमादशहा या सरदारांनी आपापली स्वतंत्र राज्ये स्थापन केली. या प्रदेशात अशा प्रकारे या प्रदेशात पाच सत्ता उदयास आल्या व त्यांनी हिंदू प्रजेला गुलामगिरीत ढकलले व त्यांच्यावर सत्ता गाजविण्यास सुरूवात केली. तेव्हा दिल्लीचे सिंहासन बाबराने बळकावले. दिल्लीत मोगल सत्तेचा उदय झाला जणू काही महाराष्ट्राच्या सुखाला ग्रहणच लागले होते.

Read Sanskar Katha in Marathi | संस्कार कथा मराठीत

3. मालोजींची कामगिरी

shivaji maharaj real story in marathi

Shivaji maharaj real story in marathi: दिल्लीमध्ये मोगलशाहीने आपला जम बसवला तसेच दक्षिणेकडे पाच सुभेदारांनी पाच स्वतंत्र राज्ये स्थापन केली. दक्षिणेत त्यांच्या मनाप्रमाणे कारभार सुरू झाला त्यामुळे ते स्वतःला सुलतान समजू लागले. दक्षिणेतील विजयनगर येथील हिंदू साम्राज्यावर सुभेदारांचा डोळा होता. 

विजयनगर हे भरभराटीस आलेले साम्राज्य बळकावण्यासाठी चार सुभेदार एकत्र येऊन ते विजयनगरवर चालून गेले. ही गोष्ट विजयनगरचा राजा रामराया याला समजली व तो देखील आपल्या सैन्यासह युध्दास निघाला. रामरायाने शत्रूला वाटेतच गाठून त्यांच्याशी युध्द करण्यास सुरूवात केली. शत्रूचे सैन्य प्रचंड असल्यामुळे रामरायाच्या सैन्याचा टिकाव त्यांच्यापुढे लागत नव्हता. रामरायाच्या घरभेद्यांनी घात केल्यामुळे त्याला शत्रूच्या ताब्यात जावे लागले. शेवटी निजामशहाने रामरायाचा शिरच्छेद केला व त्याची घोर विटंबना देखील केली त्यामुळेच विजयनगरचा पराभव झाला.

परकीय सुलतानांच्या राजवटीमध्ये प्रजेला अनेक दुःखांना सामोरे जावे लागले त्यामुळे हिंदू साम्राज्ये एकामागे एक अशी धुळीला मिळत होती. क्रूर सुलतानशाहीत प्रजेच्या जीवाची, अब्रूची कसलीच शाश्वती उरली नाही म्हणून सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले. लोक भीतीमुळे सुलतानाचे खोटेच कौतुक करत होते.

लोक सण व उत्सव देखील साजरे करू शकत नव्हते. ते सर्व आपापसात भांडत होते आणि शत्रूचा पराभव करण्याऐवजी एकमेकांना मारत होते. काही लोकांच्या मनात मात्र आपल्या संस्कृतीचा अभिमान जागृत होत होता, मनात सूड घ्यायची इच्छा होत होती पण पुढे येणारा कोणी नव्हता.

दिल्लीचा बादशहा अकबर याने आपला मुलगा शहजादा मुराद याला मोठे सैन्य घेऊन दक्षिणेकडे पाठविले. ते बघून निजामशहा, आदिलशहा व कुतुबशहा मुघल सत्तेच्या विरोधात उभे राहिले तेव्हा त्यांच्याकडे बरेच सैनिक हे मराठे व रजपूत होते. मराठेच आपापसात लढत आहेत हे बघून बादशहा व सुलतान यांना मात्र खूप आनंद होत होता. थोडक्यात काय तर बादशहा व सुलतान यांच्या राज्यासाठी हिंदूच एकमेकांना मारत होते.

जर ते सर्व एकत्र येऊन लढले असते बादशहाचा पराभव करू शकले असते. परंतु काही मराठे मात्र या काळोखाकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या एका वीराची वाट पहात होते. तोपर्यंत ते आपल्या प्रजेचे होणारे हाल व कष्ट फक्त उघडया डोळयांनी पाहात होते.

सर्व महाराष्ट्र गुलामगिरीत अडकला होता आणि त्याच वेळी वेरूळचे बाबाजी भोसले हे राजवंशातले असून सात-आठ गावांची पाटिलकी सांभाळत होते. बाबाजींची मालोजी व विठोजी ही दोन मुले आता मोठी झाली होती. ते दोघेही तलवारबाजी शिकले होते. घृष्णेश्वराचे प्राचीन देवालय वेरूळला होते. या घृणेश्वराची पाटील घराण्याकडून नित्यनियमाने पूजा होत असे.

एकदा मालोजी शेत नांगरत असताना त्यांना खूप सुवर्णमोहरा असलेला हंडा सापडला. तेव्हा त्यांनी ते धन प्रजेच्या कल्याणासाठी उपयोगात आणण्याचे ठरविले. मालोजींनी घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि त्याच्या पूजे-अर्चेची व्यवस्था लावून दिली. त्यांनी प्रजेच्या संरक्षणासाठी आपल्याकडे घोडेस्वारांची एक लहान फौज उभी केली. परंतु निजामाला वाटले की मोगलांविरूध्द लढण्यासाठी या फौजेचा उपयोग आपल्याला होईल म्हणून त्याने मालोजीकडे दुर्लक्ष केले व त्या दोन्ही भावांना आपल्याकडे ठेवून सरदारकी देखील दिली. प्रजेला होणाऱ्या त्रासातून सोडविण्यासाठी त्यांनी सरदारकी पत्करली व ते योग्य संधीची वाट पाहू लागले.

Read   Isapniti Stories in Marathi With Moral | इसापनीती कथा

4. शहाजीराजेंचा विवाह

shahaji raje marriage story in marathi

Shivaji Maharaj Stories In Marathi: नाईक निंबाळकर यांच्या घराण्यातील उमाबाई यांच्याशी मालोजींचा विवाह झाला. पुढे त्यांना शहाजी व शरीफजी असे दोन मुले झाली. मालोजींनी आपल्या दोन्ही मुलांना युद्धकलेत तयार केले व व्यवहारात देखील त्यांना पक्के केले. शहाजी यांचे वय पंधरा वर्षाचे होते तेव्हा त्यांचा विवाह जिजाबाई यांच्याशी झाला. या जिजाबाई सिंदखेडयाचे सरदार लखूजी जाधवराव यांची कन्या होय. 

जाधवराव हे अतिशय नावाजलेले घराणे होते. आता जिजाबाई भोसले या लक्ष्मी बनून त्या घरात आल्या. मालोजी आता दरबारी कामकाज पहात होते तेव्हा निजामशहाने त्यांना ‘असाल तसे लढाईवर जा’असा निरोप दिला. त्याप्रमाणे जंगदंबेला नमस्कार करून मालोजी राजे सर्वांचा निरोप घेऊन रणांगणाकडे निघाले. तेथे गेल्यावर मालोजींनी शत्रूशी शर्थीची लढाई केली परंतु अखेरीस इंदापुरच्या लढाईत ते कोसळले आणि शहाजीराजे मात्र एकटे पडले. जहागिरीचे काय असा प्रश्न होताच, परंतु चुलते विठोजी यांनी जहागिरीच्या सनदा शहाजीराजांच्या नावे करून आणल्या. शहाजीराजे निमाशाहीचे सरदार बनले.

मोगलांनी निजामशाहीची राजधानी अहमदनगर काबीज केले त्यामुळे निजामशाहीची राजधानी दौलताबाद बनले. तेव्हा शहाजीराजे जिजाबाईंसह दौलताबाद येथे राहू लागले. तेथील लोकांवर होणारे अत्याचार बघून जिजाबाईंना फार दुःख होत असे. जिजाबाईंच्या मनात विचार येत असे की, जर हे मर्द मराठे एकत्र आले तर या सर्व परकी सुलतानांचा पराभव करता येईल.

परंतु तसे न घडता वीर मराठे सुलतानशाहीत आपल्याच बांधवांना ठार करत होते. हे सर्व बदलले पाहिजे, पण हे सर्व कोण बदलणार! असा विचार करून जिजाबाईंचा जीव अतिशिय व्याकूळ होत हेाता. शहाजीराजे पराक्रमाची शर्थ करीत होते हे जिजाबाईंना दिसत होते. पण ते निजामासाठी लढत होते. परंतु एकच बाब समाधानाची होती की,लोकांवर होणारे अत्याचार कमी करता यावे म्हणून शहाजीराजे निजामशाहीचे सरदार बनले होते.

दिल्लीचा मोगल बादशहा मोठया सैन्याला घेऊन दक्षिणेत उतरला. त्यामुळे मोगल आणि आदिलशाही सैन्याशी निजामशहाच्या सैन्याची मोठी लढाई झाली. शहाजीराजांचे सासरे लखूजी जाधवराव मोगलांच्या बाजूने तर शहाजीराजे व त्यांचे बंधू शरीफजी निजामशहाच्या बाजूने एकमेकांशी लढत होते. लढता लढता त्यात शरीफजी ठार झाला. शहाजीराजे विजयी झाले परंतु सख्खे भाऊ मात्र गमावून बसले होते.

या पराक्रमामुळे निजामशहाच्या दरबारात शहाजीराजांचा मान वाढला परंतु निजामशहाचा वजीर मलिक अंबर याला ही गोष्ट मान्य नव्हती. तो शहाजीराजांचा अतिशय व्देष करत असे म्हणूनच ते आदिलशाहीत दाखल झाले. त्यामुळे आदिलशहा खूष झाला त्यांनी शहाजीराजांना ‘सरलष्कर’ हा किताब दिला. आता लढायांचे प्रमाण वाढले हाते. प्रजेवर अत्याचार होत होते, अन्याय होत होता. हा अन्याय कोण दूर करणार? हा प्रश्नच होता.

Read  Love Stories in Marathi | मराठी प्रेम कथा | Romantic Stories in Marathi

5. शिवरायांचा जन्म

shivaji maharaj birth story in marathi

Shivaji maharaj birth story in marathi: सर्व मराठयांनी एकत्र येऊन सुलतानशाहीचा अस्त करावा आणि पवित्र भूमीवर स्वकियांचे प्रजेचे कल्याण साधणारे राज्य स्थापन व्हावे, असे जिजाबाईंना मनापासून वाटत होते. परंतु हे सर्व कसे होणार? कोण करणार? हीच काळजी रात्रंदिवस जिजाबाईंना सतावत असे. त्यामुळे त्या चिंतेने त्यांची झोप उडाली होती.

तेव्हा दिल्लीच्या सिंहासनावर शहाजहान बादशहा बसला तर इकडे आदिलशहाचा अंत झाला. त्याच्यानंतर त्याचा मुलगा अहमद आदिलशहा आला. निजामाचा वजीर मलिक अंबर हा मरण पावला आणि फतेखान वजीर झाला. अशा प्रकारे सत्तेवरील सारेच मोहरे बदलले आणि हे सर्व जण क्रूर, धर्मांध व महाकारस्थानी असे होते. आता यासाठी काय उपाय करावा अशी काळजी शहाजीराजांना लागली होती.

असे असतानाच निजामाने शहाजीराजांना परत आपल्याकडे बोलावले होते. लखूजी जाधवराव देखील निजामाच्या दरबारातच दाखल झाले होते. अशा रितीने सर्व वातावरण अतिशय अस्थिर व अशांत होते. नेमके याच वेळी जिजाबाईंना बाळ येणार असल्याची चाहूल लागली होती. जिजाबाईंचे बाळंतपण सुखरूप व सुरक्षित वातावरणात व्हावे म्हणून शहाजीराजांनी त्यांची व्यवस्था गड शिवनेरीवर केली होती. शिवनेरी बुलंद गड. त्यावरील गडकरी हे नात्यातले व विश्वासू. जिजाबाईंना तेथेच ठेवायचे असे ठरले. तेव्हा गडकरी विजयरावांनी देखील राजांना खात्रीने सांगितले की, ‘राजे आपण काळजी करू नका व निश्चिंत रहा. आम्ही माँसाहेबांच्या केसाला देखील धक्का लागू देणार नाही, याची तुम्ही खात्री बाळगा.’ शहाजीराजे आता निश्चिंत झाले व परत निजामदरबारी रूजू झाले.

गडावर शिवाईदेवीचे मंदिर होते. तेथे रोज भजन किर्तन चालत असे. रामायण व महाभारत ऐकण्यात जिजाबाई अगदी गुंग होऊन जात असे. फाल्गुन वद्य तृतीयेची पहाट झाली आणि जिजाबाईंनी देवीला मनोभावे नमस्कार केला व प्रार्थना केली, “माते जगदंबे, या भूमीला दास्यातून मुक्त करणारा, हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारा वीरपुत्र माझ्या पोटी जन्म घेऊ दे.” असे म्हंटल्यावर काही वेळानेच जिजाबाईंनी सुर्यासारख्या तेजस्वी पुत्राला जन्म दिला. तो दिवस होता १९ फेब्रुवारी १६३०, हा अतिशय शुभ दिवस होता. कारण, विव्दान पडितांनी त्यांचे भविष्य सांगितले ते असे की, “हा पुत्र दिगंत कीर्ती संपादन करेल व या भूमीला दास्यातून मुक्त करेल. स्वराज्याची स्थापना करेल आणि छत्रपती होईल.” ही पंडिताची मंगलवाणी ऐकून सर्वत्र आनंदी आनंद झाला. पंडितांना द्रव्यदान करण्यात आले.

बाराव्या दिवशी बाळाचे बारसे झाले व शिवाजी असे नांव ठेवण्यात आले. शिवाजीराजे. जिजाबाईंचा आनंद गगनात मावत नव्हता. खरोखरच १९ फेब्रुवारी १६३० हा दिवस भाग्याचा व थोर असेच म्हणावयास हवे.

काही दिवसांनी शहाजीराजांनी आपल्या पुणे-सुपे या जहालगिरीलगतचा काही मुलूख जिंकून घेतला तो मुलूख आदिलशाहीतील होता. त्यामुळे आदिलशाहीच्या सैन्याने पुण्याची जाळून राखरांगोळी केली. शत्रूने पुणे लुटले. या बातमीने जिजाबाईंचे मन अतिशय दुःखी झाले. यापूर्वी देखील त्यांनी अशी अनेक मोठी दुःखे पचविली होती.

काही काळानंतर सगळीकडे भीषण दुष्काळ पडला. तरीदेखील जिजाबाई या डगमगल्या नाहीत. या संकटांना आपण अतिशय धीटपणे तोंड दिले पाहिजे असा जणू त्यांनी निर्धारच केला होता. त्यांना एकच आशा होती ती आपल्या पुत्ररत्नाची. माझा हा पुत्रच रामकृष्णाप्रमाणे दुष्टांचा नायनाट करून श्रींचे राज्य स्थापन करील, अशी त्यांची खात्री होती.

बादशहाला शहाजीराजांची गरज उरली नाही त्यामुळे अपमान सहन करण्यापेक्षा मोगलांना सोडून जायचे आणि वेळ येताच या मोगलांना धडा शिकवायचा असे त्यांनी ठरविले. वजीर फत्तेखान हा स्वःत वजीर बनला व मोगलांनी निजाम आणि त्याचा वजीर फत्तेखान यांनाच ताब्यात घेतले. हे पाहून आदिलशहाला वाटले की, मोगलांनी जर निजामशाही कब्जात घेतली तर ते फारच डोईजड होतील व उद्या आपल्यावर देखील हीच वेळ येऊ शकते. हे सर्व शहाजीराजे पाहात होते तेव्हा त्यांनी या संधीचा फायदा घेऊन निजामशहा व आदिलशहा यांना एकत्र आणले.

निजामांचा वजीर मोगलांच्या ताब्यात असल्यामुळे सैन्याला हुकूम कोण करणार या प्रश्नामुळे शहाजीराजांनी मूर्तजा नावाच्या मुलाला निजामाच्या गादीवर बसविले व ते स्वतः वजीर बनले आणि निजामाच्या नावाने स्वतः राज्यकारभार पाहू लागले.

परंतु या सगळया धावपळीत शहाजीराजांना शिवनेरीवर जाऊन आपल्या पुत्राला मात्र भेटता आले नव्हते, बालशिवबांचे मुख पाहाता आले नव्हते. आता शिवबा मोठे होत होते. वाडयामध्ये सर्वत्र त्यांचे दुडूदुडू धावणे सुरू झाले होते. शिवरायांच्या बाललीला पाहाण्यात दिवस कसा जात होता हे जिजाबाईंना कळत देखील नव्हते.

Read  Krishna Stories in Marathi | श्री कृष्ण च्या गोष्टी मराठी मध्ये

6. पिता-पुत्र भेट

Shivaji maharaj marathi goshti

Shivaji maharaj marathi goshti: शिवबा जसजसे मोठे होऊ लागले तसतसे त्यांना अनेक सवंगडीदेखील मिळाले. ते त्यांच्याशी खेळण्यात रममाण होत असे. त्यांना मर्दानी खेळ खेळण्यास खूप आवडत असे. जिजामाता शिवबांना रामायण-महाभारतातल्या गोष्टी सांगत व ते त्या अतिशय लक्षपूर्वक ऐकत असे. शिवबा त्या गोष्टी लक्षात ठेवून खेळामध्ये राम, कृष्ण किंवा हनुमान बनून आपल्या सवंगडयांशी युद्धाचे खेळ खेळत असत आणि अशा छोटयाशा लढाईत शिवबा विजयी होत असे. थोडे जरी शिवबांच्या मनाविरूध्द घडले तर त्यांना ते आवडत नसे.

जिजामाता शिवबांना काही गोष्टी समजावून सांगत व म्हणत, “शिवबा, आपल्या राज्यात खूप शत्रू आहेत. ते आपल्या लोकांवर अन्याय करून त्यांना खूप त्रास देतात. त्यांच्यावर अत्याचार करतात. आपला महाराष्ट्र त्यांच्या अत्याचारामुळे गेली तीनशे ते साडेतीनशे वर्ष रडतो आहे म्हणून आता तू त्या शत्रूला रडव आणि आपल्या प्रजेला हसव. माझी तुझ्याकडून एवढीच अपेक्षा आहे आणि ती तू पूर्ण कर.”

शिवबा मातेचे बोलणे अगदी लक्ष देऊन ऐकत असे. शिवबांच्या मनावर त्या गोष्टींचा परिणाम झालेला देखील दिसत असे. शूर माणसे रडत नाही तर ती आपल्या शत्रूला रडवतात, हे शिवबांच्या लक्षात आले. शिवबा खेळताना पडले किंवा त्यांना लागले तरी देखील ते तोंडातून काही शब्द काढत नसे व त्यासाठी काही तक्रार देखील करत नसे.

शिवबा कधी-कधी खेळताना मातीचे किल्ले करण्यात खूप गढून जात असे. ते त्यावर मातीची केलेली चित्रे ठेवून लढाईचा देखावा निर्माण करीत. अशा प्रकारे शिवबा लहानाचे मोठे होत होते.

शहाजीराजांनी त्यांच्या पराक्रमाने उभा महाराष्ट्र ढवळून काढला होता. त्यांना आपल्या पुत्राला भेटण्याची खूप ओढ लागली होती. जिजाऊसाहेब देखील त्यांची आतुरतेने वाट बघत होत्या. अखेर शहाजीराजे आपल्या छोटया शिवबाला भेटण्यासाठी गडावर येऊन पोहोचले. गडावर त्यांचे स्वागत झाले. शिवबा देखील आपल्या पित्यास भेटण्यास खूप अधीर झाले होते. प्रथम आल्यावर त्यांनी शिवाईदेवीचे दर्शन घेतले. नंतर जिजाऊंनी पतीच्या पायांना स्पर्श करून त्यांची चरण धूळ मस्तकास लावली. राजे सिंहासनावर विराजमान झाले तेव्हा शिवबा त्यांच्या मांडीवर येऊन बसले आणि पिता-पुत्र यांची भेट झाली. खरोखर ते दृश्य बघण्यासारखे होते. जिजाऊंनी तो आनंदाचा क्षण आपल्या डोळयात साठवून ठेवला.

शहाजीराजांचा आपल्या कुटूंबात आनंदात वेळ चालला होता तोच त्यांना कळाले की, बादशहा शहाजहान दक्षिणेवर चाल करण्यासाठी बऱ्हाणपुरास आला होता. त्यांना ताबोडतोब शत्रूचा समाचार घेण्यासाठी जावे लागले. अतिशय जड अंतःकरणाने त्यांनी जिजाऊसाहेबांचा आणि बाल शिवबांचा निरोप घेतला.

शहाजीराजांनी स्वतः वजीर बनून निजामशाहीचा कारभार चालू ठेवला आहे हे बादशहाला समजले होते. तेथे आल्यावर त्याने प्रथम आदिलशहाला शहाजीराजांपासून दूर केले. त्यामुळे तो शहाजीराजांची संगत सोडून मोगल बादशहाला जाऊन मिळाला. शहाजीराजे आता एकटे पडले होते. शिवाय त्यात त्यांना उपयोगी पडणाऱ्या सरदार मुरार जगदेव याला आदिलशहाने कपटाने ठार केले. या संकटातून शहाजीराजांना मार्ग काढायचा होता.

Read  भुतांच्या गोष्टी | Horror Stories in Marathi | Ghost Stories in Marathi

7. जिजाऊंचे संस्कार

chatrapati shivaji maharaj story marathi

Chatrapati shivaji maharaj story marathi: शहाजीराजे हे अतिशय पराक्रमी आणि शूर योद्धे होते. मोगली सैन्याची व त्यांची समोरासमोर भेट झाली. शहाजीराजे निकराने लढत होते परंतु शत्रू जास्त बलवान होता. आदिलशाही सैन्यापुढे त्यांचे सामर्थ्य कमी पडले आणि शेवटी पाच वर्षे सांभाळलेली निजामशाही शहाजीराजांना सोडावी लागली. शेवटी राजे माहुलीच्या किल्ल्यात आले.

शहाजीराजे आता शत्रूच्या वेढयात अडकले त्यामुळे त्यांनी मनाविरूद्ध आदिलशाहीची सरदारकी स्वीकारली व ते आदिलशाहीचे सरदार झाले. या गोष्टीमुळे मोगल बादशहा घाबरला व त्यामुळे त्याने आदिलशहाला सांगितले की, शहाजीराजांना कर्नाटक प्रांती पाठवावे. बादशहाचे मर्जी राखण्यासाठी आदिलशहाने शहाजीराजांना विजापुरला पाठविले. शहाजीराजे तेथे जाण्यापूर्वी जिजाऊंना भेटण्यासाठी गेले.

शिवबा सहा वर्षाचे झाले होते. जिजाऊ आणि शिवबा यांनी पुण्यास राहावे असे ठरले. पुण्याला जाण्याची त्यांची चोख व्यवस्था केली गेली. पुण्याला जात असताना डोंगर खोऱ्यांची वाट होती. पुण्यात पोहोचल्यावर सर्वत्र पडक्या घरांचे ढिगारे, भग्न वाडे आणि हवेल्या हे सर्व पाहून जिजाऊंना खूप वाईट वाटले आणि पुण्यात कशी बशी जीवन जगणारी काही कुटुंबे बघून त्यांना सुलतानशाहीचा खूपच राग आला.

जिजाऊसाहेब आपल्या पुत्राला घेऊन पुण्यात राहायला आले आहेत हे कळल्यावर सर्व लोकांनी माँसाहेबांना मुजरा करून त्यांचे स्वागत केले. सर्वजण त्यांना माँसाहेब म्हणू लागले. माँसाहेबांनी लोकांना धीर दिला व त्या म्हणाल्या, “आम्ही पुण्यात आलो आहोत, ते दुष्टांनी केलेल्या राखरांगोळीतून नवीन व सुरक्षित पुणे उभारण्यासाठी.”

ते ऐकून लोकांना फारच आनंद झाला. जिजाऊसाहेब व शिवबा यांच्यासाठी पुण्यात एक मोठा वाडा बांधण्याचे ठरविले. कसब्याच्या टोकाला, जवळच नदी असलेल्या ठिकाणी लवकरच एक भव्य वाडा बांधण्यात आला. त्या वाडयाचे नांव लाल महाल असे ठेवण्यात आले. तो वाडा घोडयाची पागा, धान्यकोठी, कचेरी, देवघर अशा सर्व सोयींनीयुक्त असा भव्य होता. एक चांगली शुभ वेळ बघून जिजाऊ आणि शिवबा त्या वाडयात राहण्यास आले.

माँसाहेब या धार्मिक वृत्तीच्या असल्यामुळे त्यांनी पडक्या देवळांचा जीर्णोद्धार करण्यास सांगितले. देवळांना डागडुजी आणि नवीन देवळांचे बांधकाम वेगाने सुरू झाले. एका देवालयात माँसाहेबांनी स्वतःच समारंभपूर्वक श्री गजाननाची प्राणप्रतिष्ठा केली आणि हेच पुण्याचे आराध्यदैवत कसबा गणपती म्हणून प्रसिद्धीस आले. जिजाऊसाहेब व शिवबा रोज तेथे दर्शनाला जात असत. शिवबा माँसाहेबांना अनेक प्रश्न विचाररून त्याविषयी माहिती मिळवत असत. माँसाहेबांकडून मोगल, निजाम यांच्या दुष्कृत्यांचा इतिहास ऐकून बाल शिवाच्या मुठी अतिशय रागाने व संतापाने आवळल्या जात.

माँसाहेब शिवबाला सांगत, “शिवबा, ही भूमी आपली, हा देश आपला; परंतु ते सुलतान व बादशहा बळजबरीने आपल्या लोकांवर राज्य करतात, आपल्या लोकांवर जुलूम-अत्याचार करतात, आपल्या लोकांच्या घरा-दारांची जाळून-पोळून राखरांगोळी करतात, शेतातली उभी पिके घोडयाच्या टापांखाली चिरडतात, ते आपल्या लोकांना गुलामासारखे वागवतात. हे सर्व अत्याचार बघून अत्यंत वाईट वाटते.” माँसाहेबांचे हे बोलणे ऐकून शिवबा फार बैचेन होत असे.

माँसाहेब व शिवबा पुण्यात आल्यापासून पुणे सोडून गेलेले लोक पुन्हा पुण्यात राहू लागले होते. त्यांना त्या दोघाचां खूप आधार वाटत असे. पुण्यातील प्रजेला आता कसलीही भीती वाटत नव्हती, त्यामुळे पुण्याची वस्ती परत वाढू लागली होती.

या लाल महालात शिवबांच्या शिक्षणाची देखील चांगली व्यवस्था केली होती. मुळाक्षरे गिरवणे, लिहायला-वाचायला शिकणे, हत्यारांची माहिती करून घेणे, दांडपट्टा चालविणे, घोडेस्वारी करणे, तलवारीचे हात करणे, तिरंदाजी, कुस्ती, भालाफेक या गोष्टी शिकत होते. याच बरोबर ते संस्कृत, फारसी या भाषांचे ज्ञान, कचेरीचे कामकाज याची देखील माहिती करून घेत होते.

माँसाहेबांचे त्यांच्या जहागिरीच्या कारभाराकडे पूर्ण लक्ष होते. पुण्यातील लोकांचे जीव आणि वित्त सुरक्षित राहील, याची अतिशय उत्तम व्यवस्था त्यांनी केली होती. शेतकऱ्यांना रानटी जनावरांचा खूप त्रास होत असे. त्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांचीच गस्ती-पथके उभारली. त्यामुळे रानटी जनावरांचा त्रास कमी झाला व चोर-दरोडेखोर यापासून देखील प्रजेचे रक्षण झाले. शेतकरी सुखी झाले. जहागिरीच्या खजिन्यात भर पडून पुण्यातील व्यापार-उदीम वाढीस लागला. जणू पुण्याचा कायापालटच झाला.

जिजाऊंच्या मनात प्रजेविषयी अतिशय करूणा व दयाभाव होता. त्यामुळे शिवबांना देखील अनेक गोष्टी समजल्या होत्या. शिवबा आपल्या सवंगडयाबरोबर डोगर-दऱ्या हिंडून बघत व कपारी, भुयारे यांची माहिती घेत असत. सर्व प्रजेशी ते जवळीक साधून त्यांना आपलेसे करत व त्यांचे सुख-दुःख जाणून घेत असत.

दऱ्याखोऱ्यात फिरताना शिवबांना मावळयांची मुले भेटत असे. पुढे हेच मावळे शिवाच्या जिवाभावाचे सोबती, सवंगडी बनले. शिवबा त्यांना पुण्यातील वाडयात घेऊन येत असत. माँसाहेब देखील त्यांच्याशी प्रेमाने व आपुलकीने वागत असे.

शिवबा आता मोठे झाले तेव्हा ते माँसाहेबांच्या कडक शिस्तीत प्रत्येक गोष्ट शिकत होते. ते सर्वगुणसंपन्न होत होते. राजाला आवश्यक असणारे सगळे गुण त्यांच्यात होते. माँसाहेबांनी त्यांच्यावर सुसंस्कार केले होते. त्याच्या अंगी बाणेदारपणा, शौर्य, प्रजेबद्दल प्रेम, अन्यायाविरूध्द चीड असे गुण दिसून येत होते. जुलमी, धर्मांध, परकी सुलतानांच्या गुलामगिरीतून आपली भूमी मुक्त करण्याचे विचार त्यांच्या मनात मूळ धरू लागले होते. स्वधर्माचा अभिमान, प्रजेविषयी कळवळा, थोरा-मोठयांचा आदर करणे हे गुण त्यांच्या ठायी दिसून येत होते.

शिवबांचे ते गुण पाहून माँसाहेबांचा ऊर अतिशय अभिमानाने भरून येत असे. त्यांच्या सर्व आशा-आकांक्षा शिवबाभोवती केंद्रित झाल्या होत्या. त्या नेहमी शिवबाला सांगत, “शिवबा तुला राम-कृष्णाप्रमाणे कार्य करायचे आहे. दुष्टांचे निर्दालन, पापी जनांचा नाश करून स्वधर्माचे, प्रजेचे रक्षण करायचे आहे आणि असे केलेस तर माझे समाधान होईल. परक्या बादशहाचा चाकर होण्यात धन्यता मानू नकोस. तुझे वडील फक्त नाईलाजाने परक्यांसाठी लढत आहेत. स्वतंत्र राज्य स्थापन करून तुझ्या वडिलांनी देखील दौलत सांभाळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यात त्यांना यश आले नाही परंतु तू आपल्या मात्या-पित्याची ही इच्छा पूर्ण कर. वडिलांनी मिळविलेल्या जहागिरीवर जगण्यात पुरूषार्थ नाही तर काही नवे निर्माण करण्यासाठी तुझा जन्म झाला आहे हे तू लक्षात ठेव. स्वराज्य स्थापून तू ‘श्री’ च्या राज्याची स्थापना कर. हीच त्या जगदंबेची, शंभू-महादेवाची इच्छा आहे, हे जाणून घे.”

माँसाहेबांच्या या विचारांनी व शिकवणीने शिवबांचे मन महत्त्वाकांक्षेने स्वाभिमानाने भरून येत होते आणि स्वराज्य-स्थापनेची इच्छा प्रबळ होत होती.

Read  Sai Baba Stories In Marathi | साई बाबांच्या कथा मराठीत

8. सिंहाचा छावा

sinhancha chava marathi story

शहाजीराजे हे आदिलशहाचे सरदार होते त्यामुळे ते सतत लढाईत गुंतलेले असत. ते बंगळुरला मुक्कामाला होते. या लढायांमुळे त्यांना कर्नाटकात राहावे लागत असे. बंगळूर येथे त्यांनी एक भव्य वाडा बांधला व तेथे त्यांचे दुसरे कुटूंब होते. दुसरी राणी तुकाबाई व त्यांचा मुलगा एकोजी यांच्याबरोबर ते तेथे राहात होते. शहाजीराजे बंगळूरला राहात परंतु मनाने मात्र ते सदैव पुण्याला जिजाबाई व शिवबांकडे असत. त्यांचा शिवबांवर खूप जीव होता. ते मधून मधून शिवबांना उंची भेटवस्तू पाठवत असत.

शहाजीराजांची इच्छा असतानाही त्यांना पुण्यात येणे जमले नव्हते; म्हणून त्यांनी पुण्याला पत्र पाठवून शिवबा व जिजाबाई यांना बंगळूरला बोलावले होते. जिजाऊ व शिवबा दोघेही बंगळूरला आले तेव्हा सगळयांनी त्यांचे स्वागत केले. सगळयांना फारच आनंद झाला. शहाजीराजांनी पुत्राला प्रेमाने जवळ घेतले.

शिवबा बंगळूरला आल्यावर त्यांच्या लक्षात आले की, बादशहा-सुलतानांनी येथे आपल्या जुलमी राजवटी स्थापन केल्या, त्यामुळे शिवबांच्या मनात सुलतानाविषयी घृणा निर्माण झाली. शिवबांचे मन तेथे रमत नव्हते हे शहाजीराजांच्या लक्षात आले. 

माँसाहेबांनी शहाजीराजांना सांगितले की, आता शिवबाचे लग्नाचे वय झाले आहे व शहाजीराजांनी देखील त्या गोष्टीला मान्यता दिली. माँसाहेबांना खूप आनंद झाला. 

शहाजीराजांनी आदिलशहाची राजधानीचे शहर विजापूर शिवबांना दाखविले. तेथे काही गोष्टी शिवबांना आवडल्या नाहीत म्हणून त्यांनी आपल्या पित्याला ‘आपण येथे राहणार नाही असे सांगितले. शहाजीराजांची इच्छा होती की, शिवबाने दरबारात जाऊन आदिलशहाची भेट घ्यावी परंतु शिवबांना ते मान्य नव्हते. ते आपल्या पित्याला म्हणाले, “मला क्षमा करा महाराज, आमची संस्कृती, आमचा धर्म, आमचे राज्य बुडविणाऱ्या सुलतान बादशहापुढे मान झुकविण्यासाठी आमचा जन्म झालेला नाही. आम्ही आई जगदंबा, शंभू महादेव, माता-पिता आदिंपुढे आमचे मस्तक हजारवेळा झुकवू. परंतु त्या क्रूर सुलतानापुढे आमचे शिर कधीच झुकणार नाही.”

शिवबांच्या या सडेतोड उत्तरामुळे शहाजीराजे त्यांच्यावर खूपच खुश झाले. ते शिवबाला म्हणाले, “आम्हाला तुमचा अभिमान वाटतो. कारण आम्ही खूप प्रयत्न केले, परंतु आम्हाला त्यात यश आले नाही. आता आमची अपूर्ण इच्छा तुम्ही पूर्ण कराल अशी आम्हाला खात्री आहे. यापेक्षा आमचे भाग्य ते काय असणार?” असे म्हणून त्यांनी शिवबाला आशीर्वाद दिला.

शहाजीराजे आपल्या मनाशीच म्हणाले, ‘शिवबा बाळराजे म्हणजे हे एक वादळ आहे. हे वादळ आदिलशाहीत कोंडता येणार नाही. हा सिंहाचा छावा या सोनेरी पिंजऱ्यात कधीच राहणार नाही. त्याला मुक्तपणे हिंडू-फिरू दिले पाहिजे व त्यासाठी त्यांना पुण्याला पाठविणे गरजेचे आहे. त्यानंतर शहाजीराजांनी ठरविल्याप्रमाणे शिवबा व जिजाऊ हे दोघेही पुण्याला परत आले.

Read  तेनाली राम मराठी कथा | Tenali Raman Stories in Marathi

9. शिवराय-मावळे शपथविधी

shivraay mavle shapat vidhi

Shivraay mavle shapat vidhi: शिवरायांचे क्षात्रतेज हे जास्त तळपू लागले होते. त्यांची न्यायनिष्ठुरता, सचोटी, धैर्य हे गुण पाहून सर्व लोकांच्या मनात स्वराज्याविषयीच्या आशा जागृत होऊ लागल्या होत्या. त्यामुळे सर्वांचे प्रेम, सहकार्य व विश्वास त्यांना मिळू लागला होता.

शिवरायांनी मावळयांसह स्वराज्यासाठी एक अनुकूल असे वातावरण निर्माण केले होते. त्यामुळे एके दिवशी शिवराय मावळ खोऱ्यातील तरूण सवंगडयांना घेऊन सहयाद्रीच्या खोऱ्यातील रोहिडेश्वराच्या मंदिरात आले. तेव्हा पाटील, देखमुख ही मंडळी देखील तेथे आली. शिवराय शिवलिंगासमोर नतमस्तक झाले आणि त्यांनी महादेवाला अतिशय मनोभावे नमस्कार केला व नंतर ते आपल्या सर्व सहकाऱ्यांना उद्देशून म्हणाले, “हे पहा मित्रांनो, माझे पिता शहाजीराजे यांनी जेव्हापासून या जहागिरीचा कारभार हाती घेतला तेव्हापासून येथील प्रजा पूर्वीपेक्षा सुखात आणि निर्भयपणे जगत आहे. परंतु ही जहागिरी कायम आपल्याकडेच राहील, याचा काय भरोसा? लहरी असलेला सुलतान ती आपल्याकडून कधीही काढून घेईल म्हणजेच परत मागचेच दिवस येणार. 

प्रजेवर अन्याय, अत्याचार सुरू होणार. अशा वेळी फक्त परमेश्वराचा धावा करण्यापलीकडे आपण काहीही करू शकणार नाही. आपण प्रयत्न केल्याशिवाय परमेश्वर देखील आपल्याला मदतीला येणार नाही. ज्याप्रमाणे श्रीरामप्रभूंनी वानरसेना उभी केली, भगवान श्रीकृष्णांनी गोकुळातील लोकांना एकत्र केले आणि तेव्हाच त्यांनी त्या अत्याचारी राजांचा पराभव केला. त्याचप्रमाणे आपण आज जर एकत्र आलो आणि जिवावर उदार होऊन त्याग करायला तयार झालो, तर आपण आपल्या मुलुखातून जुलमी, अत्याचारी सत्ताधीशांना नेस्तनाबूत करून लोककल्याणकारी अशा स्वराज्याची स्थापना करू शकू. असे स्वराज्य स्थापन व्हावे अशी श्रींची इच्छा आहे. जर आपण एकत्र येऊन अशा कार्याला वाहून घेतले तर महादेव आपणास आशीर्वाद देईल व तो सदैव आपल्या पाठीशी उभा राहील. आपण जर या कार्यासाठी तयार असाल तर हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी पडेल ते कष्ट व कोणताही त्याग करण्यास मागे-पुढे पाहणार नाही, अशांनी पुढे यावे आणि श्रींच्या समोर शपथ घ्यावी. कोण तयार आहे बोला?”

शिवरायांचे हे कळकळीचे बोलणे सर्वांच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचले. सर्वजण लगेचच श्रींच्यासमोर उभे राहात म्हणाले, “राजे, श्रींचे राज्य स्थापन करण्यासाठी आपण आमचे प्राण मागितले तरी आम्ही देण्यार तयार आहोत. या कार्यासाठी आम्ही आपण जे सांगाल ते करण्यासाठी तयार आहोत. त्यासाठी कोणताही त्याग करण्याची आमची तयारी आहे.”

ते ऐकून शिवरायांना अतिशय गहिवरून आले. त्यांनी प्रत्येकाकडून श्रींच्या पिंडीवरील बिल्वपत्र उचलून ‘स्वराज्य-स्थापनेसाठी मी माझे जीवन समर्पित करीत आहे’ अशी शपथ वदवून घेतली. माँसाहेबांना जेव्हा हे समजले तेव्हा त्यांचे मन भरून आले.

आदिलशाही दरबारात शिवरायांविषयी वेगळाच समज झाला होता. आदिलशाहीतील शहाजीराजांसारख्या अग्रगण्य सरदाराचा मुलगा असा रानोमाळ का फिरतो? दऱ्या-खोऱ्या का तुडवतो? आपल्या वडिलांच्या जहागिरीत आरामात जगण्याचे सोडून असा उन्हातान्हात का फिरतो? त्या सरदारांना स्वराज्याचे स्वप्न पाहणारे ते जिवाचे रान करणारे शिवराय कसे समजणार होते?

शत्रू हा अतिशय बलाढय होता. शिवाय त्याच्याकडे लाखोंचे सैन्य होते. त्याच्यापुढे टिकाव धरण्यासाठी आपल्याकडे देखील बलाढय अशी सेना हवी, हत्यारे हवी, दारूगोळा हवा, भरपूर धन हवे. हे सर्व कसे मिळवायचे? याची काळजी शिवरायांना लागली होती. परंतु त्यांच्याकडे दूर विचार करण्याची दृष्टी होती म्हणून त्यांच्या मनात गनिमी युद्धाने लढायचे असे होते. तेव्हा असे देखील म्हटले जात की, ज्याच्याजवळ गड असे त्यांच्याच हाती राज्य असे. म्हणून शिवरायांनी प्रथम गड ताब्यात घेण्याचे ठरविले. कारण त्यांच्याकडे कोणताच किल्ला नव्हता.

शिवरायांनी त्यासाठी प्रथम तोरणा गड घेण्याचे ठरविले. हा तोरणा गड अतिशय बुलंद व अवघड होता त्यामुळे आदिलशहाचे याकडे लक्ष नव्हते. एके दिवशी शिवरायांनी आपल्या मावळयांसह या गडावर आगमन केले व तेथे त्यांनी आदिलशहाचे निशाण काढले व आपला भगवा झेंडा फडकावला. तेथे त्यांनी स्वराज्याचे तोरण बांधले. गड त्यांच्या ताब्यात आला.

गडावर तोरणाईचे मंदिर होते. तेथे शिवरायांनी देवीची प्रार्थना करून तिचा आशीर्वाद घेतला. यानंतर शिवरायांनी गडावर दारूगोळा, हत्यारे, यांचा भरणा केला. काही पडझड झालेल्या बुरूजांची दुरूस्ती केली. तोरणा गडावर त्यांनी स्वराज्याचा भगवा झेंडा फडकावला, हे ऐकून जिजाऊंना खूपच आनंद झाला.

तोरणा गडाच्या बुरूजांच्या दुरूस्तीचे काम करताना एका बुरूजात भरपूर असे धन सापडले. खरोखर ही तर जगदंबेचीच कृपा म्हणावी लागेल. स्वराज्याची उभारणी करण्यासाठी या धनाचा उपयोग करण्याचे शिवरायांनी ठरविले.

शिवराय जेव्हा लाल महालात परत आले तेव्हा सर्वांना खूप आनंद झाला. काही सुवासिनींनी त्यांच्या पायांवर पाणी घातले. सौभाग्यवती सईबाईंनी हातावर साखर ठेवली. शिवरायांनी माँसाहेबांना वाकून नमस्कार केला. तेव्हा माँसाहेबांना अतिशय आनंद झाला होता व त्यांनी शिवरायांना आशीर्वाद दिला व त्या म्हणाल्या, “राजे, आपण योग्य तेच केले. आई जगदंबेने तुम्हाला हत्तीचे बळ दिले आहे. योग्य वेळी योग्य कार्य हाती घ्या.”

शिवरायांनी त्या दिवशी रात्री आपल्या सहकाऱ्यांबरोबर भोजन केले. त्यानंतर गडावरील सापडलेल्या धन-संपत्तीविषयी माँसाहेबांशी विचार-विनिमय करून त्याचा उपयोग कसा करायचा ते ठरविले. त्या धनातून दारूगोळा व इतर साधन-सामग्री खरेदी करून बाकी धन मोठया कार्यासाठी राखून ठेवण्याचे ठरले.

तोरणा गडावरून थोडे अलिकडे मुरंबदेवाच्या डोंगरावर एक बळकट किल्ला बांधण्याचे शिवरायांनी ठरविले होते. त्याप्रमाणे गडाच्या बांधकामास सुरूवात झाली. किल्ला अतिशय वेगाने बांधून तयार झाला. गडावर भगवे निशाण फडकावले. राजवाडा, कचेरी अशी बांधकामे पूर्ण होताच गडावर काही राखीव फौज ठेवली. शिवरायांनी या गडाचे नांव ‘राजगड’ असे ठेवले आणि हाच गड स्वराज्याच्या राजधानीचा गड बनला.

Read  अकबर बिरबल मराठी गोष्टी | Akbar Birbal Stories in Marathi

10. स्वराज्याचा झेंडा

swarajyacha jhenda story in marathi

  Shivaji Maharaj Stories In Marathi: शिवरायांनी तोरणा गड घेतला आणि त्यामुळे प्रजेला स्वराज्य आता जवळ आले आहे असे वाटू लागले होते. लोकांना शिवराय आपलेसे वाटू लागले म्हणून लोक शिवरायांना ‘राजे’ असे म्हणू लागले होते.

राजगड स्वराज्याची राजधानी झाली असल्याची बातमी सगळीकडे पसरली. सर्व लोकांना खूपच आनंद झाला. परंतु काही लोकांना राजांचे हे कर्तृत्व सहन झाले नाही. काही परकीय जे सुलतानाच्यापुढे हाजी हाजी करणारे होते त्यांना राजांचा मत्सर वाटू लागला होता. आजपर्यंत जे कोणाला शक्य झाले नाही ते हा एवढासा मुलगा काय करणार? ही गोष्ट त्यांना रूचली नाही.

हे लोक तक्रार करण्यासाठी शिरवळला गेले व तेथे आदिलशाही ठाणे अंमलदार अमीन रहीम अहमद याला त्यांनी सांगितले, “शहाजीराजांच्या मुलाने तोरणा आणि मुरूंबगड ताब्यात घेतले आणि त्याने गडाची डागडुजी देखील केली आहे. तो तेथे स्वतःचे राज्य स्थापन करण्यासाठी हालचाल करतो आहे.”

अमीनमियाला या गोष्टीतील गांभीर्यच कळाले नाही. स्वराज्य स्थापणे म्हणजे पोरखेळ नाही. समजा गडाची डागडुजी केली तर ते चांगलेच आहे. आपल्या ताब्यात आयताच सज्ज झालेला गड आला तर चांगलेच आहे. तो एवढासा शिवाजी त्याला आवरणे काही कठीण गोष्ट नाही असे अमीनमियाला वाटले.

इकडे बारा मावळातील पाटील, देशमुख राजांना सामील झाले. त्यांनी शेतसारा स्वराज्याच्या खजिन्यात भरण्यास सुरूवात केली. ठाणे अंमलदार अमीनकडे कोणीही शेतसारा भरण्यास तयार नव्हते. हा प्रकार पाहून अमीन खूपच संतापला त्यामुळे त्याने एक सांडणीस्वार विजापुरला पाठविला, त्यात त्याने शिवाजीने गड कसा ताब्यात घेतला व त्यात कोण कोण सामील झाले, याची नावासह माहिती पाठविली. त्यात त्याने लोकांनी शेतसारा भरण्याचे देखील बंद केल्याचे सांगितले आणि म्हणून एखाद्या सरदारास शिबंदीसह शिवाजीचे पारिपत्य करण्यासाठी पाठवावे, असेही सांगतिले.

आदिलशहाला हे सर्व कळाल्यावर तो फार संतापला व त्याने शहाजीराजांना बोलवून त्याविषयी विचारले. तेव्हा शहाजीराजांनी शांतपणे सांगितले, “अहो, शिवाजी असे का व कशासाठी करेल? त्याने किल्ला घेऊन आपल्याच जहागिरीचे रक्षण केले आहे त्यामुळे आपण अजिबात चिंता करू नये.”

शिवाय त्यात भर म्हणून शिवरायांनी देखील आदिलशहाला पत्र पाठवून गोड शब्दात तेच सांगितले त्यामुळे आदिलशहा शांत झाला. परंतु त्याने बारा मावळातील पाटील व देशमुख यांना फर्मान पाठवून शिवरायांना मदत करू नये असे लिहिले होते, त्याचबरेाबर शेतसारा देखील आदिलशाही खजिन्यात भरण्यास सांगितले.

आदिलशाहाचे सरदार दक्षिणेतील लढाईत गुंतलेले असल्यामुळे शिवरायांचे पारिपत्य करण्यास कोणीही सरदार तेथे नव्हता. शिवरायांचे पारिपत्य म्हणजे अतिशय किरकोळ असेही त्याला वाटत होते.

पाटील-देशमुखांप्रमाणेच नरसू प्रभू यांना देखील आदिलशाही फर्मान आले त्यामुळे ते घाबरले. त्यांनी लगेच मुलाला शिवरायांकडे पाठविले. शिवरायांनी त्यांची समजूत घातली. 

आपण सर्वांनी स्वराज्याची शपथ घेतली आहे. श्रींच्या इच्छेनेच ‘आपण स्वराज्य स्थापन केले आहे त्यामुळे यात घाबरण्यासारखे काही नाही. श्रींचा आशीर्वाद असल्यामुळे विजय आपलाच होणार आहे.’

शिवरायांचा हा निरोप त्याने वडीलांना सांगितला. त्यामुळे नरसू प्रभूंचे समाधान झाले. त्यांनी तेव्हापासून प्रतिज्ञा केली की, परक्यांच्या गुलामीत जगण्यापेक्षा राजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यात जगू. त्यातच आमच्या जन्माचे सार्थक होईल.’

सर्व मावळ खोरे शिवरायांच्या पाठीशी उभे राहिले. शिवराय स्वतः सर्व कामांत लक्ष देऊ लागले. न्याय-निष्ठुरतेने निर्णय व्हायला लागले. तोरण्यावर स्वराज्याचा जसा झेंडा फडकला तसेच इतर ठिकाणी देखील स्वराज्याचे झेंडे फडकले.

Read  लहान मुलांच्या मराठी गोष्टी | Marathi Stories For Kids With Moral | छान छान गोष्टी

11. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ

shakti pekshya yukti shreshtra

Shakti pekshya yukti shreshtra: "स्वराज्याच्या जवळील जावळीचे खोरे येथील आदिलशहाचा सरदार चंद्रराव मोरे मरण पावला व तो निपुत्रिक असल्याने राज्याला वारस उरला नाही व त्यामुळे आदिलशहा ती जहागीर जप्त करील अशी दहशत निर्माण झाली. असे झाले तर चंद्रराव मोरे यांच्या विधवा पत्नीला दुसऱ्याच्या दयेवर जगावे लागेल म्हणून तिने मोरे घराण्यातील एका मुलाला दत्तक घेण्याचे ठरविले व यासाठी शिवरायांची मदत घेण्याचे ठरविले.

जावळीचे खोरे हे स्वराज्याच्या सीमेला लागून असल्यामुळे तेथील जहागीरदार जर आपल्याशी सलोख्याने राहणार असेल तर आपल्यासाठी ती एक चांगली बाजू होईल, असा दुरचा विचार करून फक्त सोळा वर्षाचे शिवराय आपल्याबरोबर घोडदळ, पायदळ घेऊन जावळीत निघाले. मोऱ्यांच्या विधवा पत्नीने एका मुलाला दत्तक घेतले. त्याचे नाव देखील परंपरेप्रमाणे ‘चंद्रराव’ असे ठेवले गेले. आदिलशहाने ‘चंद्रराव’ हा या घराण्याला दिलेला कायमचा किताब होता. तसे बघितले तर स्वराज्याच्या दृष्टीने ही जहागीर अत्यंत महत्वाची होती तरी देखील शिवरायांनी ती संधी नाकारली. 

शिवराय वयाने लहान असून देखील मोऱ्यांच्या पत्नीने त्यांना नमस्कार केला व नजराणा भेट दिला. चंद्रराव वयाने मोठा होता तरी तो देखील शिवरायांच्या पाया पडला. तो हे जाणून होता की, शिवरायांनी दिलेल्या संरक्षणामुळेच आपण जहागिरीचे धनी झालो आहोत आणि ‘चंद्रराव’ हा किताब आपल्याला मिळाला आहे.

जेव्हा शिवराय गडावर आले तेव्हा त्यांना समजले की, आदिलशहाने स्वराज्याचा वैरी असलेल्या अमीन मिया याची कोंढाण्याचा सुभेदार म्हणून नेमणूक केली आहे व तो लगेच कोंढाण्याकडे येणार आहे. स्वराज्याचा हा कपटी, बेरकी, आक्रमक स्वराज्याच्या सीमेजवळ येऊन राहणार ही गोष्ट तशी गंभीर होती.

यावर विचार करून शिवरायांनी खेडेबारे गावच्या बापूजी मुद्गलांना बोलविले आणि सांगितले की, “बापूजी हा शत्रू येथे येणार आहे व हा शत्रू येथे येणे म्हणजे स्वराज्याला धोका आहे आणि म्हणून कोंढाणा हा आपल्याच हाती पाहिजे.” असे सांगून त्यांनी बापूजींना हे काम शक्तीपेक्षा युक्तीनेच केले पाहिजे व म्हणून त्यांनी त्यांना गुप्तपणे काही गोष्टी सांगितल्या व त्याप्रमाणे ते कामाला लागले.

गडावर सिद्दीअंबर हा गडकरी व काही फौज होती. बापूजी किल्लेदाराचा पाहुणा आहे असे सांगून गडावर गेले व तेथे त्यांनी प्रवेश मिळविेला. गडावरील पाहुण्याकडे बापू गेले. बापू बोलण्यात हुशार असल्यामुळे त्याच्या जिभेवर जणू साखर घोळत होती. त्यामुळे ते समोरच्याला बरोबर आपलेसे करायचे.

आता बापूजींचे किल्लेदार पाहुणे म्हणजे आबाजी होय. आबाजी बापूजींना म्हणाले, “बापूजी, तुम्हाला काय सांगणार! आम्हाला डोळयांत तेल घालून गडावर पहारा द्यावा लागतो. थोडा देखील वेळ आम्हाला मिळत नाही. पोटासाठी परक्याची चाकरी करावीच लागते आहे व आमचा जन्म व्यर्थच चालला आहे.”

बापूजींनी आबाजींचे असे दुःखी बोलणे ऐकले व ते त्यांना म्हणाले, “आबाजी, आपण दुःखी होऊ नका. कारण लोकांवरील अत्याचार थांबावे व त्यांना सुखाने दोन घास खाता यावे यासाठी आपले शिवाजी राजे स्वराज्याची स्थापना करण्यासाठी आपल्या जिवाचे रान करीत आहेत आणि अशा वेळेस आपण सगळयांनी त्यांना सर्व प्रकारे मदत करणे गरजेचे आहे व ते प्रत्येकाचे कर्तव्य देखील आहे. तुमच्यासारखी अतिशय विचारी व जाणती माणसे जर अशी दुःख करीत बसली तर काय उपयोग?”

आबाजींना विचारी म्हंटले म्हणून त्यांना खूपच बरे वाटले व ते म्हणाले, “बापूजी, तुमच्या मनात जे आहे तेच आमच्या देखील मनात आहे. परंतु आम्हाला ते या गडावर उघडपणे बोलता येत नाही.”

तेव्हा बापूजी त्यांना म्हणाले, “आबाजी, तुम्ही काही काळजी करू नका. तुम्हाला खरंच आपल्या राजांविषयी आदर असेल तर मी प्रत्यक्ष शिवरायांना तुमच्या भेटीसाठी घेऊन येईन.”

ते ऐकून आबाजींना बरे वाटले व ते म्हणाले, “खरेच, असे होऊ शकते का?”

तेव्हा बापूजी त्यांना म्हणाले, “होय, परंतु त्यासाठी मला एखादी गुप्त वाट तुम्ही दाखवा, म्हणजे कोणालाही न कळता हे काम होईल.”

बापूजींचा हेतू बरोबर साध्य झाला. आबाजींनी त्यांना गडावर येण्याची गुप्त वाट दाखविली. तेव्हा ताबोडतोब बापूजी शिवरायांकडे आले व गुप्त रस्ता सापडल्याचे त्यांना सांगितले, तेव्हा त्याच रात्री बापूजी व आपले हत्यारबंद पाचशे मावळे यांना घेऊन शिवराय गडावर आले व गडावरील आदिलशाही फौजेला त्यांनी हुसकावून लावले आणि नंतर राजांनी गडावर आपले भगवे निशाण फडकावले. अशा प्रकारे कोंढाणा हा न लढाई करताच स्वराज्यात दाखल झाला.

शिरवाळच्या किल्ल्यातील अमीन मियाला कोंढाण्याबाबतीत जे घडले ते काहीच माहित नव्हते. तो आपण कोंढाण्याचे सुभेदार आहोत असे समजून अतिशय आनंदाने आपल्याबरोबर थोडीशी फौज घेऊन कोंढाण्याकडे निघाला. पुढे गेल्यावर वाटेत त्याला समजले की, कोंढाणा हा शिवरायांनी घेतला. तेव्हा तो खूप संतापला.

अमीन मिया आता परत शिरवळला निघाला तेव्हा शिवरायांनी त्याची ती वाट देखील अडविली होती. मिया अमीनजवळ अत्यंत थोडीशीच फौज होती व थोडी फौज शिरवळच्या किल्ल्यात होती. शिवरायांनी याचा फायदा घेतला व ते लगेच शिरवळला गेले. तेथे जाऊन शिवरायांनी अमीन मियाच्या फौजेला घालवून दिले व शिरवळच्या किल्ल्यावर देखील भगवा झेंडा फडकू लागला.

शिवरायांनी शिरवळचा किल्ला देखील ताब्यात घेतला त्यामुळे मिया अमीन विजापुरला निघून गेला.

12. शिवरायांची दूरदृष्टी

shivaji maharaj katha

shivaji maharaj katha: "शिरवळचा अमीन मिया हा पराभूत झाल्यामुळे विजापुरच्या दरबारात आला तेव्हा शिरवळचा किल्ला व कोंढाणा देखील गमावला असल्याचे आदिलशहाला समजले. ते ऐकून त्याला धक्काच बसला. शिवाजी आपल्याला डोईजड झाल्याचे त्याच्या लक्षात आले म्हणून याबाबत काहीतरी करायलाच पाहिजे असे ठरवून त्याने आपल्या सरदारांची एक गुप्त बैठक घेतली.

या बैठकीत विचार-विनिमय करून असे ठरले की, शिवरायांवर जरब बसविण्यासाठी त्यांचे वडील शहाजीराजे यांनाच कैदेत टाकावे. तेव्हा शहाजीराजे हे जिंजीचा किल्ला घेण्यासाठी लढत होते त्यामुळे त्यांचा मुक्काम तेव्हा छावणीतच असे. जर शहाजीराजेंना झोपेतच जेरबंद करून कैदखान्यात टाकले, तर शिवाजीराजे त्यांना सोडविण्यासाठी येतील व तेव्हा त्यांचा समजाचार घेता येईल, असा सल्ला आदिलशहाला देणारे मराठा सरदारच होते.

मुधोळचे सरदार बाजी घोरपडे यांचा सल्ला ऐकून आदिलशहाला वाटले की, ‘हा सरदार आपल्याच लोकांवर घाव घालून आपल्याच मायभूमीची राख-रांगोळी करायला निघालाय.’ परंतु हे विचार त्याने बोलून न दाखवता तो मनातून खूप खुष झाला आणि त्याने सर्वांना त्याप्रमाणे कामाला लागण्यास सांगितले.

आदिलशहाचा हुकूम होताच सरदार मुस्तफाखानाने आपल्याबरोबर बाजी घोरपडे, बाळाजी हैबतराव, अंबरखान, बहलोलखान, मंबाजी भोसले असे सरदार आणि मोठी फौज घेऊन जिंजीकडे प्रस्थान केले.

शहाजीराजांनी या सर्वांना बघितले तेव्हा त्यांच्या मनात शंका आली की, ‘यांचा नक्कीच काहीतरी डाव आहे.’ मुस्ताफाखानाने शहाजीराजांच्या गळयात पडून सांगितले की, “राजे, तुम्ही जिंजी जिंकण्यासाठी किती प्रयत्न करीत आहात व त्यामुळेच आदिलशहा तुमच्यावर खूप खुष आहे. आपण हा किल्ला लवकरात लवकर जिंकून कर्नाटकातील इतर मुलूख जिंकण्यास मोकळे व्हावे यासाठी आम्हाला तुमच्या मदतीसाठी पाठवले आहे.”

शहाजीराजांनी मुस्तफाखानच्या बोलण्यावर विश्वास ठेवला पण ते तरी देखील सावध होते. मुस्तफाखानचे त्यांच्या छावणीवर बारीक लक्ष होते. शहाजीराजे पहाटेच्या गाढ झोपेत असताना मुस्तफाखानचे शेकडो सैनिक हातात तलवारी व पेटत्या मशाली घेऊन शहाजीराजांच्या छावणीत आले तेव्हा शहाजीराजे ताडकन उठले व त्यांच्या लक्षात आले की, आपल्याबरोबर धोका झाला आहे परंतु तसे असताना देखील शहाजीराजांनी शत्रूशी तलवारीने लढून प्रतिकार केला परंतु शेकडो सैनिकांसमोर एकटयाने लढणे अशक्यच होते. त्यामुळे शहाजीराजे जखमी झाले व भोवळ येऊन खाली कोसळले. त्याबरोबर लगेचच मुस्तफाखानच्या सैन्याने त्यांना उचलून खानाच्या छावणील आणले व त्यांच्या हाता-पायात बेडया घालून कैद केले.

शहाजीराजे अशा रितीने कैद झाले. मुस्तफाखान व इतर सरदारांना फार आनंद झाला. आता शिवाजीराजे आपल्या ताब्यात येणारच असे त्यांना वाटले. शहाजीराजे भानावर आल्यावर त्यांना सर्व काही समजले.

इकडे शिरवळचा किल्ला व कोंढाणा स्वराज्यात दाखल झाले म्हणून शिवराय व त्यांचे मर्द मावळे राजगडावर आनंद साजरा करीत होते, परंतु तितक्यात त्यांना शहाजीराजांना कैद केल्याचे समजले. जिजाऊ व शिवराय अत्यंत काळजीत पडले.

तेवढयात दुसरी बातमी आली की, बंगळुरला असणारे शिवरायांचे मोठे बंधू संभाजीराजे व इतर कुटुंबियांना जेरबंद करण्यासाठी मुस्तफाखानाने बंगळुरला मोठी फौज पाठविली आहे. त्याचबरोबर तिसरे संकट देखील त्यांच्या समोर उभे राहिले ते म्हणजे शिवरायांना धडा शिकविण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानाला मोठी फौज घेऊन पाठविले आहे.

शिवरायांच्या पुढे हे तिहेरी संकट आले त्यामुळे ते अतिशय काळजीत पडले म्हणून त्यांनी माँसाहेब व इतरांशी चर्चा केली व स्वराज्यावर आलेल्या संकटांची सर्वांना कल्पना दिली. जर शत्रूच्या कारवाया थांबल्या नाहीत, तर सर्वजण शत्रूच्या कैदेत पडतील. प्रसंग खरोखरच कठीण आहे. सर्वांचीच जर सुटका करायची असेल तर स्वराज्याला मुकावे लागणार आणि स्वराज्य जतन करायचे म्हंटले तर शहाजीराजे व इतर कुटुंबीय शत्रूच्या कैदेत खितपत पडणार. काय करावे, परंतु यातून काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे. श्रींची इच्छा होती, हे राज्य व्हावे म्हणून. मग ते टिकावे यासाठी देखील तेच काहीतरी मार्ग सुचवतील. आता धीर सोडून चालणार नाही.

शिवराय मुत्सद्दी होते त्यामुळे त्यांनी मार्ग शोधला. दिल्लीच्या बादशहाला कसले तरी आमिष दाखवून त्याच्याशी संधान जुळवायचे व त्याचा दबाव आदिलशहावर आणून थोरले महाराज व थोरले बंधू संभाजीराजांना वाचवावयाचे. शिवरायांचे वय तेव्हा फक्त अठरा वर्षाचे होते तरीदेखील त्यांची दुरदृष्टी पाहून माँसाहेबांना फार कौतुक वाटले व शिवरायांविषयीचा आदर अधिकच वाढला.

मोगलांसारख्या सर्व सत्ताधीशांनी आपली शक्ती पाहिली की ते नक्कीच आपल्याशी मैत्रीचा हात पुढे करतील व त्यासाठी आपण प्रथम पुरंदरसारखा गड ताब्यात घेऊ. फत्तेखान आपल्यावर चालून येण्याआधीच पुरंदर घेतला पाहिजे; म्हणजे गडाच्या आश्रयाने आपण त्या फत्तेखानाचा सहज पराभव करू शकू, असे शिवरायांचे विचार होते.

तेथील सर्वजण शिवरायांच्या या डावपेचाने आश्चर्यचकित झाले व त्यामुळे त्यांना शिवरायांची दूरदृष्टी देखील कळाली.

13. पुरंदर जिंकला

Purbandar jinkla story

शिवरायांनी मनाशी पक्का निर्धार केला होता की, श्रींच्या इच्छेने स्थापन केलेले स्वराज्य हे टिकवायचेच. फत्तेखानाचा पराभव करायचा त्यासाठी राजांनी आपल्या डावपेचांना सुरूवात केली. फौजांना त्यांनी सज्ज राहण्यास सांगितले. त्यांनी मोगल बादशहाकडे आपला एक वकील पत्र देऊन पाठविला.

राजांच्या फौजेतील सर्व मावळयांनी गडावरील देवीचे दर्शन घेतले. माँसाहेबांचा आशीर्वाद घेतला व फौज निघाली. वाऱ्यावर भगवा फडकत होता. राजांच्या बरोबर जिवाला जीव देणारे अनेक शूर असे मावळे होते. राजांनी हात उंचावून गर्जना केली, ‘जय भवानी’ त्याबरोबर सर्वांनीच ‘जय भवानी’ अशी गर्जना केली.

राजांचे मावळे पुरंदरच्या दिशेने निघाले. पुरंदरचे किल्लेदार नीळकंठ सरनाईक हे होते. आता त्यांचे वय झाले होते परंतु तरीदेखील त्यांनी तलवार चालविणे सोडले नव्हते. त्यांचे पूर्ण आयुष्य सुलतानाची, बादशहाची चाकरी करण्यात गेली होती. असे हे वयोवृद्ध सरनाईक शहाजी राजांचे जिवलग मित्र होते. आपल्या मित्राचा हुशार व बहादूर मुलगा शिवबा यांचे त्यांना फारच कौतुक होते. एवढया कमी वयात स्वराज्य स्थापणारा हा मुलगा स्वतःच्या कर्तृत्वाने फार मोठा होणार असे त्यांना मनापासून वाटत होते.

शिवरायांची फौज पुरंदरकडे चालली होती. तेव्हा राजांनी स्वतः शेतकऱ्याचा वेष केला आणि ते नीळकंठरावांना भेटले. राजांनी त्यांना काय घडले, परिस्थिती कशी आहे, हे सर्व सांगितले. यावेळेस आम्हाला मदत करा असे सांगितले. आपली फौज पुरंदरावर ठेवून दिली तर आम्ही त्या फत्तेखानाला पळवून लावू असा विश्वास दिला.

शिवरायांचे बोलणे नीळकंठरावांना पटले. बादशहाची सेवा करण्यात पूर्ण आयुष्य गेले मग आयुष्याच्या शेवटी जर स्वराज्याची काही सेवा करता आली तर निदान आपल्या जीवनाचे सार्थक होईल, असा विचार करून नीलकंठरावांनी गड शिवरायांकडे सोपविला व ते म्हणाले, “तुम्ही लवकर जा आणि आपली फौज गडावर घेऊन या. उशीर करू नका. मी गडाचे दरवाजे उघडून ठेवतो. हे करताना माझ्या जिवाचे काही बरे-वाईट झाले तरी मला त्याची पर्वा नाही.”

शिवरायांनी आपली फौज लगेचच पुरंदरावर नेली. तेथे जाताच राजांनी गडाची पाहणी करून लढाईच्या दृष्टीने गड सज्ज करण्यास सुरूवात केली. बुरूजावर तोफा चढू लागल्या, दारूगोळयाचे पेटारे माचीवर नेण्यात आले. गस्त सुरू झाली. शिवराय स्वतः फिरून सर्व व्यवस्था पाहात होते.

शिवरायांच्या एका हेराने बातमी आणली की, सरदार फत्तेखान मोठी फौज घेऊन विजापुराहून निघून बेलसरपर्यंत आला आहे आणि शिवाय त्याने सरदार बाळाजी हैबतरावाला पुरेशी फौज, दाणागोटा, भरपूर हत्यारे व मोठा खजिना बरोबर देऊन शिरवळकडे सुभानमंगळ किल्ला व ठाणे काबीज करण्यासाठी पाठवले आहे. हि माहिती शिवरायांना कळताच त्यांनी एका मावळयाला बोलवून सांगितले, “तू ताबोडतोब शिरवळच्या आपल्या ठाणेदाराकडे आणि सुभानमंगळ किल्ल्याच्या किल्लेदाराकडे जा आणि आमचा निरोप सांग. सरदार बाळाजी हैबतराव ठाणे आणि किल्ला घेण्यास निघाला आहे. जर तो आलाच, तर ठाणे आणि गड खुशाल त्याच्या ताब्यात देऊन टाका व तेथून निघा आणि जवळच्याच रानात आमचा पुढील निरोप येईपर्यंत लपून राहा.”

मावळा लगेच तो निरोप घेऊन निघून गेला. राजांनी सरळ सरळ ठाणे आणि किल्ला शत्रूच्या हवाली कसा करण्यास सांगितला, असा प्रश्न नीळकंठरावांनी शिवरायांना विचारला. तेव्हा राजे त्यांना म्हणाले, “हे बघा नीळकंठजीकाका, जेव्हा फत्तेखानाला कळेल की मी पुरंदर ताब्यात घेतला आहे, तेव्हा तो इकडेच चालून येईल व त्याच्याशी लढाई होईल ती येथेच. ही लढाई किती दिवस चालेल ते काही आत्ता सांगता येणार नाही. तेव्हा आपल्या या गडावर पुरेसा दाणागोटा, हत्यारे यांचा साठा असायला हवा. तसेच भरपूर धन हवे. तो आदिलशाही सरदार हैबतराव शस्त्रास्त्रे व खजिना आयताच घेऊन आपल्याकडे येत आहे तर त्याला आपण कशासाठी अडवायचे? तो आल्यावर जर त्याला लढाई न करताच शिरवळचे ठाणे आणि सुभानमंगळ किल्ला मिळाला तर तो खुश होईल. मराठे आपल्याला घाबरून पळाले असे त्याला वाटून तो बेसावध राहिल; खजिना, दाणागोटा, हत्यारे किल्ल्यात भरून ठेवील. तो असा बेसावध असतानाच आपण त्याच्यावर हल्ला करू. आमची खात्री आहे की आपलाच विजय होईल आणि मग काय त्याचा खजिना, हत्यारे सर्व काही आयतेच आपल्या ताब्यात येईल. ते सर्व आणून हया किल्ल्यात ठेवून देऊ. शत्रूच्याच हत्याराने त्याचाच बळी घेऊन मिळविलेला विजय यासारखे दुसरे समाधान नाही.”

शिवरायांची ही दूरदृष्टी बघून नीळकंठराव खूपच चकित झाले. शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी शिवराय प्रत्येक गोष्टीत लक्ष घालत होते. तेवढयात त्यांना समजले की, बाळाजी हैबतरावाने सुभानमंगळ आणि शिरवळचे ठाणे स्वतःच्या ताब्यात घेऊन त्यात सर्व सरंजाम भरला आहे. ते ऐकून शिवरायांनी त्वरीत आपल्या शूर सरदारांना बोलवून सांगितले की, “येथून पाचशे घोडेस्वार बरोबर घेऊन शिरवळ ठाणे आणि सुभानमंगळ किल्ला येथून पळ काढून आपल्या रानात लपून बसलेल्या सैनिकांना बरोबर घ्या व शिरवळ ठाणे आणि सुभानमंगळ किल्ल्यात शिरून शत्रूला पराजित करून चांगला धडा शिकवा. तसेच बाळाजी हैबतरावाची मान कापा. ठाणे आणि किल्ला आपल्या ताब्यात आल्यावर तेथील धन आणि हत्यारे घ्या व थोडी फौज तेथे ठेवून सर्व ऐवज घेऊन इकडे या.”

शिवरायांची आज्ञा ऐकताच स्वराज्यासाठी प्राण देखील देण्यास तयार असणारे मावळे सैनिक आपल्या लपून बसलेल्या सैनिकांना बरोबर घेऊन ‘हर, हर महादेव’ अशी गर्जना करीत निघाले. त्यांचा आवाज ऐकून हैबतरावाला वाटले की, हे शेंदाड शिपाई आलेले दिसतात. त्या रानटी पोरांना लढाईत काय कळतंय? म्हणून तो सैनिकांना म्हणाला, “ही पोर आपल्याला पाहून काल पळाली. आता त्यांना जागेवरच गार करा. कोणालाही पळण्याची संधी देऊ नका.”

शिवरायांची फौज किल्ल्याच्या मुख्य दरवाजापाशी आली व इशारा मिळताच फौजेने मोठे दगड दरवाज्यावर मारायला सुरूवात केली. त्यामुळे तो भक्कम दरवाजा मोडला व त्याबरोबर राजांची सर्व फौज किल्ल्यात घुसली आणि त्यांनी आदिलशाही फौजेला कापून काढण्यास सुरूवात केली. काही वेळातच त्यांचे भरपूर सैन्य कापले गेले. हे बघताच उरलेल्या फौजेचा धीर खचला व ते माघार घेऊ लागले.

शिवरायांचे विश्वासू कावजी मल्हार हे बाळाजी हैबतरावांसमोर आले व त्यांना म्हणाले, “तूच ना तो गद्दार, ज्याने कपटाने जिंजीला शहाजीराजांच्या छावणीत घुसून त्यांना झोपेतच हाता-पायात बेडया घातल्यास. आता बघ मी तुला वर पाठवितो.”

असे बोलून कावजी मल्हार यांनी आपल्या हातातील अतिशय टोकदार फाळ बाळाजी हैबतरावांच्या दिशेने फेकला व हैबतराव जागीच ठार झाले. हे बघून आदिशहाचे अशफरशाह व फाजलशाह हे सरदार देखील पळून गेले व इतर फौजफाटाही पळून गेला.

किल्ल्यामध्ये गंडगंज संपत्ती, हत्यारे, दारूगोळा मावळयांच्या हाती पडला. त्यानंतर थोडी शिंबदी गडाच्या रक्षणासाठी ठेवून सर्व मावळे सैनिक पुरंदर गडाकडे परत आले.

सर्व विजयी मराठे वीर ‘फत्ते! फत्ते! अशी गर्जना करीतच पुरंदर गडावर पोहोचले. गडावर आल्यावर शिवरायांनी त्यांना पाठ थोपटून शाबासकी दिली तेव्हा ती थाप पाठीवर पडताच सर्व मावळयांना खूप समाधान वाटले.

14. शिवराय व मावळयांचा विजय

shivaji maharaj fight story in marathi

शहाजीराजे आदिलशहाच्या हुकुमानुसार कैदेत होते त्यामुळे आदिलशहा खूपच आनंदी होता. बंगळूरहून फर्रादखान शहाजीराजांच्या कुटुंबियांना पकडून येथे आणेल व फत्तेखान तिकडे शिवरायांचा पराभव करेल असा विचार करून आदिलशहा मनातल्या मनातच खूप खुश होत होता.

फत्तेखानाला देखील असेच वाटत होते की, आपल्या सैन्यामुळे शिवाजी भयभीत होईल व बाळाजी हैबतराव शिरवळचे ठाणे आणि सुभानमंगळ गड त्यांच्याकडून हिसकावून घेईल तेव्हा ते मावळे पळून जातील. मग एकटे शिवाजी काय करणार? पुरंदर आपल्याला आयताच मिळेल.

इकडे शिवराय लढाईच्या दृष्टीने पुरंदरचा बंदोबस्त करण्यात गुंतले होते. शिवरायांनी मावळयांना सांगितले, “जर फत्तेखान येथे येण्याआधीच आपण त्याच्यावर हल्ला केला तर.?”

राजांचा हा विचार सर्वांना पटला आणि फत्तेखानावरील हल्ल्याची योजना तयार झाली. सर्व मावळयांनी ठरवविल्याप्रमाणे मध्यरात्रीच फत्तेखानाच्या छावणीवर धाड टाकली. फत्तेखानाच्या सैनिकांना कोणी हल्ला केला हे कळण्याच्या आतच मावळयांनी शेकडो सैनिकांच्या माना कापल्या. सर्व ठिकाणी हलकल्लोळ झाला. समोरासमोर लढणे आता कठीण आहे हे लक्षात येताच सर्व मावळे पुरंदरकडे निघून गेले.

फत्तेखानाचे सैनिक अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे खूपच घाबरले. कधी अचानक येऊन मावळे आपल्या माना कापतील याचा त्यांना भरोसा राहिला नाही. फत्तेखान देखील मनातून खूपच घाबरला परंतु वरवर तो उसने अवसान आणत शिवरायांवर चालून जाण्याच्या कल्पना करू लागला.

फत्तेखान अतिशय घाबरलेल्या अवस्थेत असतानाच शिरवळवरून कसा-बसा आपला जीव वाचवून पळालेले फाजलशाह आणि अशरफशाह त्याच्यासमोर येऊन उभे राहिले तेव्हा त्याच्या लक्षात आले की काल रात्री आपली जी अवस्था झाली तीच यांची देखील झाली असणार! तरी देखील त्याने त्यांना विचारले, ‘काय झाले? तुमची तोंड अशी काळी का पडली आहेत!”

तेव्हा त्याला समजले की, बाळाजी हैबतराव मारला गेला, सुभानमंगळ किल्ला आणि ठाणे शिवरायांनी परत जिंकून घेतले. हे ऐकून तर तो पूर्णपणे खचून गेला. परंतु कसेबसे उसने अवसान आणत तो म्हणाला, “त्या एवढयाशा पारोंनी तुम्हाला धूळ घातली?”

फत्तेखान आता खूपच संतापला व त्या संतापातच त्याने आपल्या फौजेला पुरंदराकडे कूच करण्यासाठी सज्ज होण्यास सांगितले. ते सर्वजण पुरंदरकडे निघाले तेव्हा पुरंदरावर अतिशय उत्साहाचे वातावरण होते.

फत्तेखानाची फौज गडाकडे येताना दिसताच इशारा दिला गेला व सगळीकडे धावपळ, लगबग, गडबड सुरू झाली आणि प्रत्येक मावळा आपली हत्यारे घेऊन नेमून दिलेल्या जागी सज्ज झाला. तोफांची तोंड शत्रूकडे वळली. खानाला सर्वत्र शांतता दिसली म्हणून त्याने आपल्या फौजेला गडावर हमला करण्यास सांगितले.

फत्तेखानाची एवढी मोठी फौज घोडयावर बसून गड कसा काय चढणार? आणि पायवाट तर चिंचोळी होती. त्यासाठी ते सर्वजण घोडयावरून उतरून गड चढू लागले. फत्तेखान देखील स्वतः गड चढू लागला. या फौजेला अशी चढणीची सवय नसल्यामुळे थोडे वर जाताच त्यांची दमछाक झाली.

गडावर मात्र सर्व तयारी होती म्हणून ती फौज माराच्या टप्प्यात येताच राजांनी इशारा केला व प्रचंड शिळा, दगड खानाच्या फौजेवर आदळू लागले. त्यामुळे अनेक सैनिकांचा फडशा पडला. मेलेले सैनिक गडगडत खाली जाऊ लागले. खानाची सर्व फौज लाहयांसारखी होरपळून निघाली. सर्व डोंगर रक्ताने लाल झाला. आता खानाच्या फौजेचे धैर्य खचायला लागले.

कावजी मल्हारने मिनादखानला गाठले तर गोदाजी जगताप मुसेखानावर चालून गेला. गोदाजीची तलवार मुसेखानाच्या काळजात आरपार घुसली. खानाच्या फौजेने शस्त्रे तेथेच टाकून ते जीव वाचविण्यासाठी तेथून पळत सुटले. मावळे मात्र त्यांचा पाठलाग करीत होते. बाजी पासलकर देखील शत्रूच्या मागे धावत होते. परंतु ते एकटे आहेत असे बघून शत्रूने त्यांना एकटे गाठून ठार केले. शिवरायांना आपला जिवलग सखा गेल्याचे बघून खूपच गहिवरून आले.

फत्तेखानाची उरलेली फौज जीव वाचवण्यासाठी पळून गेली. शिवरायांच्या मावळयांनी मात्र पराक्रम करून बलाढय अशा शत्रूचा पराभव केला होता. नीलकंठकाकांचे शिवरायांनी आभार मानले व त्यांचा भेटी देऊन सत्कार केला. गडावर संरक्षणासाठी अधिकारी नेमले आणि पुरेशी अशी शिबंदी ठेवून शिवराय आपल्या मावळयांसह राजगडावर परत आले.

15. शहाजीराजांची सुटका

shivaji maharaj full story in marathi

Shivaji maharaj full story in marathi: शहाजीराजांना आदिलशहाने कपटाने कैदेत टाकले होते. फर्रादखान व त्याचे सहकारी सरदार बंगळूरला शहाजीराजांच्या कुटुंबियांना पकडून आणण्यासाठी गेले होते म्हणून आदिलशहा त्यांची वाटच बघत होता परंतु इतक्यात फर्रादखान व इतर सरदार माना खाली घालून आदिलशहापुढे उभे राहिले.

तेव्हा आदिलशहाला समजले की, बंगळूरला संभाजीराजांनी त्यांना बेदम मारून पिटाळून लावले होते. ते ऐकून आदिलशहा खूप संतापला. तो आता शिवरायांवर चालून गेलेल्या फत्तेखानाची वाट बघत होता. तेवढयात फत्तेखान अतिशय पडलेला चेहरा घेऊन आपल्या इतर सरदारांसह आदिलशहासमोर येऊन उभा राहिला. त्यांनी देखील शिवरायांनी आपल्याला कसे बेदम मारले ते सांगितले. त्याचबरोबर मुसेखान मेला, या सर्व बातम्या ऐकून आदिलशहा खूपच संतापला. आता त्याला कळाले होते की, त्याचा पराभव झाला होता.

आदिलशहाने तरीदेखील असा विचार केला की, काही झाले तरी अजून त्या शिवरायांचे पिताश्री तर आपल्या ताब्यात आहेत ना! असा विचार करून त्याने शिवरायांना पत्र पाठवीत त्यात म्हंटले, “तुम्ही तुमचे गड-किल्ले आणि जहागिरी आमच्या ताब्यात देऊन आमच्या दरबारात हजर व्हा; नाहीतर उद्या तुमच्या वडिलांचे आम्ही काही बरे-वाईट करू.” हे पत्र दिल्यामुळे आदिलशहाला वाटले की, आता शिवराय आपल्याकडे लगेच येतील.

परंतु तसे मात्र झाले नाही. कारण शिवराय विचार करीत होते की, आपले वडील शहाजीराजे आदिलशहाच्या कैदेत आहेत तर पुरंदरच्या लढाईत आपले खरे सहकारी बाजी पासलकर हे धारातीर्थी पडले. फर्रादखानाने बंगळुरास वेढा दिलेला होता. या विचाराने शिवरायांना विजय मिळाल्याचा आनंद घेता आला नाही. इतक्यात त्यांना कळाले की, त्यांचे मोठे भाऊ संभाजीराजांनी बंगळुरास फर्रादखानाला भरपूर मारून हाकलून लावले होते. या बातमीने शिवरायांची थोडीशी काळजी दूर झाली होती.

आता शिवरायांनी मुद्दाम दिल्लीच्या बादशहाकडे आपला एक वकील पत्र देऊन पाठवला होता. त्यांनी या गोष्टीचा फायदा करून घेण्याचे ठरविले. आपण बादशहाला पत्र पाठविल्याची माहिती आदिलशहाला कळेल अशी त्यांनी व्यवस्था केली आणि बरोबर तसेच झाले. त्या बातमीने आदिलशहा घाबरला, कारण त्याला वाटले की, आता शिवराय दिल्लीच्या बादशहाला सामील होऊन आपल्यावर मोगलांची टोळधाड आणणारच. जर ते दोघे एकत्र आले तर आपली आदिलशाही जागेवर राहील का? हा विचार करून तो खूपच घाबरला. आपला डाव आपल्यावरच उलटतो आहे की काय? असे त्याला वाटले.

फत्तेखान शिवरायांकडून मार खाऊन परत आला. तसेच फर्रादखान बंगळूरहून हात हलवत परतला. मुस्तफाखान जिंजीजवळ मेला आणि आता या शिवरायांनी बादशहाशी जवळीक करून आमचेच दात आमच्याच घशात घातले तर, असा विचार करून आदिलशहा खूपच गोंधळला. आता आपल्याकडे शहाजीराजांना सोडून देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, हे त्याच्या लक्षात आले.

आदिलशहाने असे दाखविले की, आपण शहाजीराजांना स्वखुशीने सोडून देत आहोत. त्यामुळे शहाजीराजांची तेथून सुटका झाली व त्यांना आदिलशहापुढे हजर करण्यात आले. तेव्हा आदिलशहा शहाजीराजांना म्हणाला, “राजे, जे काही घडले ते फक्त गैरसमजुतीमुळे घडले. आता आमच्या मनात तुमच्या विषयी काहीच नाही. आम्ही आपल्या मैत्रीची कदर करतो आहोत. आमचे व तुमचे संबंध आता पूर्वीसारखेच राहतील. तुम्ही फक्त आमच्यासाठी एक गोष्ट करा की, जसे आम्ही तुम्हाला सोडले तसेच तुम्ही आमच्यावरील तुमचे प्रेम दाखवण्यासाठी शिवरायांना सांगून त्यांच्या ताब्यातील कोंढाणा गड आणि संभाजीच्या ताब्यातील बंगळूर आमच्या ताब्यात द्या आणि तुम्ही पूर्वीसारखेच आमच्या सेवेत राहा.”

आदिलशहाची लहर कधी फिरेल याचा विश्वास नाही, असा विचार करून शहाजीराजांनी त्याचे म्हणणे मान्य केले तेव्हा आदिलशहाला खूपच आनंद झाला. त्याने हत्ती, घोडे व मानाचा पोशाख देऊन शहाजीराजांचा मोठा मान-सन्मान केला.

राजगडावर हे वृत्त समजताच माँसाहेबांना आणि शिवरायांना खूप आनंद झाला. आपले वडील सुटले, स्वराज्य बचावले, पराक्रमाचे सार्थक झाले. परंतु एक शल्य मात्र शिवरायांना होते की, कोंढण्यासारखा गड आदिलशहाला परत करावा लागणार होता कारण शहाजीराजांचे तसे पत्र आले होते. शिवरायांनी विचार केला की, ठीक आहे, आम्ही कोंढाणा देऊ; परंतु थोडयाच दिवसांत तो परत जिंकून घेऊ, असा विचार करून शिवरायांनी कोंढाणा आदिलशहाला परत केला परंतु तो परत जिंकण्याचा निर्णय घेऊनच.

या होत्या शिवाजी महाराजांच्या कथा मराठी मध्ये (Shivaji Maharaj Stories In Marathi) तुम्हाला या गोष्टी कसे वाटले आम्हाला कडवा आणि आपल्या मित्रां बरोबर या आर्टिकल ला share करा.

जर तुम्हाला या नंतर च्या गोष्टी वाचायच्या असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये आम्हाला कडवा.

You might like

पुढच्या गोष्टी वाचायच्या आहेत

essay writing on shivaji maharaj in marathi

भरपूर चांगलं पद्धतीनं इतिहास लिहला आहे. शहाजी राजे चा सुटका झाल्यानंतरची इतिहास कधी पोष्ट करणारं??

Very Helpful for me. Proud to be a Maratha..

Post a Comment

Contact form.

छत्रपती शिवाजी महाराज मराठी निबंध Chhatrapati Shivaji Maharaj Essay in Marathi

Chhatrapati Shivaji Maharaj Essay in Marathi: ‘झाले बहु, होतील बहु, परंतु यासम हा ।’ हे वर्णन ज्यांना चपखल लागू पडते ते म्हणजे छत्रपती श्रीशिवाजी महाराज ! म्हणूनच आज तीनशे वर्षे उलटून गेली तरी लोकांच्या मनातील महाराजांचे स्थान अढळ आहे. छत्रपती शिवाजीराजांचे राजा आणि व्यक्ती म्हणून कर्तृत्व हे अतुलनीय होते. त्यांचे चारित्र्य अत्युच्च होते, म्हणूनच त्यांच्या कर्तृत्वाच्या तोफा कालशिरावर अखंड झडतच राहतात.

शिवरायांचा जन्म १६३० मध्ये झाला. १६८० साली त्यांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली. म्हणजे अवघे पन्नास वर्षांचे आयुष्य. पण या अल्प काळात राजांनी केलेली कामगिरी अपूर्व ठरणारी आहे. या यशाचे श्रेय या योगी पुरुषाच्या अजोड कर्तृत्वात आणि महान चारित्र्यातच दडलेले आहे.

शिवनेरी किल्ल्यावर शहाजी भोसले व जिजाबाई यांच्या या सुपुत्राचा जन्म झाला. शिवरायांना पित्याचा सहवास अपुराच मिळाला. पण त्यांच्या कर्तबगार, शूर मातेने या आपल्या ‘असामान्य पुत्राला आपल्या तेजस्वी विचारांचे बोधामृत पाजून परिश्रमपूर्वक घडवले. शिवाजीराजांचे आजोबा मालोजी व पिता शहाजी हे दोघेही शूर होते. त्यांच्या पराक्रमाचा वारसा शिवरायांना मिळाला, शिवाजीराजांनी महाराष्ट्रात प्रथम स्वराज्याचे बी रुजवले आणि त्याचा वेलू वाढवला, स्वराज्याची कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी शिवरायांना अतोनात मेहनत करावी लागली. या सर्व घडामोडीत शिवरायांच्या वाट्याला दगदगीचे जीवन आले; पण राजांनी कधी माघार घेतली नाही. आदिलशाही, निजाम यांच्याबरोबरच काही वेळेला स्वकीयांचाहीविरोध सहन करावा लागला. कधी शक्तीचा तर कधी युक्तीचा वापर करून त्यांनी आपले स्वराज्याचे स्वप्न साकार केले. ६ जून १६७४ रोजी हा शूर वीर राजसिंहासनावर बसला. पण ही तो श्रींची इच्छा’ अशी त्यांची विचारसरणी होती: हे ‘ जनतेचे राज्य’ आहे, असेच ते मानत. भारतातील लोककल्याणकारी राज्याची पहिली कल्पना येथे साकार झाली.

शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक शक सुरू केला. त्याचबरोबर राज्यकारभारविषयक एक सुसूत्र नियमावली तयार केली. अष्टप्रधानांची नियुक्ती केली. त्यांच्या मार्गदर्शनासाठी ‘राजव्यवहारकोश’ तयार करून घेतला. राज्याभिषेकानिमित्त होन’ आणि ‘शिवराई’ ही दोन नवी नाणी व्यवहारात आणली. शिवाजी महाराजांची शासकीय मुद्रा संस्कृतात आहे. राजांनी स्वराज्याचे मानचिन्ह म्हणून भगव्या ध्वजाची निर्मिती केली.

आपल्या राज्याचा कारभार कसा चालावा, याबद्दल महाराजांनी काटेकोर नियम केले होते. राज्याचा कारभार जनताभिमुख ठेवायचा असेल, तर मुलकी सत्ता ही लष्करी सत्तेहून श्रेष्ठ असली पाहिजे, असे महाराजांचे आदेश होते. शिवरायांचा महत्त्वाचा विशेष म्हणजे ते आपल्या प्रजेला सर्वांत श्रेष्ठ मानत आणि सेना व शासनकर्ते यांच्याकडून प्रजेला त्रास होऊ नये काळजी घेत. म्हणूनच लोकांना हा जाणता राजा आपला खराखुरा राजा – लोकांचा राजा वाटतो.

हे निबंध सुद्धा जरूर वाचावे :-

  • माझा आवडता संत निबंध मराठी | Majha Avadta Sant Nibandh in Marathi
  • Taj Mahal Essay | Taj Mahal Nibandh | ताजमहल मराठी निबंध

Marathi Essay

पेटलेली पणती घेऊन, पायाखालची वाट चालत जायची आहे, नवीन वाटांना पायदळी तुडवताना, रचलेल्या शब्दांच्या जोरावर आयुष्याचा वणवा करायचा आहे!!

ham

मराठीचे तपशील

Shivrajyabhishek Din : शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त तुम्हालाही द्यायचंय भाषण? हे मुद्दे येतील उपयोगी

Shivrajyabhishek din 2024 speech : उद्या ६ जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अनेकजण महाराजांबद्दल आपले प्रेमस्वरुपी मनोगत व्यक्त करत असतात. तुमचे मनोगत अथवा भाषण आणखी प्रभावी बनवण्यासाठी हे काही महत्वाचे मुद्दे तुम्हाला उपयोगी पडतील..

शिवराज्याभिषेक सोहळा भाषण

महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक माणसाच्या मनात शिवरायांबद्दल अतिशय प्रेम आणि आदराची भावना आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांना ओळखले जाते. आपला जन्म शिवरायांच्या पवित्र भूमीत झाल्याचं आपण नेहमीच अभिमानाने आणि छातीठोकपणे सर्वत्र सांगतो. उद्याचा दिवस प्रत्येक शिवभक्तासाठी प्रचंड खास आहे.

ट्रेंडिंग न्यूज

कारण उद्या ६ जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. महाराष्ट्रातील लहानांपासून-मोठ्यांपर्यंत प्रत्येक व्यक्तीला वर्षभर या सुवर्ण क्षणाची ओढ लागून असते. अखेर हा सुवर्णदिन अवघ्या एका दिवसावर येऊन राहिला आहे. अनेक लोक सामाजिक किंवा शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असतात. याठिकाणी ते महाराजांबद्दल आपले प्रेमस्वरुपी मनोगत व्यक्त करत असतात. तुमचे मनोगत अथवा भाषण आणखी प्रभावी बनवण्यासाठी हे काही महत्वाचे मुद्दे तुम्हाला उपयोगी पडतील.

छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा

महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सोनेरी पान म्हणजे छ. शिवराज्याभिषेक सोहळा होय. प्रत्येक मराठी माणसासाठी हा दिवस अगदी सोनेरी दिवसच म्हणावा लागेल. यादिवसाबद्दल आजही लोकांमध्ये तितकेच प्रेम, आतुरता, श्रद्धा आणि आदर पाहायला मिळतो. ६ जून १६७४ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर संपन्न झाला होता.

यावर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्याचे तब्बल ३५० वे वर्ष आहे. त्यामुळे यंदाचा राज्याभिषेक सोहळा अतिशय खास असणार आहे. मध्ययुगीन इतिहासात या दिवसाला अनन्यसाधारण असे महत्व आहे. मध्ययुगीन काळात देशावर परकीय शत्रूंचे वर्चस्व डोके वर काढत असताना. शिवरायांनी शूर कामगिरी करत लोकांना या गुलामगिरीतून सोडवत स्वातंत्र्याची पहिली पहाट जनतेला दाखवली होती. याकाळात शिवरायांनी लोकांना स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजावला होता.

Shivrajyabhishek Din Wishes : ऐतिहासिक आठवणींना देऊ उजाळा, शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या खास शुभेच्छा

शिवरायांचे प्रभावी शासन

छत्रपती शिवरायांनी त्याकाळात चालवलेलया शासनपद्धतीचा आधार आजसुद्धा घेतला जातो. महाराजांनी त्याकाळात अष्टप्रधान मंडळ स्थापन करुन कारभार उत्तमरित्या चालवला होता. विशेष म्हणजे महाराजांनी वंशानुसार नव्हे तर गुणांनुसार हे मंडळ निवडले होते. अनंत सभासद यांनी लिहिलेल्या बखरीमध्ये शिवरायांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय कर्तृत्वाबाबत अगदी बारकाईने वर्णन पाहायला मिळते. राजांचे शासन इतके पारदर्शक आणि चोख होते तिथे कोणत्याही शंकेला जागा नव्हती. त्याकाळातील महाराजांच्या शासनात असलेल्या राजव्यवहार कोश, आज्ञापत्र कोश यालाही महत्वाचे स्थान आहे. महाराजांचे शासन त्यांनी आखलेल्या या कायद्यांच्या चौकटीत चालत असे. या शासनव्यवस्थेत गरिबांच्या भाजीच्या देठालासुद्धा हात लावायची कोणाची हिंमत नसायची. अत्यंत दीनदुबळ्या लोकांनासुद्धा महाराजांच्या राज्यात संरक्षण मिळत असे. त्यामुळेच शिवरायांची कीर्ती इतकी महान आहे.

Importance of Jap Mala : हिंदू धर्मातील जप माळेत १०८ मनीच का असतात? विशेष आहे यामागचे कारण

शिवराज्याभिषेकाचे ऐतिहासिक महत्व

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला इतिहासासोबतच लोकांच्या मनात अनन्यसाधारण महत्व आहे हे आपण जाणतोच. मात्र यामागे असलेले ऐतिहासिक महत्व जाणून घेऊया. ''मराठी सत्तेचा उदय आणि उत्कर्ष'' या न्या. महादेव गोविंद रानडे यांच्या ग्रंथामध्ये याबाबतचे महत्व अधोरेखित करण्यात आले आहे. छ. शिवरायांनी स्वराज्य स्थापित करत देशाच्या इतिहासाला नवसंजीवनी दिली होती.

परकीय आक्रमणातील धूर्त आणि दुष्ट शत्रूंचा नायनाट करुन देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचे मौल्यवान कार्य राजेंनी केलं होतं.शिवराज्याभिषेक हा गोरगरीब, दीनदुबळ्या जनतेच्या नवआयुष्याचा आणि उत्साहाचा सार सांगणारा सोहळा होता. शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याने सामाजिक न्याय, बंधुता आणि विशेष म्हणजे स्वातंत्र्याचा पाया रचला होता.

Festivals List : एकादशी, गंगा सप्तमी ते वट सावित्री… जून महिन्यातील सण-उत्सवाची यादी, बायांनो तयारी सुरू झाली का?

WhatsApp channel

  • Privacy Policy
  • Terms and Conditions

MARATHI18.com LOGO

शिवाजी महाराज निबंध | Shivaji Maharaj Essay in Marathi

Shivaji Maharaj Essay in Marathi : शिवाजी महाराज म्हणून ओळखले जाणारे शिवाजी भोसले यांना लोकांचा राजा मानले जात असे. त्याचा लोखंड दृढनिश्चय, पराक्रम आणि प्रभुत्व हे त्यामागचे एक प्रतीक होते. त्याच्या धैर्याला कसलीही सीमा नव्हती. या लेखामध्ये शिवाजी महाराज विद्यार्थ्यांसाठी दीर्घ निबंधातील लेख आहेत. आपण ऐतिहासिक वस्तुस्थितीचे अनुसरण करू शकता आणि शिवाजी महाराजांवर स्वतःच एक निबंध लिहू शकता. स्वरूपात अनुसरण करा आणि परीक्षेत अधिक गुण मिळविण्यासाठी योग्य क्रम ठेवा. शिवाजी महाराज निबंध लेखन स्पर्धेच्या तयारीसाठीही या निबंधांचा उपयोग केला जाऊ शकतो.

शिवाजी महाराज निबंध – Shivaji Maharaj Essay in Marathi

शिवाजी महाराज निबंध, Shivaji Maharaj Essay in Marathi

शिवाजी महाराजांवर मोठा निबंध (Shivaji Maharaj Essay in Marathi)

शिवाजी भोसले यांचा जन्म शहाजी भोसले यांच्या राजघराण्यात झाला. तो एक जन्मजात नेता होता आणि त्याने मराठा साम्राज्य प्रस्थापित केले जे सामर्थ्यवान मुघलांना घाबरून गेले. 16 फेब्रुवारी 1627 रोजी शिवनेरी येथे जन्मलेले शिवाजी शाहजींचा अभिमानपुत्र होते. इंग्रजीतील हा शिवाजी महाराज निबंध तुम्हाला लोकांच्या राजाच्या वैभव आणि पराक्रमाबद्दल सांगेल.

शिवाजीची आई जिजाबाई देखील व्यक्तिमत्त्वात खूप मजबूत होती. ती सद्गुण होती आणि तिने निर्भय होण्यासाठी आपल्या मुलास योग्य शिक्षण दिले. रामायण आणि महाभारताचे शौर्य आणि वैभव ऐकून तो मोठा झाला. त्यांनी या दोन महाकाव्यांच्या शिकवणुकींचे पालन केले परंतु आदर्श हिंदूंच्या चरित्रातील दृढ लवचिक वैशिष्ट्येही आत्मसात केली. त्याने कधीही कोणत्याही शक्तीपुढे वाकणे शिकले नाही. या शिवाजी महाराज निबंधात त्यांचे जीवन आणि कर्तृत्व उलगडले जाईल.

त्याला दादा कोनादेव यांनी समकालीन काळातील विविध युद्ध कौशल्ये शिकण्यासाठी प्रोत्साहित केले. अशा कौशल्यांचा उपयोग करून त्याने कोणत्याही वैविध्यपूर्ण परिस्थितीत टिकून राहावे, असे त्याच्या गुरूची इच्छा होती. आपल्या अस्तित्वाची आणि युद्धाच्या कौशल्यांबरोबरच ते एक राष्ट्रवादी आणि त्याच्या शब्दांचा माणूस बनले. एक पूर्ण योद्धा असल्याने त्यांनी संत रामदेव यांच्या शिकवणीचे पालन केले आणि धर्माचे महत्त्व समजावून सांगितले. या शिक्षणामध्ये सर्व धर्म, राजकारण आणि संस्कृतीचे महत्त्व होते. इतिहासकारांच्या इंग्रजीतील शिवाजी महाराजांच्या निबंधाच्या पुराव्यांवरून आपण लक्षात घ्याल की त्यांच्या कौशल्यांचा आणि जीवनातील धड्यांमुळे त्यांना भारतातील महान नेते बनण्यास मदत झाली.

तो पटकन भिन्न जीवन आणि युद्ध कौशल्य मध्ये पारंगत झाला आणि जगाच्या वास्तवात प्रवेश केला. त्याने आपल्या राज्याभोवती असलेल्या शत्रूंवर हल्ला करण्यास सुरूवात केली आणि मोठे आणि साम्राज्य निर्माण करण्यासाठी एकामागून एक त्यांना पकडले. तोरान आणि पुरंदरच्या किल्ल्यांमध्ये त्यांचा ध्वज फडकविण्यात आला त्या क्षणी, त्याच्या शौर्याच्या आणि शक्तीच्या कहाण्या दिल्ली आणि आग्रापर्यंत पोहोचल्या. राज्यकर्ते, ते अत्याचारी आहेत किंवा विषयप्रेमी, त्याच्या नावाची भीती वाटू लागले.

विजापूरचा राजा आदिल शहा आपल्या वाढत्या सामर्थ्याने घाबरला होता. त्यानंतर त्याने त्याचे वडील शहजी यांना ताब्यात घेतले आणि तुरूंगात टाकले. आपल्या वडिलांच्या तुरूंगवासाबद्दल जाणून घेतल्यावर तो रागावला होता परंतु त्याने आपले विचार गमावले नाहीत. त्याने चांगले नियोजन केले आणि आपल्या वडिलांना मुक्त केले. यामुळे आदिल शहा आणखी चिडला. त्याने आपला सेनापती अफजलखानाला खुनाची योजना आखण्याचे व शिवाजीचे निर्मूलन करण्याचे आदेश दिले. आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि त्याला ठार मारण्यासाठी अफझलने मित्र म्हणून काम केले. शिवाजी एक पाऊल पुढे होते. त्याने आपल्या झग्याच्या आत एक घातक खंजीर लपवून अफझलखानला ठार केले आणि तेथून पळ काढला.

त्याच्या अधिपत्याखाली आणि पराक्रमाच्या काळात मराठा साम्राज्य दिवसेंदिवस मजबूत होत गेले. सर्वसामान्य लोकांना जुलमी लोकांपासून मुक्त केल्यामुळे त्याला स्वातंत्र्यसैनिक म्हणून ओळखले जात असे. त्याला बर्‍याच जणांनी मुस्लिमविरोधी मानले होते पण प्रत्यक्षात ते खरे नाही. त्याचे दोन सेनापती सिद्दी आणि दौलत खान होते. इतिहासकारांनी असे सुचवले आहे की त्याच्या सैन्यात विविध वंश व धर्मांचे सैनिक होते. जाती, धर्म किंवा रंग या दृष्टीने लोकांमध्ये फरक करणे त्याने कधीच शिकले नाही.

समकालीन काळातील जुलमी निर्मूलनावर त्यांनी आपली शक्ती केंद्रित केली. त्यातील बहुतेक मुस्लिम शासक होते. राज्य कधीही उखडण्यासाठी त्याने कोणतेही धार्मिक युद्ध किंवा हेतू भडकावले नाहीत. औरंगजेब आणि इतर शासकांमधील सामान्य लोकांची वेदना समजून घेण्यासाठी त्याने केले. त्यांनी बऱ्याच लोकांना मुक्त केले आणि म्हणूनच त्यांच्या चाहत्यांनी त्यांना छत्रपती शिवाजी हे नाव दिले.

त्यांनी मराठा साम्राज्यावर 27 वर्षे राज्य केले आणि त्याचे अनुकरण करण्याचे उदाहरण दिले. त्यानंतर तो आजारी पडला आणि तीन आठवड्यांपर्यंत त्याला अज्ञात ताप होता. त्यानंतर तो आजाराने निधन झाला आणि 3 एप्रिल 1680 रोजी रायगड किल्ल्यात त्यांचे निधन झाले.

अजून वाचा: शिवाजी महाराज मराठी माहिती

शिवाजी महाराजांवर लहान निबंध (Shivaji Maharaj Essay in Marathi)

शिवाजी महाराजांवर छोटा परिच्छेद.

शिवाजी भोसले, ज्यांना छत्रपती शिवाजी म्हणूनही ओळखले जाते, त्यांचा जन्म 16 फेब्रुवारी 1927 रोजी झाला होता. ते शाहजी आणि जिजाबाई यांचे पुत्र होते. लहान वयातच शिवाजींनी आई आणि वडिलांकडून योग्य शिक्षण घेतले. त्याचा अदम्य आत्मा आणि बुद्धिमत्ता चार्टवर नव्हता. धार्मिक शिकवणींसह त्यांनी युद्धातील सर्व कौशल्ये शिकली. त्याने त्याच्या आईकडून त्याच्या वर्णातील मजबूत वैशिष्ट्ये आत्मसात केली. तो जात आणि धर्म विचारात न घेता सर्वांना समान आहे हे शिकून मोठा झाला.

तो एक सामर्थ्यशाली राज्यकर्ता झाला आणि त्याने वेगवेगळ्या राज्यांना एकत्र करून मराठा साम्राज्य निर्माण केले. त्याच्या बुद्धीमत्ता आणि पराक्रमामुळे मुघल साम्राज्य आणि इतर राज्यकर्ते भीतीने थरथर कापू लागले. त्याचा शत्रू आदिल शहा याला ठार मारायचा होता. त्याने आपला सेनापती अफझल खान याला फसवण्यासाठी व जागीच ठार मारण्यासाठी पाठवले. शिवाजी एक पाऊल पुढे होते. त्याने एक खंजीर लपवून अफजलखानला ठार मारले आणि तेथून पळ काढला. त्याने बरीच लढाई केली आणि लोकांना अनेक शासकांच्या जुलमापासून मुक्त केले. म्हणूनच त्याला ‘छत्रपती शिवाजी’ किंवा लोकांचा राजा असे नाव पडले. आजारामुळे 1680 मध्ये त्यांचे निधन झाले.

शिवाजी महाराजांचा हा छोटा आणि दीर्घ निबंध (Shivaji Maharaj Essay in Marathi) शिवाजीच्या जीवन आणि चांगल्या कार्यांबद्दल सांगतो. त्याला लोकांचा राजा का म्हटले गेले हे आपण शिकतो. मराठा साम्राज्य निर्माण करण्यासाठी त्याने बरीच राज्ये एकत्रित केली आणि तत्कालीन भारताच्या क्रूर राज्यकर्त्यांविरूद्ध युद्ध केले. त्याच्या पराक्रमामुळे राज्यकर्ते भयभीत झाले. तो कोणत्याही परिस्थितीवर मात करण्यासाठी पुरेसा हुशार होता.

नरेंद्र मोदी निबंध मराठी | Narendra Modi Nibandh in Marathi

माझा आवडता महिना श्रावण निबंध मराठी | maza avadta mahina shravan nibandh, माझा आवडता खेळ बॅडमिंटन मराठी निबंध | maza avadta khel badminton marathi nibandh, माझा आवडता कवी गोस्वामी तुलसीदास, leave a reply cancel reply.

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

  • CBSE Class 10th
  • CBSE Class 12th
  • UP Board 10th
  • UP Board 12th
  • Bihar Board 10th
  • Bihar Board 12th
  • Top Schools in India
  • Top Schools in Delhi
  • Top Schools in Mumbai
  • Top Schools in Chennai
  • Top Schools in Hyderabad
  • Top Schools in Kolkata
  • Top Schools in Pune
  • Top Schools in Bangalore

Products & Resources

  • JEE Main Knockout April
  • Free Sample Papers
  • Free Ebooks
  • NCERT Notes
  • NCERT Syllabus
  • NCERT Books
  • RD Sharma Solutions
  • Navodaya Vidyalaya Admission 2024-25
  • NCERT Solutions
  • NCERT Solutions for Class 12
  • NCERT Solutions for Class 11
  • NCERT solutions for Class 10
  • NCERT solutions for Class 9
  • NCERT solutions for Class 8
  • NCERT Solutions for Class 7
  • JEE Main 2024
  • MHT CET 2024
  • JEE Advanced 2024
  • BITSAT 2024
  • View All Engineering Exams
  • Colleges Accepting B.Tech Applications
  • Top Engineering Colleges in India
  • Engineering Colleges in India
  • Engineering Colleges in Tamil Nadu
  • Engineering Colleges Accepting JEE Main
  • Top IITs in India
  • Top NITs in India
  • Top IIITs in India
  • JEE Main College Predictor
  • JEE Main Rank Predictor
  • MHT CET College Predictor
  • AP EAMCET College Predictor
  • GATE College Predictor
  • KCET College Predictor
  • JEE Advanced College Predictor
  • View All College Predictors
  • JEE Advanced Cutoff
  • JEE Main Cutoff
  • JEE Advanced Answer Key
  • JEE Advanced Result
  • Download E-Books and Sample Papers
  • Compare Colleges
  • B.Tech College Applications
  • KCET Result
  • MAH MBA CET Exam
  • View All Management Exams

Colleges & Courses

  • MBA College Admissions
  • MBA Colleges in India
  • Top IIMs Colleges in India
  • Top Online MBA Colleges in India
  • MBA Colleges Accepting XAT Score
  • BBA Colleges in India
  • XAT College Predictor 2024
  • SNAP College Predictor
  • NMAT College Predictor
  • MAT College Predictor 2024
  • CMAT College Predictor 2024
  • CAT Percentile Predictor 2024
  • CAT 2024 College Predictor
  • TS ICET 2024 Results
  • AP ICET Counselling 2024
  • CMAT Result 2024
  • MAH MBA CET Cutoff 2024
  • Download Helpful Ebooks
  • List of Popular Branches
  • QnA - Get answers to your doubts
  • IIM Fees Structure
  • AIIMS Nursing
  • Top Medical Colleges in India
  • Top Medical Colleges in India accepting NEET Score
  • Medical Colleges accepting NEET
  • List of Medical Colleges in India
  • List of AIIMS Colleges In India
  • Medical Colleges in Maharashtra
  • Medical Colleges in India Accepting NEET PG
  • NEET College Predictor
  • NEET PG College Predictor
  • NEET MDS College Predictor
  • NEET Rank Predictor
  • DNB PDCET College Predictor
  • NEET Result 2024
  • NEET Asnwer Key 2024
  • NEET Cut off
  • NEET Online Preparation
  • Download Helpful E-books
  • Colleges Accepting Admissions
  • Top Law Colleges in India
  • Law College Accepting CLAT Score
  • List of Law Colleges in India
  • Top Law Colleges in Delhi
  • Top NLUs Colleges in India
  • Top Law Colleges in Chandigarh
  • Top Law Collages in Lucknow

Predictors & E-Books

  • CLAT College Predictor
  • MHCET Law ( 5 Year L.L.B) College Predictor
  • AILET College Predictor
  • Sample Papers
  • Compare Law Collages
  • Careers360 Youtube Channel
  • CLAT Syllabus 2025
  • CLAT Previous Year Question Paper
  • NID DAT Exam
  • Pearl Academy Exam

Predictors & Articles

  • NIFT College Predictor
  • UCEED College Predictor
  • NID DAT College Predictor
  • NID DAT Syllabus 2025
  • NID DAT 2025
  • Design Colleges in India
  • Top NIFT Colleges in India
  • Fashion Design Colleges in India
  • Top Interior Design Colleges in India
  • Top Graphic Designing Colleges in India
  • Fashion Design Colleges in Delhi
  • Fashion Design Colleges in Mumbai
  • Top Interior Design Colleges in Bangalore
  • NIFT Result 2024
  • NIFT Fees Structure
  • NIFT Syllabus 2025
  • Free Design E-books
  • List of Branches
  • Careers360 Youtube channel
  • IPU CET BJMC
  • JMI Mass Communication Entrance Exam
  • IIMC Entrance Exam
  • Media & Journalism colleges in Delhi
  • Media & Journalism colleges in Bangalore
  • Media & Journalism colleges in Mumbai
  • List of Media & Journalism Colleges in India
  • CA Intermediate
  • CA Foundation
  • CS Executive
  • CS Professional
  • Difference between CA and CS
  • Difference between CA and CMA
  • CA Full form
  • CMA Full form
  • CS Full form
  • CA Salary In India

Top Courses & Careers

  • Bachelor of Commerce (B.Com)
  • Master of Commerce (M.Com)
  • Company Secretary
  • Cost Accountant
  • Charted Accountant
  • Credit Manager
  • Financial Advisor
  • Top Commerce Colleges in India
  • Top Government Commerce Colleges in India
  • Top Private Commerce Colleges in India
  • Top M.Com Colleges in Mumbai
  • Top B.Com Colleges in India
  • IT Colleges in Tamil Nadu
  • IT Colleges in Uttar Pradesh
  • MCA Colleges in India
  • BCA Colleges in India

Quick Links

  • Information Technology Courses
  • Programming Courses
  • Web Development Courses
  • Data Analytics Courses
  • Big Data Analytics Courses
  • RUHS Pharmacy Admission Test
  • Top Pharmacy Colleges in India
  • Pharmacy Colleges in Pune
  • Pharmacy Colleges in Mumbai
  • Colleges Accepting GPAT Score
  • Pharmacy Colleges in Lucknow
  • List of Pharmacy Colleges in Nagpur
  • GPAT Result
  • GPAT 2024 Admit Card
  • GPAT Question Papers
  • NCHMCT JEE 2024
  • Mah BHMCT CET
  • Top Hotel Management Colleges in Delhi
  • Top Hotel Management Colleges in Hyderabad
  • Top Hotel Management Colleges in Mumbai
  • Top Hotel Management Colleges in Tamil Nadu
  • Top Hotel Management Colleges in Maharashtra
  • B.Sc Hotel Management
  • Hotel Management
  • Diploma in Hotel Management and Catering Technology

Diploma Colleges

  • Top Diploma Colleges in Maharashtra
  • UPSC IAS 2024
  • SSC CGL 2024
  • IBPS RRB 2024
  • Previous Year Sample Papers
  • Free Competition E-books
  • Sarkari Result
  • QnA- Get your doubts answered
  • UPSC Previous Year Sample Papers
  • CTET Previous Year Sample Papers
  • SBI Clerk Previous Year Sample Papers
  • NDA Previous Year Sample Papers

Upcoming Events

  • NDA Application Form 2024
  • UPSC IAS Application Form 2024
  • CDS Application Form 2024
  • CTET Admit card 2024
  • HP TET Result 2023
  • SSC GD Constable Admit Card 2024
  • UPTET Notification 2024
  • SBI Clerk Result 2024

Other Exams

  • SSC CHSL 2024
  • UP PCS 2024
  • UGC NET 2024
  • RRB NTPC 2024
  • IBPS PO 2024
  • IBPS Clerk 2024
  • IBPS SO 2024
  • Top University in USA
  • Top University in Canada
  • Top University in Ireland
  • Top Universities in UK
  • Top Universities in Australia
  • Best MBA Colleges in Abroad
  • Business Management Studies Colleges

Top Countries

  • Study in USA
  • Study in UK
  • Study in Canada
  • Study in Australia
  • Study in Ireland
  • Study in Germany
  • Study in China
  • Study in Europe

Student Visas

  • Student Visa Canada
  • Student Visa UK
  • Student Visa USA
  • Student Visa Australia
  • Student Visa Germany
  • Student Visa New Zealand
  • Student Visa Ireland
  • CUET PG 2024
  • IGNOU B.Ed Admission 2024
  • DU Admission 2024
  • UP B.Ed JEE 2024
  • LPU NEST 2024
  • IIT JAM 2024
  • IGNOU Online Admission 2024
  • Universities in India
  • Top Universities in India 2024
  • Top Colleges in India
  • Top Universities in Uttar Pradesh 2024
  • Top Universities in Bihar
  • Top Universities in Madhya Pradesh 2024
  • Top Universities in Tamil Nadu 2024
  • Central Universities in India
  • CUET DU Cut off 2024
  • IGNOU Date Sheet
  • CUET DU CSAS Portal 2024
  • CUET Response Sheet 2024
  • CUET Result 2024
  • CUET Participating Universities 2024
  • CUET Previous Year Question Paper
  • CUET Syllabus 2024 for Science Students
  • E-Books and Sample Papers
  • CUET Exam Pattern 2024
  • CUET Exam Date 2024
  • CUET Cut Off 2024
  • CUET Exam Analysis 2024
  • IGNOU Exam Form 2024
  • CUET PG Counselling 2024
  • CUET Answer Key 2024

Engineering Preparation

  • Knockout JEE Main 2024
  • Test Series JEE Main 2024
  • JEE Main 2024 Rank Booster

Medical Preparation

  • Knockout NEET 2024
  • Test Series NEET 2024
  • Rank Booster NEET 2024

Online Courses

  • JEE Main One Month Course
  • NEET One Month Course
  • IBSAT Free Mock Tests
  • IIT JEE Foundation Course
  • Knockout BITSAT 2024
  • Career Guidance Tool

Top Streams

  • IT & Software Certification Courses
  • Engineering and Architecture Certification Courses
  • Programming And Development Certification Courses
  • Business and Management Certification Courses
  • Marketing Certification Courses
  • Health and Fitness Certification Courses
  • Design Certification Courses

Specializations

  • Digital Marketing Certification Courses
  • Cyber Security Certification Courses
  • Artificial Intelligence Certification Courses
  • Business Analytics Certification Courses
  • Data Science Certification Courses
  • Cloud Computing Certification Courses
  • Machine Learning Certification Courses
  • View All Certification Courses
  • UG Degree Courses
  • PG Degree Courses
  • Short Term Courses
  • Free Courses
  • Online Degrees and Diplomas
  • Compare Courses

Top Providers

  • Coursera Courses
  • Udemy Courses
  • Edx Courses
  • Swayam Courses
  • upGrad Courses
  • Simplilearn Courses
  • Great Learning Courses

Essay On Shivaji Maharaj in English for Students: 100, 200 and 500 Words

English Icon

Shivaji was the founder of The Maratha Empire and was known for his excellent knowledge and interest in the arts. He was profoundly devout and had grown up hearing Hindu texts read aloud by his mother, Jijabai. Here are 100, 200 and 500 word essays on Shivaji Maharaj.

Chhatrapati Shivajiraje Bhosale, also known as Shivaji Maharaj, reigned in significant parts of India between 1646 - 1680. He was the founder of The Maratha Empire and was known for his excellent knowledge and interest in the arts. Chhatrapati Maharaj is famous for his insane tactics in war. He was a brave king who didn’t fear any dynasty at that time. Here are a few sample essays on Shivaji Maharaj.

100 Words Essay on Shivaji Maharaj

200 words essay on shivaji maharaj, shivaji maharaj and his empire, shivaji maharaj as a child, 500 words essay on shivaji maharaj, life of shivaji maharaj.

Essay On Shivaji Maharaj in English for Students: 100, 200 and 500 Words

On 19 February 1627, Shivaji Maharaj was born in a Maratha family at Shivnari Fort, Maharashtra. His steadfastness, bravery, and dominance served as examples for all who came after him. His courage knew no limits. He was a combatant who fought against injustice to promote the welfare of the populace.

Shivaji Maharaj was regarded as a brave warrior who employed novel military strategies and was a skilled administrator. When he was a child, he used to read the glorious stories of Mahabharata and Ramayana. He not only internalised the solid and robust traits of the ideal Hindu's character but also adhered to their teachings from these two epics. He never learnt to submit to authority figures.

The Maratha emperor, Shivaji Maharaj was a courageous and resilient ruler. When the Mughals ruled India, he came as a gleam of hope to help people. He was viewed as an equal and fair ruler who would go to extreme lengths to help people in need.

He quickly mastered the varieties of survival and combat techniques and adjusted them to world reality. In order to build a larger and more powerful empire, he began to fight and subdue the adversaries who were in close proximity to his realm. Every day, the Maratha Empire got more potent thanks to his power and bravery. He liberated regular people from oppressors, earning him a reputation as a freedom fighter. He concentrated his efforts on destroying the dictators of the modern age.

Shivajiraje received a good education from his parents when he was a little child. His knowledge and calm spirit were unmatched. Along with religious instruction, he studied all the techniques for combat. He inherited his mother's assertive personality traits. He learned as a child that everyone is created equal, regardless of caste or religion. He engaged in several wars and liberated humanity from the oppression of numerous tyrants. This is how he came to be known as "Chhatrapati Shivaji," or the ruler of the people.

The history of India is replete with tales of the bravery of its men and women. Chhatrapati Shivaji Maharaja of the Maratha Empire was one of them. Shivajiraje’s parents had a significant influence on his life. His mother was Jijabai Bhosale, and his father was Shahaji Bhosale. Shivajiraje was courageous; at the age of 15, he managed to take three forts. In the year 1674, Shivaji was crowned Chhatrapati Shivaji in the Raigad fort.

Shivaji was profoundly devout and had grown up hearing Hindu texts read aloud by his mother, Jijabai. Despite being a devoted Hindu, Shivaji was liberal and supported other faiths.

Raigad served as the capital when Shivaji established the Maratha Empire, which he later expanded by seizing successive forts. To build his empire, he engaged in conflict with the Mughal Empire, the British Empire, and other feudal powers.

Battles | He fought many battles, like the Battle of Pratapgad. On November 10, 1659, he engaged in combat with the Adilshahi commander Afzal Khan and the soldiers of the Maratha ruler Chhatrapati Shivaji Maharaj at the town of Satara in Maharashtra, India. This battle was majorly fought on foot and with artillery like camels, elephants, horses etc.

Another example would be the Battle of Kolhapur. It was a battle fought on December 28, 1659, between the Maratha Chhatrapati Shivaji and the Adilshahi armies close to Kolhapur, Maharashtra. It is estimated that both armies had an equal number of soldiers in the battle. But Shivaji used smart tactics to fight and win this battle and conquer Kolhapur.

Also, the Battle of Pavan Khind, fought on July 13, 1660, near Fort Vishalgad, close to Kolhapur, Maharashtra, India, between Siddi Masud of Adilshah and the Maratha Sardar Baji Prabhu Deshpande.

Shivaji Maharaj and Mental Warface

Shivaji had an intelligent way to carry out mental warfare. Shivaji kept a little but capable standing army. Shivaji was mindful of his army's limits. He realised that traditional military tactics were unable to deal with the Mughals' large, well-trained cavalry, which was armed with field artillery. Shivaji thus employed guerilla strategies called Ganimi Kawa. Shivaji was a pro at guerrilla fighting.

Armed forces sent to stop him were routinely baffled and routed by his techniques. He understood that supplies were the weakest link in the then-current huge, sluggish armies. He cut off the enemy's supplies by using his local terrain expertise and his light cavalry's superior mobility. Shivaji declined to engage in physical combat. Instead, he used his selection of treacherous hills and jungles to draw the adversaries, trapping them there and then routing them.

Shivaji Maharaj and Indian History

Shivaji was well known for his steadfast adherence to a warrior's code of ethics and his moral excellence. During the Indian Independence Movement, he was honoured as a national hero. While some versions of Shivaji claim that the Brahmin guru Samarth Ramdas had a significant impact on him, others argue that later Brahmin writers overemphasised Ramdas' influence in order to strengthen their position. By defending Swarajya's beliefs and Maratha heritage and using his administrative abilities, Shivaji created a royal name for himself in history.

Applications for Admissions are open.

Aakash iACST Scholarship Test 2024

Aakash iACST Scholarship Test 2024

Get up to 90% scholarship on NEET, JEE & Foundation courses

ALLEN Digital Scholarship Admission Test (ADSAT)

ALLEN Digital Scholarship Admission Test (ADSAT)

Register FREE for ALLEN Digital Scholarship Admission Test (ADSAT)

JEE Main Important Physics formulas

JEE Main Important Physics formulas

As per latest 2024 syllabus. Physics formulas, equations, & laws of class 11 & 12th chapters

PW JEE Coaching

PW JEE Coaching

Enrol in PW Vidyapeeth center for JEE coaching

JEE Main Important Chemistry formulas

JEE Main Important Chemistry formulas

As per latest 2024 syllabus. Chemistry formulas, equations, & laws of class 11 & 12th chapters

ALLEN JEE Exam Prep

ALLEN JEE Exam Prep

Start your JEE preparation with ALLEN

Download Careers360 App's

Regular exam updates, QnA, Predictors, College Applications & E-books now on your Mobile

student

Certifications

student

We Appeared in

Economic Times

School Essay

Essay On Chhatrapati Shivaji Maharaj

  • Post category: Essay
  • Reading time: 7 mins read

Set 1: Essay On Chhatrapati Shivaji Maharaj

A Shivaji Bhonsle was an Indian warrior King. He was the founder of Maratha kingdom in India. He was the first Hindu to establish a Hindu Empire after centuries of Muslim rule. In 1674, Shivaji became the crowned King and took up the title of Chhatrapati.

Shivaji was born in the hill-fort of Shivneri near Pune. His mother Jijabai named him Shivaji in honour of the Goddess Shivai. Shivaji’s father Shahaji Bhonsle was a Maratha general who served the King of Bijapur. Shivaji was extremely devoted to his mother, who was a religious woman. Religious teachings in early life had a great impact on Shivaji. He carefully studied the two great Hindu epics Ramayana and Mahabharata.

Shahaji handed over the responsibility of his wife and son to a Brahmin named Dadoji Kondev. The charge of Shivaji’s education was given to Dadoji. Shivaji became very skilful in the art of riding horses and warfare. Dadoji used to read to him the stories of the Ramayana and Mahabharata, which were full of patriotism and heroism. Thus,

the fire of patriotism was sparked in Shivaji while he was young. The stories of Mughal control upon the Hindus also had a great influence upon him. Shivaji made up his mind to free his country and people from the hands of Mughals.

Shivaji was a born leader. In Pune, he gathered a small group of young boys. With the help of this small army of hill men, he began his struggle. He captured many small forts, which belonged to the King of Bijapur. At the age of 20, he captured the important fort of Purandar. At last, the King sent his General Afzal Khan to arrest Shivaji. Afzal Khan tried to kill him but Shivaji killed him and destroyed Bijapur army. Finally, the King of Bijapur had to make peace with Shivaji.

Shivaji now began his struggle with Mughal Emperor Aurangzeb. The Emperor sent Mughal General Shaista Khan against Shivaji. A surprise night attack was conducted by Shivaji on the camp of Shaista Khan who had marched over Swarajya and was staying in Lal Mahal. Shivaji attacked with his sward but Shaista Khan succeeded in escaping, losing his fingers.

Aurangzeb sent Raja Jai Singh, against Shivaji. He convinced Shivaji to meet Aurangzeb. Shivaji reached Delhi butAurangzeb did not treat him kindly. He imprisoned Shivaji. Soon Shivaji managed to escape and reached Raigad. Later Shivaji got back the forts that he had given to Aurangzeb.

Shivaji Maharaj had the wisdom of a great leader. He organized his Government in a better way than the Mughals. He respected all religions. Some of the Muslim Sardars in Shivaji’s administration were Ibrahim Khan, Madari Mehtar, Daulat Khan and Kazi Haider. He was truthful and kind King. He was a great patriot. He had high regard for women of all castes. He believed that it was his duty to protect his people. He was one of the greatest heroes that India has ever seen.

Set 2: Essay On Shivaji Maharaj in English for Students: 100 200 and 500 Words

Shivaji was born at ‘Shivnery’ fort near Pune. His father Shahji Raje Bhonsle was an army officer in Bijapur kingdom. He spent his childhood with his mother, Jijabai, a brave, bold and courageious lady From the very beginning Jijabai inspired him to become brave and set up an independent state.

During his childhood, he played with swords and other weapons. He took special interest in horse riding. Guru Samarth Swami Ramdas was his teacher as done before. After completing his education, he started gathering his own forces and attacked some forts of Sultan of Bijapur. In order to teach a lesson to Shivaji, Sultan of Bijapur ordered to arrest his father Shahji. But this could not stop Shivaji. He captured many forts and this made Sultan very angry. Shivaji was very clever and was successful in killing Afzal Khan, the General of Bijapur. Death of Afzal Khan encouraged him and he was successful in establishing a Maratha state in Deccan.

In his lifetime, Shivaji also fought against Mughal Emperor, Aurangzeb. It was a very hard task. He fought against Aurangzeb for about twenty years, sometimes winning and sometimes losing the battles. But he was never discouraged. He invented new war tricks known as guerrilla tactics.

Once he was arrested at Agra in Aurangzeb’s darbar by deceit but he managed to run away from the prison. Reaching Maharashtra, he was again successful in setting up an independent Maratha Empire. He was called ‘Chhatrapati Shivaji’. He became the king. He was a very good adminstrator. He respected every religion. There were many Muslim soldiers in his army. He respected womenfolk. Though he was short in height but he had an impressive personality.

He had qualities of head and heart. He was perfect in the art of warfare and, at the same time, helped the weak and the poor. He always looted the rich and distributed the booty among the poor people and peasants. The bravery and achievements of Shivaji are written in golden words in Indian history.

  • Essay On Binge Drinking Among Today’s Students
  • Essay On Annual Sports Meet in My School
  • Essay On An Ideal Teacher
  • Essay On Annual Day
  • Essay On An Unwelcome Guest
  • Essay On An Indian Wedding
  • Essay On An Ideal Principal
  • Essay On Are We Happier Than Our Forefathers
  • Essay On An Ideal School
  • Essay On An Indian Village

Please Share This Share this content

  • Opens in a new window

You Might Also Like

Read more about the article Essay On Swami Dayanand Saraswati

Essay On Swami Dayanand Saraswati

Read more about the article Essay On Gratitude

Essay On Gratitude

Read more about the article Essay On Guru Nanak

Essay On Guru Nanak

Essay on a river in flood, essay on a dream i had, essay on a visit to a battlefield, leave a reply cancel reply.

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Talk to our experts

1800-120-456-456

  • Shivaji Maharaj Essay

ffImage

Essay on Shivaji Maharaj

Shivaji Bhonsle, also known as Shivaji Maharaj, was considered the people’s king. His iron determination, valour, and dominance were the epitomes to follow. His courage knew no bounds. This article includes long and short Shivaji Maharaj essays for students. You can follow the historical facts and write an essay on Shivaji Maharaj on your own. Follow the format and maintain the proper sequence to score more in the exam. These essays can also be used to prepare for a Shivaji Maharaj essay writing competition.

Living for the people was a king. The fighter who strives for the wellbeing of the people by fighting against injustice. The Maratha Empire is one of the world's prestigious empires created by a leader who refused to live as a slave. Our goal in this article is to give you some insight into the life of Chhatrapati Shivaji Maharaj, the great Maratha warrior.

Chhatrapati Shivaji Maharaj was a Maratha warrior and founding ruler of the Maratha empire in western India. In India and even in other countries, he is still considered the greatest warrior of his time. An innovative military tactician and a skilful administrator, he is considered a valorous warrior. The great qualities he possessed as a leader and king helped him build the Maratha Empire into a powerful and massive power.

Note: ➤ Predict your NEET rank effortlessly with our NEET Rank Predictor 2024 !

Long Essay on Shivaji Maharaj   

Shivaji Bhonsle was born in the royal family of Shahaji Bhonsle. He was a born leader and went on to establish the Maratha Empire that even terrified the mighty Mughals. Born on 16 th February 1627 in Shivneri, Shivaji was the proud son of Shahji. This Shivaji Maharaj essay in English will tell you about the glory and valour of the people’s king.

Shivaji’s mother Jijabai was also very strong in personality. She was virtuous and gave the proper education to her son to make him fearless. He grew up listening to the valour and glory of the Ramayana and Mahabharata. He also followed the teachings of these two epics but also imbibed the strong resilient features of an ideal Hindu’s character. He never learned to bow down to any force. In this Shivaji Maharaj essay, his life and achievements will be unfurled.

A Description of Shivaji Maharaj's Childhood

For the people whose lives were ruined by the Mughal Empire, the birth of Chhatrapati Shivaji Maharaj was a good omen. During the hardships of the Mughal rule, he came as a ray of hope for the people. Maharaj was born on 18th February 1630 according to the Julian calendar and on Falgun Krishna Tritiya (Falgun Krishna Tritiya) according to the Hindu calendar at Shivneri Fort, in Junnar city, near Pune district, to Shahaji Bhosale and Jijabai Bhosale. We have provided some information about Shivaji Maharaj's birthdate at the end of this article. (There are some controversies about Shivaji Maharaj's birthdate.)

During his childhood, his mother Jijamata called him "Shivba". He served the King of Bijapur during his young life. As well as being a "Jahagirdar," he lived in a certain area in Pune. Jijabai, Shivaji's mother, was a deeply religious and ambitious woman whose father was Sindkhed leader Lakhujirao Jadhav. The truth will triumph in the end, according to Shivaji, who has been taught that fighting for what is right no matter what challenges you face is the most important lesson she taught him as a child. As Shivaji was growing up, Jijamata's teachings had a profound effect on his mind.

He was encouraged by Dada Konadev to learn different warfare skills relevant to the contemporary era. His guru wanted him to survive any diverse condition by using such skills. Apart from his survival and warfare skills, he became a nationalist and the man of his words. Being a full-fledged warrior, he followed the teachings of Saint Ramdev and understood the importance of religion. This education included the importance of all religions, politics, and cultures. From the evidence of Shivaji Maharaj's essay in English of historians, you will observe that his skills and life lessons helped him to become one of the greatest leaders of India.

He quickly became adept at different life and warfare skills and entered into the reality of the world. He started to attack the enemies surrounding his kingdom and capture them one after the other to make a bigger and stronger empire. The moment his flag was hoisted in the forts of Toran and Purandar, the stories of his valour and strength reached Delhi and Agra. The rulers, whether they are tyrants or subject-loving, started to fear his name.

Adil Shah, the king of Bijapur, was afraid of his growing power. He then captured his father Shahji and imprisoned him. Learning about his father’s imprisonment, he was furious but did not lose his mind. He planned well and freed his father. This made Adil Shah even more furious. He ordered his commander Afzal Khan to plan a murder and eradicate Shivaji. Afzal acted as a friend to gain his confidence and kill him. Shivaji was one step ahead. He killed Afzal Khan by hiding a deadly dagger inside his cloak and fled.

Under his dominance and valour, the Maratha Empire grew stronger every day. He was known as a freedom fighter as he relieved commoners from the tyrants. He was considered to be anti-Muslim by many but it is not true. His two generals were Siddi and Daulat Khan. Historians suggest that his army consisted of soldiers from different races and religions. He never learned to differentiate between people in terms of caste, religion, or colour.

He focused his energy on eradicating the tyrants of the contemporary era. Most of them were Muslim rulers. He never instigated any religious war or motive to uproot a kingdom. All he did was to understand common people’s pain under the sabbatical Aurangzeb and other rulers. He freed many people and thus was given the name Chhatrapati Shivaji by his admirers.

He ruled the Maratha Empire for 27 years and created an example to follow. He then fell sick and suffered from an unknown fever for three weeks. He then succumbed to his illness and died on 3 rd April 1680 in Raigad Fort.

Short Paragraph on Shivaji Maharaj

Shivaji Bhonsle, also known as Chhatrapati Shivaji, was born on 16 th February 1627. He was the son of Shahji and Jijabai. At an early age, Shivaji got the right education from his mother and father. His indomitable spirit and intelligence were off the chart. He learned all the warfare skills alongside religious teachings. He imbibed the strong features of his character from his mother. He grew up learning everyone is equal, irrespective of caste and religion.

He grew up to be a formidable ruler and united the different kingdoms to form the Maratha Empire. His intelligence and valour made the Mughal Empire and other rulers shiver in fear. His enemy, Adil Shah wanted to kill him. He sent his commander, Afzal Khan to trick him and kill him on the spot. Shivaji was one step ahead. He hid a dagger and killed Afzal Khan and fled. He fought many battles and freed people from the tyranny of many rulers. This is why he got the name ‘Chhatrapati Shivaji’ or the people’s king. He died in 1680 due to illness.

This short and long Shivaji Maharaj essay tells us about the life and good deeds of Shivaji. We learn why he was named the people’s king. He united many kingdoms to form the Maratha Empire and wage war against the cruel rulers of then India. His valour made rulers terrified. He was intelligent enough to overcome any situation.

arrow-right

FAQs on Shivaji Maharaj Essay

1. Why was Shivaji called Chhatrapati?

In this Chhatrapati Shivaji Maharaj essay, you will learn that he used to uproot the tyrant rulers and free the common people. He used to think of everyone as the same. In the declining Adilshahi sultanate of Bijapur, Shivaji carved out an enclave that was the genesis of the Maratha Empire. His crowning as the Chhatrapati of Raigad in 1674 was officially recognized. Shivaji established a civil rule with an efficient administration and well-organized administrative structures.

2. Why do many think that he was Anti-Muslim?

In this Chhatrapati Shivaji Maharaj essay in English, we find that he waged war against Muslim tyrants of the Mughal Empire but he was not anti-Muslim. His two main generals were Siddi and Daulat Khan. The Indian king Shivaji Maharaj is taught to be depicted as Hindu, but he wanted independence from foreigners (swarajya). The foreigners were Muslims, but Muslim majority countries were not foreign countries. Aurangzeb was obsessed with Hinduism. Shivaji Maharaj was not anti-Muslim.

3. Among Shivaji Maharaj's achievements as a true king, what are they?

Analyzing the accomplishments of a true king and leader: As of 1645, he had conquered several forts and surrounding areas of Adil Shaha's sultanate, including Chakan, Kondana, Torana, Purandar, and Sinhgad. Soon Adil Shaha started feeling restless and threatened. As a result, Shivaji's father Shahaji was captured and imprisoned. During the release of Shivaji, Adil Shaha requested Shivaji end his campaign to conquer Adil Shaha's domains.

The year after Shahaji's death, Shivaji Maharaj renewed his conquests, acquiring the Javali valley from Chandrarao More, a Jahagiridar in Bijapur. Afzal Khan, one of Adil Shaha's powerful generals, was dispatched by Adil Shaha to conquer Shivaji.

As per Afzal Khan's plan, Shivaji Maharaj would be invited to a meeting on Pratapgad to assassinate him. Shivaji Maharaj was one step ahead of him, but he was unaware of that fact. Afzal Khan's motives were perceived by Shivaji, and they took hidden actions against him. The plan to kill Shivaji backfired for Afzal Khan when they met. This quick-witted king had no intention of being defeated.

4.  Was Shivaji Maharaj's birthday controversial?

Approximately the Birthdate, Year of Shivaji Maharaj and the controversy around them.

The birth date and birth year of Shivaji Maharaj are subject to some controversy. On Falgun Krishna Tritiya, Shivaji Maharaj was born according to the Hindu calendar. On 19th February 1630, according to the Julian calendar, he was born. According to the Hindu Calendar, Shivaji Maharaj's birth date would have been between March 1 and March 30 before the Julian calendar was converted to the Gregorian calendar.

So now people who live according to the Gregorian calendar celebrate Shiva Jayanti, the birthday of Shivaji Maharaj, which has also been recognized by the Government of India, each year on 19th February. Shivaji was a Hindu warrior according to the Hindu calendar, so we should celebrate his birth anniversary as per the Hindu calendar. The fact that we get the opportunity to honour another birthday of such a distinguished king and warrior is to be commended.

5. Can you please describe the Maratha Navy briefly?

Shivaji Maharaj deemed it necessary to construct a navy when he became master of such a long coastal strip. Shivaji Maharaj realized that the one who controlled the sea was the one who possessed a navy. As a means to secure and enhance revenues derived from maritime trade and customs duties, he concentrated on building the Navy to protect himself from the Siddi's depredations and to increase the number of merchant ships and ports. Navy ships ranged in size from forty to four hundred. Among them were battleships such as the Galbat, Gurab, and Pal. The inaugural keel of a Maratha naval vessel was laid down in 1654 in a creek near Kalyan by Chhatrapati Shivaji, who recognized the importance of a strong navy. During Shivaji's reign, Maharashtra (today's Maharashtra) was dotted with numerous naval bases. Maratha forces were always aware of the Portuguese navy's strength.

Essay on Chhatrapati Shivaji Maharaj in English (150, 200, 300, 400 Words)

essay writing on shivaji maharaj in marathi

Shivaji Maharaj, often referred to as the "Father of the Indian Navy" and the founder of the Maratha Empire stands as an iconic figure in Indian history. Born in 1630, this visionary leader became Chhatrapati Shivaji Maharaj, showcasing exceptional military prowess, administrative acumen, and patriotism. Hailing from the Bhonsle clan, Shivaji carved a significant niche for himself in the tumultuous landscape of medieval India. His birth year, 1674, marked the establishment of the Maratha Kingdom, a pivotal moment in the history of the Indian subcontinent. The life and legacy of Shivaji Maharaj have become subjects of admiration and inspiration, prompting countless essays and articles that delve into the multifaceted dimensions of his rule. Scholars and historians continue to explore and highlight his military strategies, administrative innovations, and his commitment to the welfare of his subjects. This article aims to provide a comprehensive overview of Chhatrapati Shivaji Maharaj's life, exploring his birth, rise to power, and enduring impact on the socio-political fabric of India. By delving into the rich tapestry of his reign, this piece seeks to unravel the layers of Shivaji Maharaj's persona, examining the indelible mark he left on Indian history and the enduring lessons that can be gleaned from the life of this remarkable Indian king.

Why is the Essay on Shivaji Maharaj Important for Your Exams? 

The essay on Shivaji Maharaj holds immense significance for students preparing for exams, particularly in the context of Indian history and culture. Chhatrapati Shivaji Maharaj's life and reign provide a captivating narrative that encompasses not only military conquests but also strategic governance, social reforms, and an unwavering commitment to the welfare of his people. As an iconic figure in Indian history, understanding Shivaji Maharaj's legacy is crucial for a comprehensive grasp of the socio-political dynamics during his time and the lasting impact he had on the Indian subcontinent.

One of the primary reasons why an essay on Shivaji Maharaj is important for exams is the historical context it offers. His birth in 1630 and the establishment of the Maratha Kingdom in 1674 marked a pivotal period in Indian history. The turbulent political landscape, marked by the Mughal Empire and regional conflicts, set the stage for Shivaji Maharaj's rise to power. Understanding this context allows students to grasp the intricacies of medieval Indian history, showcasing the significance of regional powers in shaping the destiny of the subcontinent.

Moreover, Chhatrapati Shivaji Maharaj's military strategies and administrative innovations provide a wealth of material for examination essays. His guerrilla warfare tactics, naval prowess, and the establishment of a strong administrative system are exemplary components of his leadership. Analyzing these aspects not only allows students to showcase their understanding of military and administrative history but also draws parallels with contemporary governance and strategic thinking.

The essay on Shivaji Maharaj also serves as a lens through which students can explore cultural and social dimensions. Shivaji Maharaj's commitment to justice, religious tolerance, and social welfare initiatives underscore the broader impact of his rule beyond the battlefield. Examining his policies towards various communities, his encouragement of art and literature, and his efforts to foster a sense of unity among diverse populations provide students with insights into the social fabric of his time.

In conclusion, the importance of an essay on Shivaji Maharaj for exams lies in its ability to encapsulate a holistic understanding of Indian history, military strategies, governance, and societal dynamics. By delving into the life and legacy of this iconic king, students not only gain historical insights but also develop critical thinking skills by drawing connections between the past and present. This multifaceted exploration makes the essay on Shivaji Maharaj a valuable resource for academic examinations, fostering a nuanced appreciation for the rich tapestry of India's historical narrative.

Long and Short Essay on Shivaji Maharaj

Essay on shivaji maharaj 1 (100 words) , essay on shivaji maharaj 2 (150 words), essay on shivaji maharaj 3 (200 words) , essay on shivaji maharaj 4 (250 words), essay on shivaji maharaj 5 (300 words), essay on shivaji maharaj 6 (500 words) .

Click here to get exam-ready with eSaral

For making your preparation journey smoother of JEE, NEET and Class 8 to 10, grab our app now.

Download Now

eSaral Gurukul

  • JEE Coaching in Kota
  • NEET Coaching in Kota
  • NEET Question Paper
  • NEET 2024 Question Paper
  • NEET 2024 Exam Date
  • JEE Main 2025
  • JEE Main Question Paper
  • JEE Main 2024 Question Paper
  • JEE Main 2023 Question Paper
  • JEE Main 2022 Question Paper
  • JEE Main 2021 Question Paper

JEE Advanced

  • JEE Advanced Question Paper
  • JEE Advanced 2024 Question Paper
  • JEE Advanced 2023 Question Paper

Our Telegram Channel

  • eSaral NEET
  • eSaral Class 9-10

All Study Material

COMMENTS

  1. छत्रपती शिवाजी महाराज वर मराठी निबंध Essay On Shivaji Maharaj In Marathi

    छत्रपती शिवाजी महाराज वर मराठी निबंध Essay on Shivaji Maharaj in Marathi (200 शब्दात) शिवाजी महाराज, ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणूनही ओळखले जाते. जे 17 ...

  2. शिवाजी महाराज निबंध मराठी Shivaji Maharaj Essay in Marathi

    Shivaji Maharaj Essay in Marathi - Shivaji Maharaj Nibandh Marathi शिवाजी महाराज निबंध मराठी मित्रांनो ...

  3. छत्रपती शिवाजी महाराज वर मराठी निबंध Essay On Shivaji Maharaj In Marathi

    छत्रपती शिवाजी महाराज वर १० ओळीत मराठी निबंध 10 Lines On Shivaji Maharaj In Marathi. १) छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी झाला होता. २ ...

  4. छत्रपती शिवाजी महाराज वर मराठी निबंध Essay On Shivaji Maharaj In Marathi

    March 10, 2024 by Marathi Mol. Essay On Shivaji Maharaj In Marathi आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांवर मराठी मध्ये निबंध लिहू. छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेला हा निबंध ...

  5. शिवाजी महाराज

    छ.शिवाजी महाराज हे मराठा जातीतील आणि भोसले कुळातील होते. [२७] त्यांचे आजोबा मालोजी (१५५२-१५९७) अहमदनगर सल्तनतचे एक प्रभावशाली ...

  6. छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी । Chhatrapati Shivaji Maharaj Essay

    छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी । Chhatrapati Shivaji Maharaj Essay in Marathi. शहाजी राजे हे त्याकाळचे सरदार होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण राजमाता ...

  7. छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी Shivaji Maharaj Nibandh Marathi

    Shivaji Maharaj Essay in Marathi छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी Chhatrapati Shivaji Maharaj Nibandh Marathi यांचावर छान निबंध २००, ३००, ४००, ५००, ६०० शब्दात या लेखात उपलब्ध आहे.

  8. छत्रपती शिवाजी महाराज निबंध Essay Chhatrapati Shivaji Maharaj

    छत्रपती शिवाजी महाराज निबंध Essay Chhatrapati Shivaji Maharaj . परिचय : छत्रपती शिवाजी महाराज हे शूर, हुशार आणि दयाळू राज्यकर्ते होते. त्यांचा जन्म 19 ...

  9. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल संपूर्ण माहिती

    छत्रपती शिवाजी महाराज निबंध Essay Chhatrapati Shivaji Maharaj ; छत्रपती शिवाजी महाराज भाषण मराठी Shivaji Maharaj Speech

  10. [निबंध] छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी

    शिवाजी महाराज निबंध मराठी | Shivaji maharaj essay in Marathi (400 शब्द) आपल्या देशातील महान मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दरवर्षी 19 फेब्रुवारी ला साजरी केली जाते.

  11. छत्रपती शिवाजी महाराजांची संपूर्ण माहिती मराठी Chatrapati Shivaji

    Chtrapati Shivaji maharaj history : आपल्या भारत मातेने अनेक वीरांना जन्म दिला आहे ...

  12. छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी

    आपण छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी | Shivaji Maharaj Essay In Marathi, शिवाजी महाराज यांच्या विषयी माहिती - Shivaji Maharaj Information In Marathi

  13. छत्रपती शिवाजी महाराजांवर 10 ओळींचा निबंध 10 Lines essay on Shivaji

    म्हणूनच आज आम्ही तुमच्या समोर "10 Lines on Chhatrapati Shivaji in Marathi" घेऊन आलो आहोत. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला.

  14. शिवाजी महाराजांची राजमुद्रा

    इंग्रजी भाषांतर: Ever-increasing like the crescent-moon, the kingdom of Shivaji, son of Shahaji, will always seek the welfare of the people. [३] मर्यादा मुद्रा [ संपादन ]

  15. 15 Shivaji Maharaj Stories In Marathi

    15 Shivaji Maharaj Stories In Marathi | शिवाजी महाराज कथा | Shivaji Maharaj Goshti. छत्रपती शिवाजी महाराज हे खूपच महान मराठा शासक होते व त्यांनी आपल्या जीवनात खूप लढाया लढल्या आणि विजय हासील ...

  16. शिवाजी महाराज वर १० ओळी 10 Lines On Shivaji Maharaj In Marathi

    10 Lines On Shivaji Maharaj In Marathi छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव सर्वांनाच माहिती आहे. मराठा योद्धा वीर शिवाजी महाराजांची गौरवगाथा भारतीय इतिहासात

  17. छत्रपती शिवाजी महाराज मराठी निबंध Chhatrapati Shivaji Maharaj Essay in

    Chhatrapati Shivaji Maharaj Essay in Marathi: 'झाले बहु, होतील बहु, परंतु यासम हा ।' हे वर्णन ज्यांना चपखल लागू पडते ते म्हणजे छत्रपती श्रीशिवाजी महाराज!म्हणूनच आज तीनशे वर्षे ...

  18. Shivrajyabhishek Din : शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त तुम्हालाही

    Shivrajyabhishek Din 2024 Speech : उद्या ६ जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या ...

  19. शिवाजी महाराज निबंध

    Shivaji Maharaj Essay in Marathi : शिवाजी महाराज म्हणून ओळखले जाणारे शिवाजी भोसले यांना लोकांचा राजा मानले जात असे. त्याचा लोखंड दृढनिश्चय, पराक्रम आणि

  20. Essay On Shivaji Maharaj in English for Students: 100, 200 ...

    100 Words Essay on Shivaji Maharaj. On 19 February 1627, Shivaji Maharaj was born in a Maratha family at Shivnari Fort, Maharashtra. His steadfastness, bravery, and dominance served as examples for all who came after him. His courage knew no limits. He was a combatant who fought against injustice to promote the welfare of the populace.

  21. Essay On Chhatrapati Shivaji Maharaj With [PDF]

    Set 1: Essay On Chhatrapati Shivaji Maharaj. A Shivaji Bhonsle was an Indian warrior King. He was the founder of Maratha kingdom in India. He was the first Hindu to establish a Hindu Empire after centuries of Muslim rule. In 1674, Shivaji became the crowned King and took up the title of Chhatrapati. Shivaji was born in the hill-fort of Shivneri ...

  22. Shivaji Maharaj Essay for Students in English

    Born on 16th February 1627 in Shivneri, Shivaji was the proud son of Shahji. This Shivaji Maharaj essay in English will tell you about the glory and valour of the people's king. Shivaji's mother Jijabai was also very strong in personality. She was virtuous and gave the proper education to her son to make him fearless.

  23. Essay on Shivaji Maharaj: Free Samples for Students in English

    Essay on Shivaji Maharaj in 200 Words. Shivaji Maharaj was a great Maratha warrior. He is regarded as the founder of the Maratha Empire and was formally crowned as the Head of the State in 1670 at Raigad Fort. His leadership, military prowess, and administrative acumen have inspired generations of Indians and continue to be celebrated even ...

  24. Essay on Chhatrapati Shivaji Maharaj in English (150, 200, 300, 400 Words)

    Essay on Shivaji Maharaj 1 (100 words) Born on 19 February 1627 at Shivnari Fort in Maharashtra, Shivaji Maharaj was a courageous and determined leader from a Maratha family. His bravery and strength set examples for others. Focused on fighting injustice and promoting the well-being of people, he became a symbol of valor.

  25. शिवराज्याभिषेकाच्या शुभेच्छा देताना आठवूया छत्रपती शिवाजी महाराजांचे

    Web Title: Shivrajyabhishek din 2024 wishes chhatrapati shivaji maharaj rajyabhishek din wishes quotes messages in marathi photos videos gif in marathi svs First published on: 05-06-2024 at 20:15 IST

  26. Shivrajyabhishek Din Wishes: प्रभो शिवाजी राजा! आज शिवराज्याभिषेक

    Shivrajyabhishek Din Wishes in Marathi: अखंड महाराजांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी ...

  27. Vedat Marathe Veer Daudle Saat

    Manjrekar planned Vedat Marathe Veer Daudle Saat for 7 years. Describing his project, Manjrekar mentioned "This film is my dream project based on the story of seven brave warriors whose sole mission is to realize Shivaji Maharaj's dream of Swaraj by writing one of the most glorious pages in history". In November 2022, the makers revealed that Akshay Kumar will play the role of Shivaji in the ...