टिप्पणी पोस्ट करा, 0 टिप्पण्या, telegram group.
हा ब्लॉग शोधा.
Follow us on google news.
click here to get information
Diwali Nibandh Marathi: दिवाळी हा भारतातील एक प्रमुख हिंदू सण आहे. हा उत्सव देशभरात हिंदूंनी असमान उत्साहाने व आनंदाने साजरा केला जातो. 14 वर्षांच्या वनवासानंतर भगवान राम अयोध्येत परत आल्याच्या आठवणी म्हणून साजरा केला जातो. राम हा एक अतिशय लोकप्रिय हिंदू देवता आहे जो आपल्या सत्यतेबद्दल आणि शुद्धतेसाठी आदरणीय आहे.
विद्यार्थ्यांना शाळेत असताना उत्सव सण याविषयी निबंध लेखन असते. दिवाळी हा मराठी संस्कृती मिळेल सर्वात मोठा आनंदाचा रोषणाईचा उत्सवाचा उत्सव आहे याविषयी आपण निबंध पाहणार आहोत सदर निबंध इयत्ता पहिली दुसरी चौथी ते सहावी सातवी दहावीपर्यंत कुणालाही उपयुक्त आहे. सदर निबंध तुमच्या लेखनाला निश्चितच सहाय्यक ठरेल चला तर मग निबंधाला सुरुवात करुया
Diwali Nibandh Marathi, Nibandh Marathi Madhe, Diwali Essay In Marathi, Essay On Diwali In Marathi, माझा आवडता सण – दिवाळी निबंध, diwali nibandh in marathi, Marathi Essay on Diwali, Marathi Nibandh Diwali.
10 lines on diwali in marathi.
Short Essay On Diwali In Marathi: दिवाळी येण्यापूर्वी त्याच्या स्वागताची तयारी सर्वजण करू लागतात आणि एकमेकांना सांगतात, ” आली, दिवाळी आली!” दिवाळी हा भारतात सर्वत्र साजरा केला जाणार असं नाही. दिवाळीच्या दिवसात असं नाही. हा जणू सणांचा एक महरचा आहे. ! माणसाला मनातील सर्व उदात्त भावना यात व्यक्त होतात. अश्विन महिन्यात द्वादशीला” वसू भारत” सवत्स म्हणजे वासरासह गायीची पूजा केली जाते.
आपल्याला दूध देणाऱ्या गोमातेची ही पूजा असते. धनत्रयोदशीला धनाची पूजा केली जाते: तर लक्ष्मीपूजनाला व्यापारी लोक आपल्या चोपड्या ची पूजा करतात. धन मिळाले तर माणसाने गर्व करू नये, ही शिकवण मिळते. नरकचतुर्थीला नरकासुराचा म्हणजे वाईट वृत्तीचा सहार करायचा असतो; तर बलिप्रतिपदेला दानशूर बळीचा गौरव गुणाची गौरव करायची असते. भाऊबीज ही बहिण भावाच्या निर्मळ प्रेमाचे प्रतीक आहे.
दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे. पण त्या आकाश कंदील आणि रोषणाई करून तिचे स्वागत करायचे. नवे कपडे घालायचे. आप्त, मित्र फराळ करायचा रात्री खूप फटाके उडवायचे.रोजच्या कटकटी विसरून, आनंदाने सर्वांनी एकत्र येऊन मजा करायची, हा संदेश दिवाळी येते.; असण्याचा नाही म्हणून इतर धर्मांनी या सणासाठी आमंत्रित केले जाते
अशा या दिवाळी सणाच्या निमित्ताने खूप मौजमजा करायला मिळते. सगळीकडे आनंदाचे वातावरण असते. म्हणून दिवाळी हा सण मला खूप आवडतो.
सण हा आपल्या संस्कृतीचे प्रतीक आहे. आपल्या देशात अनेक प्रकारचे सण साजरे होतात. दिवाळी, दसरा, होळी, नाताळ, पोंगल, ओणम,रक्षाबंधन, ईद,पोळा यासारखे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. त्यामुळे एक प्रकाराचे उत्साहाचे वातावरण निर्माण होते.
या सर्व सणापैकी दिवाळी हा माझा आवडता सण आहे. अश्विन वदय त्रयोदशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया हे पाच दिवस दिवाळी असते. दिवाळी हा सण सर्वांनाच आनंद देणारा असतो. दिवाळीच्या पाच दिवसात घरापुढे कंदील, पणत्या लावून दिव्यांची आरास करतात. दिव्यांचा सण म्हणजे दीपावली.
दीप आपल्याला प्रकाश देतो. त्याप्रमाणे दिवाळीच्या निमित्ताने ‘अंध:कार दूर करा व आपलं मन चांगल्या भावनेने उजळून टाका’, असा दीपकचा अर्थ आहे. दिवाळीच्या सणातून आपण ऐक्य भावना शिकतो.
दिवाळीच्या दिवसात घरापुढे सुंदर रांगोळ्या काढतात. मुले घरासमोर मातीचे छोटे-छोटे किल्ले बांधतात. फुलबाजा, फटाके, भुईचक्र, अनार असे फटाके लावून मुलं दिवाळीच्या दिवसात आनंदात असतात. फटाक्यांबरोबर मुलांना दिवाळीत नवीन नवीन व छान कपडे मिळतात. घरात लाडू, करंज्या, चकल्या वगैरे फराळाचा घमघमाट सुटलेला असतो. मिठाईचे डबे घरात येतात. लहान मुलांची तर चंगळ होते.
शाळेला सुट्टी असल्यामुळे परीक्षेची चिंता नसते. दिवाळीतील एक दिवस लक्ष्मीपूजन असते. या दिवशी लक्ष्मीची मनोभावे पूजा करून लोक तिला आपल्या घरात स्थिर होण्याची विनंती करतात.
भाऊबीजेला बहीण भावाला ओवाळते. दूर रहात असलेला भाऊ या दिवशी बहिणीकडे येतो. काही ठिकाणी भाऊबीजेला चंद्राला ओवाळण्याची प्रथा आहे. सर्वच जण दिवाळी हा सण एकत्र येऊन आनंदाने साजरा करतात.
Read Also: माझी आई मराठी निबंध
भारतात सर्व सण खूप उत्साहात आणि आनंदात साजरे केले जातात. त्यापैकीच एक म्हणजे दिवाळी! दिवाळीला “दिपावली” असे देखील म्हणतात. हा सण म्हणजे दिव्यांची रोषणाई असते. संपूर्ण परिसर प्रकाशाने उजळवून टाकायचा असतो.
इंग्रजी महिना ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये दिवाळी हा सण असतो. तब्बल चार दिवस या सणाचे महत्त्व असते. शेतीची सर्व कामे संपून धान्य घरी आणले की हा सण साजरा केला जातो. त्याअगोदर घराची आणि परिसराची स्वच्छता केली जाते. आश्विन महिन्याचा शेवट आणि कार्तिक महिन्याची सुरुवात, असे या सणाचे दिवस असतात.
दिवाळी अगोदर छान छान तिखट-गोड पदार्थ बनवले जातात. लाडू, चकल्या, शंकरपाळी, करंज्या, चिवडा असे मुख्य पदार्थ तर बनवले जातातच. याशिवाय बेसन आणि रव्याचे लाडू, अनारसे, बर्फी, चिक्की असे पदार्थही आता बनवले जातात. घरातील सर्वांना नवीन कपडे घेण्याचा हा मुहूर्त असतो.
दिवाळीअगोदर सर्व खाद्य पदार्थांची आणि वस्तूंची खरेदी केली जाते. आकाशकंदील, रांगोळी, फटाके, सुगंधित उटणे, साबण, पणत्या इत्यादी वस्तूंची खरेदी केली जाते. दिवाळीअगोदर एक दिवस आकाश कंदील आणि विजेच्या दिव्यांची माळ घराभोवती सजवली जाते. सर्वजण मिळून खाद्यपदार्थ बनवतात.
लहान मुलांना दिवाळी म्हणजे एक आनंदाचे पर्व असते. पहिल्या दिवशी भल्या पहाटे लवकर उठून उटणे लावून अभ्यंगस्नान केले जाते. नवीन कपडे परिधान करून फटाके वाजवणे आणि नाश्त्याला गोड-तिखट असा फराळ करणे हे सर्वांनाच आवडते.
घरातील मुली आणि स्त्रिया घरापुढे छानशी रांगोळी काढतात. धनत्रयोदशीला संपत्तीची आणि धनाची पूजा करतात. नरक चतुर्थीला सकाळी लवकर उठून अंघोळ केली जाते. सुगंधित उटणे आणि तेलाने स्वच्छ अंघोळ केली जाते. त्यानंतर फराळ केला जातो. त्यानंतरचा दिवस म्हणजे दीपावली पाडवा किंवा बलिप्रतिपदा! या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तींचे आणि वस्तूंचे औक्षण केले जाते.
दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे भाऊबीज! बहीण भावाला ओवाळते. भावाने नंतर काहीतरी भेट वस्तू देण्याची प्रथा आहे. भाऊ आणि बहीण यांच्या नात्यातील गोडवा त्याद्वारे स्पष्ट होतो. असा हा दिवाळीचा सण खूप आनंद, रोषणाई, सुख आणि समाधान घेऊन येत असतो. त्यामुळे माझा दिवाळी हा आवडता सण आहे.
Read Also: डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम मराठी निबंध
भारतात साजरा केल्या जाणाऱ्या सणांमध्ये सर्वात प्रसिद्ध आणि महत्वाचा उत्सव म्हणजे दिवाळी भारतात सर्व धर्मीय लोक यास मोठ्या आनंदात साजरा करतात. असे म्हटले जाते कि “दिवाळी” रोषणाई, उल्हास, उत्सवाचा, प्रेमानी भरलेला, मैत्रीचा आणि मानवतेने भरलेला उत्सव आहे.
आपल्या देशात दिवाळी हिंदू महिना आश्विन च्या शेवटी म्हणजे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये मोठ्या उल्हासात साजरा करतो. आजकाल दिवाळी मोठ्या रंगीत माध्यमांनी साजरी होते. परंतु दिवाळीचे ऐतिहासिक महत्वास लोक आजही जाणतात.
दिवाळीचे दुसरं नांव दीपावली. हा उत्सव म्हणजे दीपोत्सव. दिव्यांचा उत्सव दिव्यांच्या असंख्य ओळी घराअंगणात लावल्या जातात. म्हणून तिचं नाव दीपावली. ह्या सणाची सुरवात वसुबारसेपासून योते आणि भाऊबीज साजरी केल्यानंतर दिवाळीची सांगता होते.
सर्व अबाल वृद्ध, मुले, स्त्रीया ह्यांचा हा लाडका सण. दिवाळी येणार म्हटलं की आवराआवर रंगरंगोटी. नव्या कपड्यांची, दागिन्यांची, घरातील वस्तूची खरेदीची ही पर्वणी. फटाक्यांची आतिषबाजी अन चविष्ट दिवाळी फराळाचा स्वाद हे ह्या सणाच आणखी एक वैशिष्ट्य.
दिवाळीत संपूर्ण घराला सजवले जाते. घरी बनविलेल्या मिठायांचे आदान प्रदान केले जाते. भारतात सर्व लोक घराला उजेडाने भरून टाकतात.
आपला भारत देश हा कृषीप्रधान देश. आपली थोर संस्कृती सुद्ध सर्वंवर प्रेम करायला शिकवणारी. म्हणूनच की काय वसुबारस ह्या दिवशी आपण गाय आणि वासरू ह्यांची पूजा करतो. त्यांना गोडाचा घास खाऊ घालतो. दुध-दुपत्यासाठी होणारा गायीचा उपयोग शेतीच्या कामी बैलाची होणारी मदत ह्या गोष्टी लक्षांत घेऊन त्या गोधनाची केलेलीही कृतज्ञता पूजा.
धनत्रयोदशीला तिन्ही सांजेला केली जाणारी धनाची पूजा, नैवेद्याला ठेवला जाणारा धने-गुळाचा प्रसाद ह्याला ही फार मोठे महत्त्व आहे. ह्याच दिवशी एक दिवा तयार करून तो यमदेवतेसाठी लावला जातो. दक्षिण दिशा ही यमाची दिशा म्हणून त्या दिवशी त्या दिव्याची ज्योत ही दक्षिणेला केली जाते.
नरक चतुर्दशी हा मुख्य दिवाळीचा पहिला दिवस. ह्या दिवशी पहाटे उठून अभ्यंग स्नान करायचे. नवीन वस्त्रे परिधान करायची. देवदर्शन घ्यायचे आणि सर्वांनी एकत्र जमून दिवाळी फराळ करायचा असा हा आनंद साजरा करण्याचा दिवस. ह्या दिवसाची एक पौराणिक कथा जोडली आहे ती अशी की श्रीकृष्णानी अत्याचारी नरकासुराचा वध करून त्याच्या बंदी शाळेतल्या सोळा सहस्त्र कन्यांची मुक्तता केली.
तो हा दिवस, दुष्टाचा नाशा आणि मुक्ताचा आनंद हे या दिवसामागचे आनंद साजरा करण्याचे कारण आहे. अश्विनातले शेवटचे दोन दिवस आणि कार्तिकाचे पहिले दोन दिवस अशी ही चार दिवसांची मुख्य दिवाळी. अश्विन वद्यअमावस्येला संध्याकाळी घरोघरी, दुकानांतून सोन्या-चांदीच्या पेढ्यातून, ऑफिसातून लक्ष्मीपूजन केले जाते.
घरातल सोन नाणं-रोकड ह्यांची पूजा करतात. व्यापारी सर्व हिशेबाच्या वह्यांच पूजन करतो. ह्या धनलक्ष्मीच्या पूजनाबरोबरच त्या दिवशी आरोग्य लक्ष्मी ( केरसुणी ) हिची पण पूजा करतात. लक्ष्मी पूजनानंतर फटाक्यांची अतिषबाजी करून आनंद साजरा केला जातो. पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा साडेतीन मुहुर्तातला एक मुहुर्त. ह्या दिवशी अनेक नवे प्रकल्प चालू केले जातात.
पाडव्याच्या दिवशी पत्नी पतीला ओवाळते. पती पत्नीला पाडव्याची भेट म्हणून वस्तू, दागिना किंवा साडी भेट देतो. कार्तिक शुद्ध द्वितीयेलाच यमद्वितीया किंवा भाऊबीज असे म्हणतात. बहिण भावाच्या उत्कट प्रेमाचा हा दिवस, बहिण भावाला स्नान घालते, गोड भोजन देते, ओवाळते आणि भाऊ बहिणीला ओवाळणी घालतो.
दिवाळीच्या सणातला लहान मुला मुलींचा आनंदाचा भाग म्हणजे आकाशकंदिल तयार करणे, किल्ला करणे, त्यावर चित्रे मांडणे, संध्याकाळी दारापुढे छान छान रांगोळ्या काढणे आणि फटाके वाजविणे इ. दिपावली हा सण सर्वत्र आनंद व उत्साहाने साजरा होतो. परस्परांना भेट वस्तू, शुभेच्छापत्रे इ. देवून आनंद दिला घेतला जातो.
अज्ञानाचा नाश आणि ज्ञानाचा प्रकाश देणारी ही दिवाळी सर्वांनाच प्रिय आहे. जो तो आपापल्या परीने ती साजरी करतो आणि आनंद लुटतो. दिवाळी म्हणजे अत्यंत आनंदी. सुखद दिपावलीच्या अनेक सुखद आठवणींपुढे अनेक दिवस मनांत रेंगाळत राहतात.
असे म्हटले जाते कि शाही आदेशानुसारच श्रीराम व माता सीता यांचे अयोद्धया पासून ते मिथीला पर्यंत संपूर्ण प्रदेश दिव्यांच्या रोषनाई ने जगमगुण गेला होता. अशा प्रकारे त्या अंधाऱ्या रात्रीला दिव्यांच्या प्रकाशाने उजाळून टाकले होते.
श्रीरामांचे स्वागत यासाठीही अधिक महत्वाचे होते कारण श्रीराम १४ वर्षाचा वनवास भोगून आपल्या स्वराज्यात वापस आले होते, त्यावेळी त्यांनी महामायावी दानव रावण याचा वधहि केला यामुळे हे स्वागत फार उत्साहाचे होते.
दिवाळीला आम्रपर्नाचे तोरण व झेंडूच्या फुलांचे तोरण मुख्यप्रवेश द्वारावर लावले जाते. अंगणात मुख्य प्रवेश द्वारा समोर वेगवेळ्या रंगांच्या रांगोळ्या काढल्या जातात. यामूळे मला दिवाळी हा सण खूप आवडतो.
Leave a comment जवाब रद्द करें.
Get every types of Essays for students
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण diwali nibandh in marathi | दिवाळी मराठी निबंध बघणार आहोत. प्रत्येकजण सण व उत्सवाच्या माध्यमातुन एकत्र येऊन आपला आनंद प्रकट करत असतो. या निबंधात आपण दिवाळीचा इतीहास, त्यांचे महत्व काय आहे व दिवाळी या सणाविषयी संपुर्ण माहीती दोन वेगवेगळ्या निबंधात बघणार आहोत. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.
diwali-nibandh-in-marathi |
निबंध 1 (350 शब्दात)
भारत हा सण व उत्सवांचा देश आहे आणि प्रत्येक समाज सण व उत्सवांच्या निमित्ताने एकत्र येऊन आपला आनंद व्यक्त करतो असतो. दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण आहे. दिवाळी हा शब्द संस्कृत भाषेतुन घेतला गेला आहे. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात दीपावली साजरी केली जाते दसऱ्यापासुनच दिवाळीची तयारी घराघरात सुरू होऊन जाते. दिवाळी संपूर्ण भारतभर मोठ्या थाटामाटात आणि उत्साहाने साजरी केली जाते. पण दिवाळी केवळ भारतातच साजरी केली जात नाही तर भारताबाहेर राहणारे भारतीय आणि इतर लोकही ती उत्साहाने साजरी करतात.
लहान मुलांनांही हा सण खुप आवडतो. दिवाळी हा भारतातील सर्वात महत्वपुर्ण व प्रसिद्ध सण आहे. हा सण अमावस्येचा दिवशी साजरा केला जातो. अमावस्येच्या काळ्या रात्री लोक मातीच्या दिव्यांनी व आजकाल इलेक्ट्रीक दिव्यांनी रोशनाई करून दीवाळी साजरी करतात. रावणाला युध्दात हरवल्यावर जेव्हा भगवान राम १४ वर्षानी आपल्या राज्यात परतले तेव्हा अयोध्देतील लोंकानी भगवान राम यांच्या स्वागतासाठी घरे व रस्ते दिवे लावुन प्रकाशित केले होते. याच दिवशी भगवान श्रीकृष्णांनी नरकासुर नावाच्या भयानक राक्षसाचा वध केला होता व हा दिवस भगवान महाविर स्वामी यांचा निर्वान दिवसही आहे . या सर्व कारणांमुळे लोक दिवाळी साजरी करतात.
हा एक पवित्र हिंदु सण आहे जो वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतिक आहे . देवी देवता व राक्षसांव्दारे समुद्र मंथन करताना माता लक्ष्मी यांचा जन्म झाला होता असे मानले जाते. हा सण पाच दिवस साजरा केला जातो. नरक चतुदशीला सुर्यदयापुर्वी अंघोळ करणे अतिशय शुभ मानले जाते . अमावस्येला देवीची पुजा केली जाते व बत्तास्याचा प्रसाद देवीला अर्पण केला जातो. लहान मुले फटाके फोडण्यात व छान छान मिठाईचे पदार्थ खाऊन त्यांचा आनंद व्यक्त करतात. या दिवसात लोक एकमेंकांना भेटुन शुभेच्छा व फराळ देऊन त्यांचे स्वागत करीत असतात.
दिवाळीला लोक आपल्या नातेवाईकांना भेटुन नविन वर्ष सुखाचे जावो ही सदीच्छा व्यक्त करतात व आपआपसातील असलेले मतभेद विसरून लोक हा सण साजरा करतात. दिवाळीच्या दिवसात बाजारपेठेत लोक मिठाई व नविन कपडे घेण्यासाठी गर्दी करतात. आणि आपल्या घराला दिव्यांनी सजवतात. लोक सुयास्तानंतर सूर्यास्तानंतर माता लक्ष्मी आणि गणपतीची पूजा करतात आणि आरोग्य, धन,संपत्ती व सोनेरी भविष्यासाठी देवीला प्राथना करतात.
दिवाळी हा सण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आनंदाची लहर आणत असतो. हाच आनंद आपल्याला नविन जिवन जगण्यासाठी प्रोत्साहन देत असतो. फटाके फोडताना अतिशय सावधगिरी बाळगिली पाहीजे . आपल्या वागण्यामुळे कुणालाही दु:ख पोहचता कामा नये तरच दिवाळी सण साजरा करणे अर्थपुर्ण ठरू शकेल .
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता व खालील दुसरा निबंध वाचायला विसरू नका . धन्यवाद
निबंध 2 (430 शब्दात)
दिव्यांच्या साक्षीने दीपावलीचे आगमन होते. प्रकाशाने घरे दारे-मने उजळतात. असा 'दिवाळी' हा सण मला खूप खूप आवडतो. आश्विन अमावस्येला 'लक्ष्मीपूजन' केले जाते. आश्विन कृ.१३ तिथीला धनत्रयोदशी, आश्विन कृ.१४ या तिथीला नरक चतुर्दशी नंतर अमावस्येला लक्ष्मीपूजन, कार्तिक शु.१ तिथीला बलिप्रतिपदा (पाडवा) आणि कार्तिक शु.२ या तिथीला भाऊबीज. अशा पाच दिवसांचा हा सण असतो.
हिंदू संस्कृतीत सणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. दसऱ्याला रावण वध करून विजयी झाल्यानंतर प्रभू श्रीराम अयोध्येस परतले. त्यांनतर त्यांना राज्याभिषेक करण्यात आला. तो दिवस म्हणजे दिवाळीचा सण होय. घरांची स्वच्छता व सजावट, रांगोळ्यांनी सुशोभित अंगणे, झेंडू शेवंतीसारख्या फुलांची मंगलतोरणे, घरांची रंगरंगोटी, आकाशकंदील, दीपमाला या साऱ्यांमुळे वातावरणात एक वेगळीच प्रसन्नता येते.
आनंदोत्सवाचा प्रत्यय प्रत्येक कणांकणातून येतो. फटाके , मिठाया यातच मुले सुटीचा व सणाचा आनंद लुटतात. नवीन कपडे, नवीन भेटी त्यांना मिळतात. अभ्यंगस्नान, उटणे, अत्तरे यांनी वातावरण दरवळते. मंदिरे आरत्या व घंटांनी निनादतात. लवकर उठून पूजा व देवदर्शन यात सर्वांना ओढ वाटते. समृध्दी व पैसा देणाऱ्या लक्ष्मीदेवतेचे मनोभावे पूजन केले जाते.
या सर्वांच्या आनंदात गरीब बिचारे दुरून मूकपणे नेत्रसुख घेतात . गरीब मुले फटाके मिळाली नाहीत दुरून तर फटाक्यांची रोषणाई, आतीषबाजी बघून आनंद मानतात ही गोष्ट अनेकांच्या हृदयाला घरे पाडते. काही सहृदयी मात्र आपल्या आनंदात या गरिबांना, त्यांच्या छकुल्यांना समाविष्ट करून घेतात. त्यांना मिठाई, नवे कपडे, फटाके देतात . दिव्यापेक्षाही उज्वलता माणुसकीत आहे. खरे हृदय तेच जे दुसऱ्याचे दुःख समजते. भारतात अजूनही अठराविश्व दारिद्र्यात अनेक जीव खितपत आहेत.
त्यांची 'दिवाळी' कधीही उजाडत नाही तर ‘दिवाळे' अन् .... दारिद्र्याची पकड त्यांना नीट जगू देत नाही. असे विचार आले की माझे मन दिवाळीच्या आतषबाजीने जे फुललेले असते, क्षणात विझते. माझ्यातला 'मी' जागा होतो. स्वतःचे फटाकडे, मिठाई, कपडे घेऊन मी कामवाल्या मावशीचे घर गाठतो . त्यांच्या मुलाला मिठाई देतो. त्यांच्या डोळ्यात चमकणारे स्मित पाहिले की माझी खरी दिवाळी साजरी झाली, हे मनाला पटते. हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. असे मला वाटते. परिस्थितीने लाचार असणाऱ्यांना कधी विनाकारण दुःख नशिबी येतात , तिथे मदत करावीच .
नातेवाईकांना नववर्षाची भेट म्हणून शुभेच्छा कार्ड व इतर भेटी पाठविण्याबरोबरच हे छोटे पण 'खूप मोठे' सत्कृत्य केल्यास दिवाळीचा आनंद नक्कीच द्विगुणित होईल. वर्षातल्या येणाऱ्या सर्व सणांमध्ये दिवाळीचे महत्त्व आगळे नि वेगळे आहे. तो सण प्रत्येक घरात साजरा झाला पाहिजे. दिव्यांच्या साक्षीने मने प्रकाशायला हवीत जळायला नको, चटके सोसायला नकोत.
फटाके उडवितांना आवश्यक खबरदारी घेऊन अपघातापासून बचाव करायला हवा , ही पण महत्त्वाची बाब आहे. ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी आतीषबाजीत कानठळ्या बसणारे फटाके उडवू नयेत. तसेच फटाके बनविणाऱ्या कंपन्यांत ७० ते ८०% बालश्रमिक काम करतात. श्वसन व फुप्फुसासंबंधीच्या विकारांना बळी पडतात हे सत्य न विसरता फटाक्यांचा अतिरेक टाळावा. वाचलेले पैसे गरीबाला देऊन दिवाळीचा आनंद द्यावा , हे मला वाटते.
सण कोणताही असो तो आनंद , एकी, समभाव, बंधुत्व व सुख देणारा असावा. जीवन क्षणभंगुर आहे. 'जगा अन् जगू दया' या तत्त्वावर चालायचे आहे.
माझा आवडता सण दिवाळी मराठी निबंध | maza avadta san diwali essay in marathi.
माझा आवडता सण दिवाळी मराठी निबंध , Maza Avadta San Essay In Marathi |
आपल्या देशात खूप सण साजरे केले जातात आणि त्या मधे माझा सर्वात आवडता सण आहे दिवाळी. नमस्कार मित्रांनो आज आपण माझा आवडता सण दिवाळी मराठी निबंध , maza avadta san essay in marathi बघणार आहोत. , माझ्या आवडता सण दिवाळी, हे निबंध सुधा जरूर वाचवे :-, टीप : वरील निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक असु शकते essay on diwali in marathi maza avadta san my favorite festival diwali in marathi.
Diwali essay in marathi | दिवाळी निबंध मराठी .
💥 ऐतिहासिक महत्व: 💥, 💥 सांस्कृतिक महोत्सव: 💥, 💥 धार्मिक निरीक्षणे: 💥, 💥 परंपरा आणि चालीरीती: 💥, 💥 आधुनिक आव्हाने आणि बदल: 💥, 💥 दिवाळी आणि कौटुंबिक नातं: 💥, 💥 जगभरात दिवाळी: 💥, 💥 दिवाळीचा आर्थिक परिणाम: 💥, 💥 दिवाळी आणि कलात्मक अभिव्यक्ती: 💥, 💥 प्रकाशाचे प्रतीक: 💥, 💥 दिवाळी आणि देण्याची भावना: 💥, 💥 नव्या सुरुवातीचा सण: 💥, 💥 दिवाळी आणि सर्व धर्म एकोपा: 💥, 💥 निष्कर्ष: 💥.
You may like these posts, post a comment.
Popular posts.
Menu footer widget.
Dipawali Diwali Nibandh | Dipawali essay in marathi. मराठी निबंध लेखन दिवाळी दीपावली निबंध लेखनभारतीय सण दिवाळी निबंध मराठी विषयी संपूर्ण माहिती आपण इयत्ता पहिली ते बारावी या वर्गासाठी माहिती पाहणार आहोत . स्पर्धा परीक्षा करणारे विध्यार्थी सुद्धा निबंध वाचू शकतात अश्या पद्दतीने निबंध लिहून तुम्ही आगामी परीक्षेत घवघवीत यशस्वी होऊ शकतात.
दीपावली मराठी निबंध |Diwali Marathi Essay दिवाळी हा सण अतिशय महत्त्वाचा हिंदू समुदाय यांमधील हा सण भारतात सर्व ठिकाणी साजरा करतात. आकाश कंदील लावले जातात, रांगोळी सजावट, घर सजावट,खरेदी भेटवस्तु अशी विविध पद्धतीने दिवाळी साजरी करतात हिंदू कालनिर्णय नुसार आश्विन कार्तिक महिन्यांमध्ये हा सण येतो आणि साधारण इंग्रजी वर्षांमध्ये ऑक्टोंबर नोव्हेंबर या वेळेला राष्ट्रीय कृत सुट्टी जाहीर असते दिवाळी Essay on Diwali in Marathi या सणाचा उगम कोणत्या वर्षी झाला याबाबत काही कल्पना नाही पण काही वर्ष जुना हा सण आहे याचा फार पूर्वीच्याकाळी झाला असावा असं बोललं जातं की अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल होते त्यावेळेस दिवाळी साजरी केली जाते.
दीपावली मराठी निबंध |Diwali Marathi Essay भारतीय दिवाळी सण विषयक संपूर्ण माहिती घेणार आहोत.दिवाळी मराठी निबंध Diwali Nibandh Marathi
1)दिवाळी
-दिवाळी विषयी महत्व
दिवाळीतील पाच दिवसांचे महत्व
2)दिवाळी हा सण देशविदेश मध्ये कश्या प्रकारे साजरा करतात.
3)किल्ले बांधकाम दिवाळी -दिवाळी मध्ये लहान मुले किल्ले कां बनवतात.
4)फटाक्यांवर दिवाळीत बंदी आणणे -
5)दिवाळी तसेच विविध सण उत्सवनिमित्त फटाके दुष्परिणाम
6)फटाके वाजविणे विषयी स्तुत्य धोरण
7)दिवाळी सणाला फटाक्यांचे दुष्परिणाम रोखण्यासाठी उपाय
8)कोरोना महामारी मध्ये दिवाळी कशा प्रकारे साजरी करायची.
9)इयत्ता नववी दहावी अकरावी बारावी या वर्गासाठी विशेष आपला भारतीय दिवाळी मराठी निबंध 200-250 शब्दात.
10)इयत्ता सहावी सातवी आठवी या वर्गासाठी भारतीय दिवाळी निबंध मराठी 200 शब्दात.
11)चौथी पाचवी या वर्गासाठी आपला भारतीय सण दिवाळी निबंध मराठी 150 - 200 शब्दात
12)इयत्ता पहिली दुसरी तिसरी या इयत्तासाठी आपला भारतीय सण दिवाळी विषयक मराठी निबंध 100 ते 150 शब्दात .
13)भारतीय सण दिवाळी मराठी निबंध पाच ओळी.
14)भारतीय सण दिवाळी मराठी निबंध दहा ओळी
15)इयत्ता पहिली वर्गासाठी आपला भारतीय सण दिवाळी मराठी निबंध दहा ओळी
16)इयत्ता तिसरी या वर्गासाठी दिवाळी मराठी निबंध दहा ओळी
17)इयत्ता चौथी वर्गासाठी भारतीय दिवाळी सण निबंध दहा ओळी
18)भारतीय दिवाळी सण इयत्ता पाचवी वर्ग दहा ओळी
19)इयत्ता सहावी या वर्गासाठी भारतीय सण दिवाळी निबंध दहा ओळी
20)भारतीय सण दिवाळी इयत्ता सातवी वर्गासाठी मराठी निबंध दिवाळी दहा ओळी
21)भारतीय सण दिवाळी मराठी निबंध पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी या वर्गासाठी 5 ते 8 ओळी .
22)इयत्ता 6,7,8 च्या विध्यार्थी वर्गासाठी उपयुक्त दिवाळी निबंध ओळी -
23)इयत्ता नववी, दहावी, अकरावी बारावी या वर्गासाठी भारतीय सण दिवाळी मराठी निबंध साठी पाच ओळी
Essay on Diwali in Marathi वरील माहिती आपण भारतीय दिवाळी सण या निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तुम्ही येणाऱ्या आगामी परीक्षेत माहिती लिहू शकतात किंवा या पद्धतीने तुम्ही माहितीचा वापर करून घेऊ शकतात विविध स्पर्धा परीक्षेत विविध निबंध लिहायला सांगितले जातात शाळा महाविद्यालय स्थरावर वर पण निबंध लेखन आवश्यक असते आपण त्याची विविध माहिती पाहणार आहोत दिवाळी मराठी निबंध Diwali Nibandh Marathi
Diwali Diwa |
दिवाळी साजरी करण्यासाठी काही लोकांची अशी श्रद्धा आहे की 14 वर्षाचा वनवास संपून आल्यानंतर प्रभू रामचंद्र सीतेसह अयोध्येला परत आले याच याच दिवशी प्रजेने आपल्या राजाचे स्वागत दिव्यांची आरास बनवून तयार करून प्रत्येक घरापुढे उजेड निर्माण करून अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल तयार झाली. या दिवसापासून दिवाळी साजरी करण्याची प्रथा तयार झाली असावी दिवा मांगल्याचे प्रतीक असल्याने दिवाळीमध्ये दिव्याला अतिशय मोठ्या प्रमाणावर ती महत्त्व आहे. दिव्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर होऊन आपण पंधरा वरती विजय मिळवावा हिंदू कालनिर्णय नुसार कार्तिक महिन्यामध्ये येणारा हा सण पावसाळ्यामध्ये समृद्धीचा आनंदाचा उत्सवाचा एकमेकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवाळी हा सोहळा तयार होतो. दिवाळी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये सडा-रांगोळी सडा टाकून रांगोळी काढली जाते घरामध्ये विविध आकाशदिवे तयार केले जातात घरांची साफसफाई केली जाते घरांची विविध फुलं तसेच लायटिंग ने सजावट केली जाते लहान मुलं हे विविध मातीचे किल्ले तयार करण्यात गुंतलेले असतात . माझा आवडता सण दिवाळी मराठी निबंध. | Marathi Essay on Diwali. विविध कामांमध्ये गुंतलेले आपल्याला पाहायला मिळतात. लहान मुलांचा किल्ला बांधकाम हे एक आकर्षण ठरत असतं हिंदवी स्वराज्याचे स्वप्न लहान मुलांमध्येही रुजावं या दृष्टीने किल्ला बांधकाम करून कडेने धान्य पेरतात.दिवाळी मराठी निबंध Diwali Nibandh Marathi
दिवाळी मध्ये कोणकोणते दिवस कश्या प्रकारे साजरे केले जातात दिवाळी | माझा आवडता सण दिवाळी
वसुबारस
दिवाळी | माझा आवडता सण दिवाळी सणासाठी वसुबारस हा सण साजरा केला जातो यामध्ये वसू आणि द्रव्य मजेत धनाने भरलेला द्रव्य म्हणजेच बारस म्हणजे द्वादशी वसुबारस हा दिवस साजरा केला जातो आपली भारतीय संस्कृती कृषी कृषि दर्शन घडवणारे असल्यामुळे वसुबारस या दिवसाला दिवाळीमध्ये अतिशय महत्त्वाचं मानाचं स्थान आहे या दिवसाला गाईची पूजा केली जाते गाईचं वासरू आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन हवं या दृष्टिकोनातून वसुबारस साजरा करत दिवाळी | माझा आवडता सण दिवाळी असावा असं वाटतंय. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पशुधनाला कृषी संस्कृतीमध्ये अतिशय मानाचे स्थान आहे आणि कृषिसंस्कृती म्हणले की पशुधन आलं आणि पशुधन आलो तर पशुधनाची सेवा करणं पूजा करून शास्त्रीय दृष्टिकोनातून खूप मोठा महत्त्वाचा भाग आहे. शेतकरी वर्ग आपल्या घरी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवून गाईची यथासांग मनोभावे पूजा केली जाते त्यामध्ये गाईला हळद कुंकू लावलं जातं फुले वाहिली जातात अक्षदा वाहिली जातात गायीच्या पायावरती पाणी घातलं जातं गळ्यामध्ये फुलांची माळ घातली जाते निरांजन भरपूर प्रमाणात वळत जातं केळीच्या पानावर ती नैवद्य भरून असणाऱ्या पशुधनाला पोळीचा नैवेद्य दाखवला जातो.
या दिवशी मंगलस्नान करून म्हणजेच अभंग स्नान करून घरामध्ये लावतात घरामध्ये भरभरून संपत्ती मिळावी हे देवाला प्रार्थना करतात.
- श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला सूर्य उगवण्यापूर्वी मंगलस्नान घालून आणि हाच सण नरकचतुर्दशी म्हणून साजरा केला जातो अशी एक दंतकथा आढळून येते.
- तुम्ही लक्ष्मी पूजन या दिवशी ही लक्ष्मी मानून तिचे मनोभावे पूजा केली जाते मंगल प्रकाश सर्व ठिकाणे येवो प्रत्येकाच्या जीवनामध्ये हीच लक्ष्मीपूजनाची प्रार्थना असते
साडेतीन शुभमुहूर्तांपैकी हा अर्धा मुहूर्त मानला जातो दिवाळी पाडव्याला पत्नीने पतीला ओवाळण्याची पद्धत आहे
- कार्तिक सिद्ध द्वितीया म्हणजेच भाऊबीज भाऊबीज म्हणजे बहिणींने भावाला ओवाळणे ची प्रथा होय.
भारताच्या निरनिराळ्या भागांमधून दिवाळी विविध पद्धतीने साजरी केली जाते सुख-समृद्धी शिव विष्णू यम यांच्या सहकार्याने आपल्याला संपत्ती मिळावी पूर्वीच्या काळी दिवाळी निमित्त भेट वस्तु ही मिठाई स्वरूपात आढळून येत असे पण आता नवीन अनोख्या पद्धतीने दिवाळीला भेटवस्तु देत असतात यांत काही कर्मचारी वर्गासाठी भेट वस्तू असतात तर काही अनाथ आश्रम वृद्धाश्रम यांच्यासाठी भेटवस्तु असतात अश्या भेटवस्तु देऊन आदर प्रेम आपुलकी वाढविण्यासाठी दिवाळी हा सण एक नावीन्य घेऊन येतांना आपल्याला पहायला मिळतो.
भेटवस्तु
दिवाळी मधील एक आधाराची भूमिका म्हणजे भेटवस्तू आकर्षक भेटवस्तूंची देवाण-घेवाण म्हणजे दिवाळी मधील एक आकर्षक विधी आहे. आपली हिंदू संस्कृती एकमेकांबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी शिकवत एकमेकांबद्दल आपुलकी शिकवते त्यामुळे आपल्या शेजारी पाजारी यांना दिवाळीमध्ये मिठाई वाटप आकर्षक भेटवस्तू वाटप करून एकमेकांप्रती असणारे आपुलकीची भावना आपल्याला समजून येते आणि हीच आपुलकीची भावना आपल्या दिवाळीच्या सणानिमित्त आकर्षक ठरते आणि आनंदाचे उत्साहाचे वातावरण ठरते.
1)नेपाळ प्राण्यांविषयी आपुलकी कृतज्ञता -.
नेपाळ या ठिकाणी विविध प्राण्यांविषयी आपुलकी दाखवुन दिवाळी साजरी केली जाते.
-नेपाळ मध्ये दिवाळीचा सण तिहार सण म्हणून साजरा केला जातो. कावळ्यांना गोड धोड खाऊ घरांच्या छपरावरती ठेवून खाऊ घालतात.
काग तिहार म्हणजे कावळ्याचा दिवस साजरा करतात.
- म्हणजे कुत्र्याची पुजा
नेपाळ मध्ये दिवाळी चा दुसरा दिवस कुकूर तिहार कुत्र्याची पुजा करून कुकूर तिहार दिवस म्हणून साजरा केला जातो.प्रत्येक माणसाला कुत्रा बरोबर असलेलं नातं याविषयी अतूटता गट्ट व्हावी यानुसार हा दिवस साजरा केला जातो.झेंडूची गळ्यात माळ घालून कुंकवाचा टिळा लावून गोड जेवण दिले जाते.
-नेपाळ मध्ये गोपूजन -दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी गाईची पुजा केली जाते.
-लक्ष्मी पुजन करून दिवाळीचा शेवट नेपाळ मध्ये केला जातो.
बाली बेटामध्ये दिवाळी ही दिव्यांची आरास, विविध वेशभूषा स्पर्धा,धमाका नृत्य करून साजरी केली जाते.
सिंगापूर या ठिकाणी दिवाळी सणाला राष्ट्रीय पक्षी असलेला मोर यांची प्रतिकात्मता दिव्यांची आरास बनवून तयार करतात हे एक प्रकारचे विपुलता आढळून येते.
बहीण भाऊं आवडता सण रक्षाबंधन मराठी निबंध
मलेशिया या ठिकाणी दिवाळी हा सण बहुल्यांचा खेळ दाखवून साजरा करतात.रामायण महाभारत यांच दर्शन बाहुल्यांच्या खेळातून दाखवलं जातं आहे.रंग मुकुट,भूषण,विविध वस्त्रे घालून बाहुल्या खेळ दाखवतात.या बाहुल्या मशीच्या कातडी पासून बनवतात.
थायलंड मध्ये केळीच्या पानापासून दिवे बनवून नदीत दिवे सोडले जातात. दिवाळीला " लुई क्रॅथोंग "असेही म्हंटले जाते.
फिजी या बेटात भारतीय स्थायिक आहेत.निळीचा उद्योग खूप मोठ्या प्रमाणात चालू असतो या उद्योगासाठी हे भारतीय रोजगारासाठी स्थायिक झालेले आहेत.पंतप्रधान यांच्या हस्ते दिवा पेटवून दिव्यांची रोषराई ही स्पर्धा घेतली जाते.
अमेरिकेत भारतीय बरोबर अनेक स्थायिक यांनी सुद्धा दिवाळी साजरी करताना पहायला मिळत आहे. फ़राळ बनविणारे उद्योग चालू केले आहेत.जॉर्ज बुश यांच्या अध्यक्षतेखाली २००३ पासून त्यांनी व्हाइट हाऊसमध्ये दिवाळी साजरी होते.
युनिव्हर्सिटी ऑफ ससेक्स या विद्यापीठ यांच्या वतीने दिवाळी या सणाला विशेष सांस्कृतिक कलादर्शन ठेवले जाते. वेषभुषा भारतीय ठेवली जाते. मेहंदी काढणे, साडी नेसणे,हे सर्व हौशी नौशी म्हणून केले जाते.
बी हाइव्ह या पार्लमेंट इमारती च्या समोर रांगोळी काढून पंतप्रधान यांच्या हस्ते दिवा पेटवून कार्यक्रम सुरुवात केली जाते.सांस्कृतिक कार्यक्रम, भारतीय नृत्ये, कर्नाटकी संगीत, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत, रांगोळीच्या कार्यशाळा असे विविध कार्यक्रम दोन आठवडा भर ठेवले जातात.
हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवराय यांचे हिंदवी स्वराज्य स्वप्न पूर्ण व्हावे तसेंच लहान मुलांना किल्याविषयी गोडी निर्माण व्हावी म्हणून किल्ले दिवाळी मध्ये लहान मुले बांधतात.
करोडो शेकडो वर्षापासून दिवाळी साजरी केली जाते वडीला फटाके वाजवणे आतषबाजी होत असते आणि लहान मुलांचा अतिशय आवडता फटाका असून मुलांना फटाके वाजवणे अतिशय आवडीचा विषय आहे फटाक्यांमुळे किंवा नुकसानच होते फायदा काहीच नाहीये पर्यावरणाला धोका निर्माण होतो होतो पण आपल्या शरीराला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर ती इजा पोचत असतात त्याचा विचार केला पाहिजे आपण फटाके वाजवले नाहीतर दिवाळी साजरी होणार नाहीये असं काहींचं नाही.तुम्ही दिवाळी अनेक ठिकाणी अनेक प्रकारे साजरी करू शकता विविध ठिकाणी जावून अनाथ आश्रम मध्ये जात जाऊ शकतात विविध वृद्धाश्रमांमध्ये जाऊ शकतात त्यातील विविध लोकांबरोबर तुम्ही दिवाळी चांगल्या प्रकारे साजरी करू शकतात आपल्या पर्यावरणाला आरोग्यमय दृष्टीने जीवन जगणं म्हणजे तुम्ही दिवाळी साजरी करू शकता फटाके वाजवले यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होते पण शरीरातील विविध अवयवांना सुद्धा धोका निर्माण होतो ध्वनिप्रदूषण व वायुप्रदूषण होतोय हृदयरोग व कर्णरोग प्रत्येकाला तयार होतात असे विविध दुष्परिणामांना सामोरे जातात हे दुष्परिणाम आपण फटाके न वाजवता टाळू शकतो.
1)फटाक्यांमुळे होणारे अपघात-.
फटाक्यांमुळे आगी लागतात आणि बाजारपेठ उद्वस्त होतात.
घरांमध्ये बान जाऊन दुसऱ्यांच्या घरामध्ये आग लागण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर होतात.
फटाक्यांमुळे तर आग लागतच असते. पण भौतिक दृष्ट्या विविध इमारतींना तडे जातात विजेचे बल्ब फुटतात.
फटाके वाजवल्यामुळे आरोग्य दृष्टी आरोग्य धोक्यात येते 60 टक्के आरोग्य धोक्यात आलेले हे बारा वर्षाखालील लहान मुलांचे आहे.
कानठळ्या बसल्या जाणारे फटाके उडवून कायमचा बहिरेपणा येण्याची शक्यता दाट शक्यता असते जर आपण फटाके वाजवले नाही तर आपण बहिरेपणा पासून मुक्तता मिळवू शकतो.
फटाक्यांच्या ध्वनिप्रदूषणामुळे बहिरेपणा श्वसनाचे विकार उच्च रक्तदाब हृदयरोग डोकेदुखी फुफ्फुसांचे रोग असे विविध रोगांना आमंत्रण आपण देत राहतो.
गर्भवती स्त्रियांच्या आरोग्यावर ती फटाक्यांचे दुष्परिणाम वेगवेगळ्या प्रकारे होत राहतात.
फटाके उडवताना त्यामधून विविध असा धूर बाहेर पडतो हा दूर विविध विषारी रसायनांनी बनलेला असतो आणि हे रसायन आपल्याला हवेत पसरल्यामुळे विविध शासन मार्गाचे दम्याचे रोग तयार होतात परिणामी आरोग्यास खूप अपायकारक हे आजार आहेत.
फटाक्यामुळे पैसे बसवायला जातात असं नाही तर फटाके उडवले यामुळे दूर मोठ्या प्रमाणावर ती होतो तसेच फटाक्यांचे विविध कचरा तयार होतो.
आपल्या भारताची आर्थिक दृष्ट्या जर विचार केला तर 20 प्रतिष्ठित व्यक्तींना खाण्यासाठी अन्न उपलब्ध नाहीये वीस टक्के कुपोषित बालक जन्माला येतात आपल्या भारत देशामध्ये विजेची टंचाई दोन वेळच्या जेवणाची टंचाई होत असते शेतीला पाणी नाहीये. 20 ते 30 टक्के जनता निरक्षर आहे औषधोपचाराची प्रत्येक जनतेकडे सोय आहेच असे नाहीये त्यामुळे अशा विविध गोष्टींकडे प्रत्येकाने लक्ष देणे गरजेचे आहे.
करोडो रुपयांचे फटाके आपण खरेदी करून हवेमध्ये धूर सोडतो पाच रुपयाचा फटाका आपण खरेदी करतो आणि आपण आपल्याच आरोग्याला धोका निर्माण करतो हे उचित आहे का आपल्यासाठी आपल्यासाठी काय गरजेचे आहे आणि काही नाही आपण स्वतः ठरवलं पाहिजे
होय -अपना विचार केला तर फटके विकणार्यांची दिवाळी असते घेणाऱ्यांची दिवाळी कधी नसते आपण फटाके विकत पाच रुपयांचे फटाके वीस रुपयाला विकत घेतोय.
आज आपण लहान मुलांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ती विकृती निर्माण होताना पाहायला मिळते-
आपण एखादा जर दारामध्ये दिवाळीचे टाइमिंग ला एखादा कोण दिवाळी नेण्यासाठी आला तर त्यांना दिवाळी न देता आहे आपले लहान मुलं फटाकडे त्यांच्याजवळ येऊन फोडताना आपल्याला पाहायला मिळतात.
लहान मुलांचे मानसिक स्वास्थ्य बिघडलेले आपल्याला पाहायला मिळते आणि हे स्वस्त लहान वयातच बिघडलं तर येणारी पिढी कशी असेल हा विचार करा आपलं आरोग्य कसा असेल हे पण विचार करा.
गणपती बाप्पा मोरया मराठी
परदेशातील राष्ट्रांमध्ये कशाप्रकारे असतं आपण पाहू यात
अमेरिका
अमेरिकेसारख्या देशामध्ये फटाके वाजवायला बंदी आहे मोठ्या प्रमाणावर ती फटाके आवाज करतात हे जर वाचवायचे असेल तर त्यांना आधी परवानगी काढावी लागते आणि शहरांपासून दूर जाऊन हे फटाके वाजवावे लागतात.सर्वात महत्त्वाचं म्हणजे फटाके उडवण्यासाठी परवानगी जर दिली तर दक्षता म्हणून तिथे अग्निशामक दल उपलब्ध आहे का हे आधी पाहिलं जातं आणि मगच परवानगी दिली जाते आपल्या भारत देशामध्ये असं काही धोरण आहे का.
न्यूझीलंड, इटली, फ्रान्स, बेल्जियम या प्रगत देशांमध्ये जर आपण पाहिलं तर मोठ्या व्यक्तींनाच फटाके विकत घेण्यास परवानगी आहे लहान मुलांना फटाके विकत घेण्यास परवानगी नाही आपल्याकडे सुद्धा अशा प्रकारचा दंडात्मक कारवाई सुरू करावी आणि लहान मुलांना फटाके विक्री आणि घेणे बंदी करावी.
फटाक्यांचे विविध दुष्परिणाम आपण पाहिलेल्या आहेत हे दुष्परिणाम होऊ नये म्हणून उपाय आहेत आणि या उपायांची माहिती आपण आता घेणार आहोत.
विविध शाळेमधून आम्ही फटाके वाजवणार नाही अशी शपथ दिवाळीची सुट्टी लागण्याआधी प्रत्येक शाळेतील शिक्षकांना प्रत्येक विद्यार्थ्यांना घेण्यास भाग पाडावे व आणि आम्ही फटाके उडवणार नाही हे शाळाशाळांमधून पटवून द्यावं.
पालकांनो मुलांना जर तुम्ही फटाके उडवत असतात फटाके खरेदी करत असतात पण तुम्हाला हे माहित आहे का हे फटाके बनवणारे हे लहान मुलंच आहेत बाल कामगार म्हणून ते काम करतात यांच्या मनावरती शरीरावरती फटाक्यांचा काय परिणाम होत असेल हे तुम्ही पाहिला आहे का याचं पण तुम्ही एकदा निरीक्षण करा मगच फटाके उडवणं किंवा फटाके खरेदी करणं हे या विषयी जागरूकता निर्माण करा.
- शासकीय कार्यालय निमशासकीय कार्यालये तसेच रुग्णालय ग्रामीण रुग्णालय शाळा त्या ठिकाणी फटाके वाजवू नये हे लक्ष द्या लक्ष द्या.
आपला पैसा वेस्ट जाऊन देऊ नका फटाके खरेदी करणे आणि पर्यावरणाला धोका निर्माण करून हे करत असताना. मी आपला पैसा वेस्ट जाऊन घेणार नाही याची काळजी घ्या एखाद्या वृद्धाश्रमास साठी दान करणार एखाद्या अनाथाश्रमात साठी तुम्ही तो पैसा दान क्यू करा किंवा त्यांना खाण्यापिण्याच्या वस्तू घेऊन द्या आरोग्यासाठी त्यांची दक्षता घ्यावी असे खूप काही तुम्ही करू शकता पैसे बेस्ट करण्यापासून तुम्ही वाचू शकत नाही.
दिवाळी म्हटलं की विविध आपल्याला आतुरता आपुलकी वाटत असते यावेळेस करणा-या मला मारीला प्रत्येकाने तोंड दिलेला आहे आणि या महामारी पासून आपल्याला जर वाचायचं असेल तर आपण एकमेकांपासून दूर राहून ही दिवाळी कशा प्रकारे साजरी करू शकतो आपल्याला हे एकमेकांपासून दूर राहून दिवाळी साजरी करावी लागेल तरच आपण या मारीला दूर ठेवू आणि महामारी पासून आपण दुर राहू
- तुम्हाला घाई पूजन करण्यासाठी घाई उपलब्ध जर झाली नाही तर तुम्ही तुम्ही घरामध्ये गाईचे चित्र काढून स्वतः गाईची पूजा करू शकतात.
- जर आपल्याकडे अभंग स्नानासाठी जर उठणे उपलब्ध नसेल तर तुम्ही खोबरेल तेलामध्ये हळद घालून म्हणून उटणे लावू शकता हे सुद्धा आरोग्याच्या दृष्टीने आपत्कालीन परिस्थितीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपण अशा चांगल्या प्रकारे अभ्यंग स्नान करून आपली दिवाळी साजरी करू शकतो.
लक्ष्मीपूजन करण्यासाठी आपल्याला विविध साहित्य लागतं आणि हे साहित्य जर आपल्याला या मामारी मुळे उपलब्ध जर झालं नाही तर आपण आपल्या घरामध्ये असणारे साखर गूळ हासुद्धा नैवद्य देऊन लक्ष्मीपूजन साजरा करू शकतो
तुळशी विवाह लावण्यासाठी जर ब्राम्हण उपलब्ध झाले नाहीत तर तुम्ही यथासांग मनापासून पूजा मांडावी आणि मनोभावे देवाला मनापासून नमस्कार करून पूजा करावी.
मराठी दिवाळी लहान निबंध भारतीय संस्कृतीचे विविध सण आहेत अनेक सणापैकी दिवाळी हा खूप मोठा सण असून महत्व असणारा एक सण आहे. बंधुता एकत्र येणे असे विविध पैलू आपल्याला सण देऊन जातोय. ज्यावेळी राक्षस यांचे भयंकर युद्ध होऊन रक्ताची लढाई झाली विजय मिळवून आयोध्याचा राजा आपल्या प्रजेकडे परतत असताना प्रजेने स्वागत केले तो उत्सव म्हणून दिवाळी साजरी केली जाते. अंधारातून प्रकाशाकडे जाण्यासाठी आपल्याला प्रेरणादायी ठरतं असते. अंधारातून प्रकाशमय होण्यासाठी विजय प्राप्त करावा लागतो अंधारावर. आपल्या आजूबाजूला विविध संबंध चांगल्या लोकांबरोबर या दिवाळी मुळे तयार होतात.
मराठी दिवाळी लहान निबंध दिवाळी सण म्हणजेच दिव्यांची आरास दीपोत्सव साजरा करणे नसून आपल्या शेजारी लोकांना समजून घेणे त्यांच्याबरोबर प्रमाणे बोलणे त्यांच्याबरोबर आपला आनंद साजरा करणे. प्रत्येकाबरोबर दिवाळी आपल्याला समजुदार दयाळू संयम असण्याचा मार्ग शिकवत असते. आपल्याला मनोभावे श्रद्धा ठेवावी मनाने विविध समजुदार पणा शिकावा या दृष्टीने दिवाळी आपल्याला खुप आनंद देऊन जातं असतो. फटाके वाजवीने हे पूर्वीपासून आलेले असले तरी आवश्यक आहे अस नाही फटाके वाजवल्यामुळे वातावरनातं विषारी वायू सोडले जातात परिणामी पर्यावरण क्षेत्रास जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. आपण सर्वांनी एकत्र येऊन स्नेह भोजन केल्याने एकमेकांना आनंद वाटता येतो स्नेह भोजन केल्यामुळे एकमेकांना आपुलकी मिळते.
दिवाळी मध्ये खरं तर फटाके वाजवूचं नयेत आपलं निसर्ग धोक्यात आपणच आणतो. सुरक्षा देणे हे खूप महत्त्व दायक आहे.आपल्याला शेजारी विविध सृष्टी आहे हे विसरून चालणार नाही सृष्टी ठिक तर आपण ठीक हे आपण ठरवलं पाहिजे. दिवाळी हा सण आपल्याला बंधू प्रेम वाढविण्यासाठी आलेला असतो. दिवाळी हा आनंदाचा उत्सव असून आपला परिसर स्वच्छ ठेवणे आपल्याचं एक पर्यावरण पुरक आदर्श असेल. आपण आपलाच परिसर उत्सवाच्या नावाखाली धोक्यात आणल्यास जिवं सृष्टी आपणाला जगवते हे लक्षात घ्या. त्यांच्या जिवाला धोका निर्माण करण्याचा अधिकार आपल्याला कोणालाच नाही.
पोशिंदा जगाचा शेतकरी
दिवाळी हा दीपोत्सव आनंदाने आनंद देऊन आनंद घेऊन विविध हर्ष उत्साह वर्धक आनंदचा एक क्षण आहे. हा क्षण होऊन गेला होता ज्यावेळी प्रभू रामाने वाईट शक्ती चा नाश करून आपल्या राज्यात जाऊन प्रजेने स्वागत केले. फटाके उडविणे फोडणे या आंनद उत्पन्न करण्याचा हेतू जरी असला तरी आपल्या आवडत्या व्यक्तींना आनंद देण्याचा दिवस सण उत्सव म्हणजे दिवाळी होय.
Essay on Diwali in Marathi, Diwali nibandh in Marathi, Majha avadta san Diwali, maza avadta san short essay in Marathi, 10 lines on Diwali in Marathi for class 3,4,5,6,7,8,9
दिवाळी या सणामुळे कुटूंब एकत्र येतात मित्र परिवार एकत्र येतात एकत्र सर्वजण झाल्यामुळे नात्यांची विण मजबूत होऊन प्रेमाचे बंधन तयार होतात. प्रत्येक जण दिवाळी निमित्त एकत्र येत असतो. प्रत्येक कामातून कुटूंबासाठी वेळ काढत असतो. कुटूंबातील सर्वांनासोबत क्षण साजरा करत असतात. दिवाळी या सणाला राष्ट्रीय सुट्टी असल्यामुळे कोणत्याही कामाची अडचण नाही चिंता नाही. मुलांना अभ्यासासाठी काळजी नाही. खूप आनंदाचे वातावरण होऊन आनंद व्यक्त करत असतात. दिवाळीची रात्र खूप प्रकाशमयं होऊन जाते आकाश कंदील हवेत सोडले जातात उंच उडताना आकाश उजळून प्रकाश चोहीकडे पसरलेला दिसून येतो. दिवाळी आपल्याला संयम समजूतदार पणा शिकविते
लहान मुले आपल्या आवडता खाद्यपदार्थ मिळवण्यासाठी बरेच दिवस दिवाळीची आतुरतेने वाट पाहत असतात. घराची स्वच्छता करण्यासाठी दिवाळी आलेले असते. आपल्या जीवनात स्वच्छता खूप महत्व असणारी आहे कल्याण आणि आरोग्य सदृड राहतं असते स्वच्छ राहणं स्वच्छ घरदार ठेवणं हा आपल्या सर्वांचा एक भाग आहे. चांगले जिवन नेहमी वाईट शक्तीवर विजय मिळवताना आपल्याला पहायला भेटतात.
दिवाळी हा सण अतिशय मोठा अनेक सणापैकी असून हा सण साजरा करत असताना खूप काळ गेला आहे. काही हिंदू पुराण कथामध्ये दिवाळी साजरी केली गेली रावण राजा राक्षसांचा रावण या राजाची हत्या करून ज्यावेळी भगवान राम आयोध्या नगरींमध्ये गेले होते.त्यावेळी आयोध्या नगरींतील लोकांनी रस्त्यावर दिव्यांची आरास लावून घरांनवर उजेड निर्माण करून स्वागत रामाचे केले. तेव्हापासून ते आजपर्यंत हिंदू लोक दिवाळी हा उत्सव दिव्यांची आरास करून साजरा करत असतात. लहान मुलांना नवीन कपडे खरेदी मिठाई खरेदी फटाके खरेदी केल्यामुळे हा उत्सव खूप आवडता व आनंदाचा लहान मुलांसाठी असतो.
Essay on Diwali in Marathi, Diwali nibandh in Marathi, Majha avadta san Diwali, maza avadta san short essay in Marathi, 10 lines on Diwali in Marathi for class 3,4,5,6,7,8,9
दिवाळी हा सण आपल्याला वाईट शक्तीचा नाश करून विजय मिळवून जिवन प्रकाशमयं करून जीवनातीला अंधाराचा नाश करता येतो हे शकवून जाते. दीपोत्सव ला आपल्या प्रत्येक घरात आनंदाचे उत्साहाने भरलेले वातावरण दिसून येते. प्रत्येक घरात प्रत्येक व्यक्ती दिवे लावण्यात साफसफाई करण्यात सजावट करण्यात मिठाई बनविण्यासं मग्न असतात.प्रत्येक घरा मध्ये फुलांची सजावट बनवलेली असते. दारीं रांगोळी काढलेली असते. या सनानिमित्त सर्व कुटुंब एकत्र झालेलं असते बहीण भाऊ यांचं प्रेमाचा प्रतिक असलेला सण असतो. नातं अधिक घट्ट होण्यासाठी भाऊ बीज हा दिवस असतो. विविध वस्तू खरेदी असते. खूप आनंदाचा वातावरण तयार झालेलं असतं सार्वजनिक सुट्टी असल्याने खूप सर्व एकत्र आलेले असतात स्नेह भोजनाचा कार्यक्रम पण होतोय. एकमेकांना भेटवस्तू वाटप करता येतात.हा एक धार्मिक अध्यात्मिक सोहळा असून संध्याकाळी सर्व वातावरण प्रकाशमयं करून टाकतं असतो.
हिंदू समुदाय मधील अनेक सणापैकी दिवाळी हा एक सण अतिशय महत्त्व असणारा असून हिंदू कालनिर्णय मधील सर्वात महत्त्व असणारी सुट्टी आहे. दिवाळी हा शब्द संस्कृत या शब्दापासून तयार झालेला असावा दिवाळी हे दीपावली या शब्दापासून बनत आहे. याचा अर्थ असा होतोय रोशांची एक पंक्ती होय. आपल्या आनंद उत्साहाने साजरा करण्यासाठी आपल्या कुटूंबाची काळजी घेण्यासाठी हा सण होय. रात्रीच्या वेळी दिव्यांची आरास प्रत्येकाच्या घरी आपल्याला पहायला भेटत असते.रांगोळी सह लाइटिंग ने घरे सजवली जातात. प्रत्येकाच्या घरी घोड धोड मधुर मिठाई बनवली जाते. शेजार्यांना नातेवाईक यांना मिठाई वाटप केली जाते किंवा त्यांना घरी जेवणासाठी बोलवलं जातं. दिव्यांचा सण असल्याने आपल्याला प्रत्येक घरी तर आरास दिव्यांची दिसतेच पण रस्त्याने आपल्याला पहायला भेटते प्रत्येक रस्ता धुतर्फा दिव्यांचा झगमगाट चालू असतो. मंदिरात दिव्यांची आरास असते सर्व वातावरण प्रकाशमयं होऊन गेलेलं असते. सर्व लोकांना एक आनंद निर्माण करण्यासाठी हा सण येतो सर्व वातावरण आनंदीमय होऊन आपल्याला पण अजून आंनद प्रेमात न्हावून घेतो. आपली संस्कृती इतरांना देखील प्रेमात पाडण्यासाठी घायाळ करत असते.
१) दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण होय.दिव्यांचा उत्सव साजरा करणे म्हणजे दीपोत्सव होय. आपलं जिवन अंधःकारातून प्रकाशाच्या दिशेने जावं म्हणजेचं आपण विजयाचे प्रतीक व्हावं.आपलं जिवन आध्यात्मिक दृष्टीकोनातून प्रकाशमय दिव्यांच्या बरोबर व्हावं.
२) दिवाळी हा सण धनत्रयोदशी यां दिवसा पासून सुरु होतो. दीपावली हा सण पाच दिवसांचा उत्सव असून लोक आपल्या घरातील सर्व स्वच्छता साफसफाई करून आपल्या लागणारे वस्तू खरेदी करत असतात.
3) दिवाळी हा सण भारतातील खूप मोठा सण होय.दिवाळी हा सण सर्व संणापैकी एक सण असून सर्व हिंदू समाजामधील महत्त्व असणारा सण आहे. काही वेगवेगळ्या प्रांता मध्ये बिगर-हिंदू समाज पण सण साजरा करताना दिसतात.
4)दिवाळी सणाला लक्ष्मी देवीची मनोभावे पुजा करतात. आपल्या सर्वांच्या जीवनात धन आणि समृद्धी मिळावी म्हणून लक्ष्मी पूजन या दिवशी देवी लक्ष्मीची पुजा मनोभावे करतात.
5) दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून अभ्यंग स्नान, ओवाळणी, फ़राळ,रंगीबेरंगी फुलांची माळांची घरांची सजावट, किल्ले -वाळूसह, रांगोळी, सजावट दिवाळीच्या सणा दिवशी मोठ्या प्रमाणात लोकांची आवडती असल्याने सर्व शुभ असल्याचे प्रतिक आहे.
1)दिवाळी यां सणाला लक्ष्मीदेवीच आपल्या घरी मनापासून स्वागत करण्यासाठी रोज सायंकाळी दिव्यांची आरास तयार करतात तसेंच इलेक्ट्रॉनिक लाइटिंग्जद्वारे घरे चकमक चकमक विविध रंग बेरंगी सजवतात.
2)दिवाळी सण साजरा करण्याचा मुख्य उत्सव लक्ष्मीपूजन कुबेर पुजन असून, मुख्य म्हणजे फटाक्यांची आतषबाजी आरास खूप मोठ्या प्रमाणावर केली जाते त्यामध्ये भुईनुळे भुईचक्र, फटाके यांची आतषबाजी खूप होतं असते.विविध खाद्यपदार्थ रेलचेल असून तोंड गोड करण्याचा हा उत्सव असून कुटूंबातील एकत्र आणण्यासाठी एक मोठा सण आहे.
3)दिवाळी हा सण जैन धर्मामध्ये भगवान महावीर यांचे अत्यंत पवित्र प्रसंग असलेले आध्यात्मिक जागरण किंवा ‘निर्वाण’ म्हणूनही साजरा करण्यात येतो. किंवा दर्शविला जातो.
4)दिवाळी हा सण शीख धर्मामधील सहावे गुरु शिख गुरु हरगोविंद जी यांची तुरुंगातुन सुटका झालेला दिवस असून तुरुंगातील सुटकेचा दिवस म्हणून लोक दिवाळी हा सण साजरा करतात.
5) दिवाळी हा सण दीपोत्सव असून अंधकारातून प्रकाशाकडे वाटचाल करण्याचा मुख्य संदेश देतो. आपलं सर्वांचे कामानिमित्त विखूरलेलं कुटुंब यां सणानिमित्त पाच दिवस एकत्र येतात. जेवणावळी होतात. मित्र परिवार एकत्र आलेला असतो. सर्व एकत्र आल्यामुळे आपल्याला बंधुता, प्रेम,एक्य यांची जाणीव होऊन एक संदेश भेटला जातो.
6) दिवाळी किंवा दीपावली हा दीपोत्सव सण संपूर्ण भारतभरात तसेच सातासमुद्रपार खूप मोठ्या उत्साहात आनंदात साजरा होणारा सर्वात खूप मोठा अनेक संणापैकी एक हिंदू सण आहे.
7) दिवाळी हा सण देशभरामध्ये हिंदू समुदाय तसेच अनेक नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी व्यावसायिक समुदायांसाठी नवीन हिंदू वर्ष सुरु होण्याची सुरुवात केली जाते.
8)दिवाळी हा सण हिंदू दिनदर्शिकेमध्ये मराठी मास 'कार्तिक' महिना दिवाळी हा दीपोत्सव अखंड देशात उत्साहात साजरा केला जातो.
9) दिवाळीचा सणाचा दुसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी असून यां दिवसाला "छोटी दिवाळी " असं देखील म्हटलं जातेय.आपले पूर्वज असणारे आपल्याकडून काही विधी चुकला असेल तर पूर्वज चुकलेल्या आत्म्यांच्या आत्मिक आध्यात्मिक सुखं समाधाना सर्व कार्यात शुभता मिळावी म्हणून प्रार्थना करण्याचा दिवस.
10)दिवाळी यां सणाचा तिसरा दिवस हा मुख्य दिवस उत्सवाचा असून आपल्या कुटूंबात घरात लक्ष्मी प्राप्ती व्हावी आर्थिक भरभराट व्हावी म्हणून आपल्या घरावर भरभराटीचे आशीर्वाद मिळवण्यासाठी भगवान लक्ष्मी आणि देवांचे अधीपती विद्येचे देवता शुभ कार्याची सुरवात करणारे गणेश यांची मनोभावे पुजा करतात.
class 1
1)दिवाळी सण हा आपल्या संस्कृतीचं प्रतिक आहे
2)दिवाळी सण म्हणजे दिव्यांचा सण होय.
3)माता गाईची सेवा करणे त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणं म्हणजे वसुबारस होय.
4) शरीर वं मन आरोग्यदायी तंदुरुस्त राहण्यासाठी अभ्यंग स्नान केले जाते.
5) आपल्यावर लक्ष्मीची कृपा सतत राहावी म्हणून लक्ष्मी पुजन केलं जाते.
6बहीण भावाचं प्रेम अतुट रहावं म्हणून भाऊ बीज हा दिवस साजरा केला जातो.
7) किल्ले बांधणे हा एक कलात्मक वेगळा प्रकार पहायला मिळतो.
8) सर्वांच्या घरासमोर रांगोळी काढली जाते.
9)घरापुढे आकाश पणती लावून दीपोत्सव साजरा केला जातो.
10) फ़राळ घमघमाट चालू असतो.
10 lines on Diwali on Marathi for Class 3
1)दिवाळी सण हा सर्व कुटूंब एकत्र आणण्याचा सण होय.
2)दिवाळी हा सण दिव्यांचा उत्सव होय.
3)दिवाळी हा सण भारतातील सर्वात महत्वाचा मोठा सण होय.
4) सुंदर रांगोळी काढणे म्हणजे दिवाळी साजरी करणे होय.
5) फटाके फोडणे पर्यावरण पुरक वापरणे म्हणजे दिवाळी साजरी करणे होय.
6) कपडे नवीन खरेदी करणे आवश्यक साहित्य खरेदी करणे म्हणजे दिवाळी होय.
7) सुंदर ओवाळीनी करणे म्हणजे दिवाळी सण होय.
8)दिवाळी साजरी करण्यासाठी खूप प्रमाणावर शाळेला सुट्टी असते.
10) दिवाळी सण हा खूप मस्त अभ्यासापासून टेंशन मुक्त म्हणून खूप खूप आवडतो.
10 lines on Diwali on Marathi for class 4
1) अंगणात रांगोळी काढून गाईची व वासराची पुजा करण्याचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस होय.
2) ईच्छा आकांशा बाळगणारा सण होय
3) दिवाळी हा सण खूप मोठया प्रमाणावर साजरा केला जातो.
4)नवीन कपडे खरेदी करणे म्हणजे दिवाळी सण होय.
5)लक्ष्मी पुजन करणे नवीन वस्तू खरेदी करणे शुभ कार्याला सुरुवात करणे म्हणजे दिवाळी सण होय.
6)मिठाई खाणे व इतरांना वाटणे म्हणजे दिवाळी सण होय.
7)सुंदर किल्ले बनविणे स्पर्धा ठेवणे पर्यावरण पुरक पर्यावरण समतोल राखणे म्हणजे दिवाळी सण होय.
8)दिवाळी हा सण मराठी महिना कार्तिक मध्ये येतो तर इंग्रजी महिना सप्टेंबर ऑकटोबर मध्ये येतो.
9)अंधारातून प्रकाशाकडे जाण्यासाठी सुरुवात म्हणजे दिवाळी होय.
10)कुटूंबातील प्रेम आपुलकी जपण्यासाठी कला म्हणजे दिवाळी होय.
10 lines on Diwali on Marathi class 5
1)दिवाळी हा सण दिव्यांचा आरास घेऊन येतो सर्वांना आनंद घेऊन आनंद वाटणारा सण होय
2)शेती पशु यांची सेवा करणे व त्यांना आदराने आपली सेवा देणे हा पहिला दिवस साजरा करतात.
3)दिवाळी हा सण पूर्ण चार दिवसांचा आहे.
4) दिवाळी सणासोबत प्रत्येक कुटुंब आपल्या जिवनातील सर्व प्रसंगाचा आनंदाचा उत्सव साजरा करतात.
5)दिवाळी सण अनेक सणापैकी एक सण असून हा हिंदू उत्सव असून व्यतिरिक्त समुदाय पण जैन, शीख आणि बौद्ध देखील साजरा करतात.
6)हिंदू दिनदर्शिकेनुसार म्हणजेच मराठी मास नुसार दिवाळी हा सण कार्तिक महिन्यातील अमावस्या या तिथीला येते.
7)दिवाळी किंवा दीपावली चा अर्थ -मातीच्या दिव्यांची रांग आहे.
8) दिवाळी सण हा कुटूंबातील प्रेम आपुलकी वाढवतो.
9)दिवाळी हा सण मिठाई करण्यासाठी खूप प्रचार युक्त आहे.
10)बहीण भाऊचं नातं घट्ट करण्याचा सण म्हणजे दिवाळी होय.
10 lines on Diwali on Marathi class 6
1)दिवाळी हा सण संपूर्ण भारतात साजरा होणारा सर्वात मोठा उत्सव आनंद आहे.
2)दिवाळी म्हणजे १ वर्ष वनवास संपून राम आयोध्य मध्ये परत गेला म्हणून आनंद व्यक्त केला जातो.
3दिवाळी सण हा दिव्यांचा उत्सव असल्याने मेणबत्त्या पेटविणे दिवे पेटविणे तसेंच रांगोळी काढून घराची सजावट करायची.
4) दिवाळीच्या दिवशी देव अधीपती गणपती यांची पुजा करणे होय.
5) देवी लक्ष्मी ची पुजा करणे होय.
6)लहान मुले दिवाळीमध्ये सण साजरा करताना मुले पर्यावरण पुरक फटाके फोडतात व आपल्या मित्र परिवारासाठी आनंद घेतात.
7) दिवाळी सणाला मिठाई हे खूप मोठे आकर्षण असून भेटवस्तु स्वरूपात मिठाई पण दिली जाते.
8 )दिवाळी हा सण मिठाई बनविण्याचा सण असून खूप मोठ्या प्रमाणात खाध्य पदार्थ बनविले जातात. मित्रांना आणि शेजार्यांना मिठाई साठी भोजन निमंत्रण दिले जाते.
9)दिवाळी सणाला राजपत्र सुट्टी असल्याने सरकारी कर्मचारी यांना सुट्टी जाहीर असते.
10) धनतेरसवर या शुभ मुहूर्त दिवाळीची बरीच खरेदी केली जाते.
10 lines on Diwali on Marathi class 7
भारत माझा देश आहे
1)दिवाळी हा सण दरवर्षी अमेरिकेतही साजरा केला जातो.अमेरिका मध्ये आपले भारतीय स्थायिक आहेत.
2)दिवाळी हा सण पश्चिम बंगाल या ठिकाणी कालीपूजा म्हणून लोकप्रिय आहे.
3) दिवाळी या शुभ महूर्तावर पंजाब या ठिकाणी असलेलं अमृतसर येथे सुवर्ण मंदिराची पायाभरणी करण्यात आली
4))दिवाळी हा सण जैन धर्मामध्ये 24 वे तीर्थकर महावीर निर्वाण प्राप्त झाले म्हणून साजरा केला जातो.
5)दिवाळी हा सण खूप मोठा असून खूप मोठया आनंदाने साजरा करतात. मनमुराद आनंद व्यक्त करतात.
6)अयोध्येतील लोकांनी प्रभू राम वनवासातून परत आले म्हणून आपल्या देवाचे स्वागत केले आणि दिवाळी साजरी केली.
7)दिवाळी सणाला लोक आपली घरे स्वच्छ करतात,सुंदर फुले व रांगोळी काढून घर सजवतात.
8)महिलावर्ग खूप हर तर्हेचे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवतात.तसेंच जेवणासाठी नातेवाईकांना आमंत्रित करतात.
9)दिवाळी सणाला लहान मुले संध्याकाळी फटाके फोडून तसेंच आपल्या मित्रांना फटाके भेट देऊन दिवाळी साजरी करतात.
10)दिवाळी हा सण अंधारातून प्रकाशाकडे जाण्यासाठी क्षण असून आपल्याला नवीन ध्येयपुर्ती ठरवतं असतो.
1)दिवाळी हा दिव्यांचा सण (दीपोत्सव सण) अनेक सणापैकी एक भारताचा धार्मिक सण आहे.
2)दीपावली दिवाळी हा उत्सव वाईट शक्तीवर विजय मिळवण्यासाठी वेगवेगळ्या कारणांमुळे प्रसंगामुळे दिवाळी जगभरात उत्सवात साजरी केली जाते.
3)दिवाळी सणाला दिव्यांची आरास, दिवे पेटविणे, फटाके फोडणे, ई सण साजरा करण्याचा एक भाग आहे.
4)दिवाळी हा सण भारतातच नव्हे तर सातासमुद्रापार हिंदू समाजात मध्ये साजरी करतातच पण इतर धर्म समुदाय पण दिवाळी साजरी करतात.
5) दिवाळी हा सण उत्सव पाच दिवसांचा सण असून या सणाला खरेदी विक्री ची उच्चाकी उलाढाल होतं असते. उदा. कपडे खरेदी, सोने चांदी खरेदी, वाहन खरेदी, मिठाई पदार्थ खरेदी.
6)हिंदू कालनिर्णय नुसार मराठी मास कार्तिक पासून 15 व्या दिवसापासून दिवाळी सणाची सुरुवात होतं असते.
7)दिवाळी हा सण इंग्रजी केलेंडर नुसार ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यापासून साजरा केला जात असतो.
8)दिवाळी दीपोत्सव उत्साहाने साजरा करण्यासाठी आनंद व्यक्त करण्यासाठी शाळा, विद्यालय, महाविद्यालय आणि सरकारी कार्यालय मध्ये कमीत कमी 5 दिवस ते जास्तीत जास्त 20 दिवसापर्यंत सुट्टी असते.
9)दिवाळी उत्सवाच्या निमित्ताने देशभरातून कुटुंब आणि मित्र परिवार एकत्र येतात खूप आनंदाने एकत्र वातावरणात दिवाळी साजरी करतात.
प्रश्न- उत्तर--- भारतीय सण दिवाळी विषयक मराठी निबंध प्रश्न उत्तर
प्रश्न 1) दिवाळी उत्सव किती दिवसांचा असतो?
उत्तर - दिवाळी हा सण 5 दिवसांचा साधारण असतो.
प्रश्न 2) दिवाळी उत्सवाला सुट्टी कोणाकोणाला असते?
उत्तर -शाळा, विद्यालय,महाविद्यालय सरकारी कार्यालय यांना सुट्टी दिवाळी निमित्त असते.
प्रश्न -3) कार्तिक महिन्यात कोणता सण साजरा केला जातो.
उत्तर - कार्तिक महिन्यात दिवाळी दीपोत्सव हा सण साजरा केला जातो.
प्रश्न -4)दिवाळी हा सण कोणता सण आहे.
उत्तर -दिवाळी हा सण धार्मिक आध्यत्मिक सण आहे.
प्रश्न -5)दिवाळी कोणकोणत्या स्वरूपात साजरी केली जाते.
उत्तर - दिवाळी सणाला फटाके उडविणे, किल्ले बांधणे, नवीन कपडे खरेदी करणे, मिठाई बनविणे वाटणे, घर सजविणे, रांगोळी काढणे या स्वरूपात दिवाळी साजरी केली जाते.
1) दिवाळी हा दीपोत्सव सणाला दीपावली सुद्धा बोलले जाते. दिवाळी सणाला धार्मिक आध्यत्मिक वारसा लाभलेला आहे. असुर यांच्या हत्याचा विजय म्हणून साजरा केला जातो.
2)दिवाळी साजरी करण्यासाठी वेगवेगळे उत्सव साजरा करतात उत्तर भारत देशामध्ये राम वनवासातून परत आयोध्ये मध्ये आले म्हणून साजरा करतात तर दक्षिण भारतामध्ये भगवान श्रीकृष्ण यांनी नरकासुरु यांची हत्या केली म्हणून दिवाळी साजरी केली जाते.
3) दिवाळी साजरी करण्यासाठी मुळं संकल्पना वाईट शक्तीवर चांगला विजय प्राप्त व्हावा अंधारापेक्षा प्रकाशाचा विजय म्हणून साजरा केला जातो दिवाळी उत्सव.
4)दिवाळी हा सण पाच दिवसांचा सण असून देवी लक्ष्मी प्रत्येकाच्या जीवनात प्रवेश करावा धनतेरस हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी शुभ मुहूर्त असल्यामुळे सोने खरेदी करणे महत्त्व आहे. हिंदू समुदाय मध्ये देवी लक्ष्मी प्रगती संपत्ती, समृद्धी यांचं प्रतिक मानलं जाते.
5)दिवाळी हा उत्सव आनंदाने उत्साहाने साजरा करतातच सोबत कुटुंब एकत्र येऊन गोड धोड जेवण बनवून एकमेकांना जेवणाचं निमंत्रण दिले जाते. घर सजावट, खरेदी मिठाई, भेटवस्तू या स्वरूपात सुद्धा दिवाळी साजरी केली जाते.तसेंच सर्वधर्म समभाव सुद्धा दिवाळी आपल्याला चालना देते. हिंदू नव्हे तर इतर समुदाय पण दिवाळी साजरी करतात. उदा. शिख, मुस्लिम, ख्रिश्चन.
प्रश्न उत्तर -दिवाळी सणाविषयी निबंध दिवाळी निबंध लेखन करताना इयत्ता सहावी सातवी वर्गासाठी प्रश्न उत्तरे
प्रश्न 1)सर्वधर्म समभाव आपल्याला कोणता सण संदेश देऊन गेला?
उत्तर -दिवाळी हा सण आपल्याला समुदाय मध्ये समभाव हा संदेश देऊन जातो.
प्रश्न 2)दिवाळी हा सण कोणत्या स्वरूपात साजरा केला जातो.
उत्तर -दिवाळी हा सण दीपोत्सव साजरा करतात.
प्रश्न 3)धार्मिक आध्यात्मिक वारसा कोणत्या सणाला लाभलेला आहे.
उत्तर -दिवाळी या सणाला धार्मिक अध्यात्मिक वारसा लाभलेला आहे.
प्रश्न 4) दिवाळी या सणाला धनतेरस या दिवसाचं महत्त्व काय ?
उत्तर -धनतेरस या दिवसाला लक्ष्मी देवीची आपल्या वर कृपा राहावी म्हणून सोने खरेदी केले जाते.
प्रश्न 5)दिवाळी साजरी कां केली जाते.
उत्तर - अंधारावर विजय मिळवावा वाईट शक्तीवर विजय प्राप्त व्हावा म्हणून दिवाळी साजरी केली जाते.
1)दिवाळी हा सणाला खूप मोठ्या प्रमाणावर फटाके उडविले जातात. फटाके उडविल्यामुळे वायू प्रदूषण तसेच ध्वनी प्रदूषण होऊन पर्यावरण धोका निर्माण होताना दिसतो. भारतात सर्वोच्च न्यायालय विभागाने फटाके बंदी आदेश जारी केले आहेतदिवाळी या उत्सवाच्या काही टिकां सुद्धा उत्त्पन्न होऊ लागल्या आहेत. फटाके जिथे तयार केले जातात तिथे कारखानदारीं मध्ये बाल श्रम प्रोत्साहन खूप मोठ्या प्रमानावर केले जाते.
उदा. तामिळनाडू या ठिकानामधील काही प्रदेश फटाके बनविण्याचे कारखाने आहेत.दिवाळी हा उत्सव साजरा करण्यासाठी पर्यावरण पुरक फटाके वाजविणे तसेच जेवणावळी बनविणे कुटूंबातील एकत्र गप्पा मारणे होय.
2) रामायण दिवाळी साजरी करण्यासाठी आपल्याला कल्पना देते. राम वनवासातून आयोध्या नगरीत आले तो दिवस दिवाळी साजरी करण्यात येतो.
3)शिख समुदाय आपल्या गुरूंची 10 वे गुरु गुरु गोविंदसिंह यांची तरुंगातुन सुटका झाली म्हणून दिवाळी हा सण साजरा करतात.
4) उत्तर दक्षिण पुर्व पश्चिम या भागामध्ये दिवाळी हा सण आपल्याला आनंद मिळावा पुढील कार्याला गती मिळावी या हेतूने साजरा करतात.
5)दिवाळी हा उत्सव देशभरातून कोट्याधीश बनवून जातो. कोरोडो लोकांना सुखं समृद्धी देणारा सण म्हणून ओळख निर्माण केलेली आहे.
प्रश्न उत्तर - इयत्ता 9,10,11,12 या वर्गासाठी स्पर्धा परीक्षा
प्रश्न क्र.1) फटाके उडविल्या मुळे कोणकोणते प्रदूषण होते
उत्तर -फटाके उडविल्यामुळे वायू प्रदूषण ध्वनी प्रदूषण पर्यावरण धोका निर्माण होतो.
प्रश्न -2) कोणत्या विभागाने फटाके बंदी आदेश जारी केले आहेत.
उत्तर - न्याय विभागाने भारतात सर्वोच्च न्यायालय विभाग यांनी आदेश जारी केले आहेत.
प्रश्न क्र.3) दिवाळी या उत्सव टीकात्मक कां होऊ लागला
उत्तर -दिवाळी या उत्सवाला फटाके जास्त प्रमाणात उडविले जातात परिणाम असा होतोय पर्यावरण वर वायू प्रदूषण होतोय.
प्रश्न क्र.4) कोणाची सुटका दिवाळीच्या वेळी झाली होती.
उत्तर -शिख गुरु गुरुगोविंदसिंह यांची सुटका तुरुंगातुन दिवाळीच्या वेळी झालेली होती. त्यामुळे विजयाचा उत्सव म्हणून दिवाळी साजरी केली जाते.
प्रश्न क्र.5) दिवाळी हा सण आपल्याला कोणती ओळख देऊन जातो?
उत्तर -दिवाळी हा सण सर्व लोकांना कोट्याधीश करून जातो सर्वांना सुखं समृद्धी देऊन जातो.
मराठी निबंध
आपण कांय शिकलो -
भारतीय सण दिवाळी या मराठी निबंध मधून आज
1)दिवाळी
6)फटाके वाजविणे विषयी स्तुत्य धोरण
23)इयत्ता नववी, दहावी, अकरावी बारावी या वर्गासाठी भारतीय सण दिवाळी मराठी निबंध साठी पाच ओळी.
सविस्तर माहिती पाहिलेली आहे आपण आगामी होणाऱ्या पहिली ते बारावी वर्ग तसेंच स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सर्व विध्यार्थी वर्गाला उपयोगी पडेल तुम्ही निबंध या विषयावर घवघवीत यशस्वी होऊ शकता . तुमची मराठी निबंध विषयावर कमांड तयार करू शकतात.
चालू स्तिथीला दिवाळी साजरी करण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीला पराभव करून योग्य प्रगती पथ तयार करून विशिष्ट वेळी आपण विजय प्राप्त करू शकतो..
संपर्क फॉर्म.
Marathi Essay Topics : मित्रांनो आपल्या शाळा कॉलेजांमध्ये निबंध लेखन हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. वेगवेगळ्या विषयांवर Marathi Nibandh lekhan करायला सांगितले जाते, म्हणूनच आम्ही येथे देत आहोत 100+ मराठी निबंध विषय. हे सर्व निबंध मराठी भाषेतील तज्ञ मंडळी द्वारे अतिशय सोप्या भाषेत लिहिलेले आहे. आम्हाला आशा आहे की हे निबंध आपण सर्वाच्या नक्कीच उपयोगात येतील.
आमच्या या वेबसाईट वर विविध विषयावरील मराठी निबंध आणि भाषणे उपलब्ध आहेत. प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यासाठी हे निबंध उपयुक्त आहेत. म्हणून जर तुम्हाला केव्हाही मराठी निबंध किंवा मराठीतील इतर माहिती लागली तर आपण bhashanmarathi.com या आमच्या या वेबसाईट वर भेट देऊ शकतात.
या लेखात आम्ही https://www.bhashanmarathi.com/ वर असलेले सर्व निबंध एकत्रित केलेले आहेत. म्हणून जर आपणास कोणताही मराठी निबंध (Marathi Nibandh) आवश्यक असेल तर आपण त्याला या page वर प्राप्त शकाल.
या पोस्ट मध्ये दिलेले marathi essay topics पैकी मध्ये आपण एखादा नवीन निबंध पाहू इच्छित असाल तर आम्हाला कमेन्ट करून सांगा, म्हणजे आम्ही लवकरात लवकर त्यावर निबंध उपलब्ध करून देऊ.
sir,khup chaan lihita apan. current affairs var pan essays lihaal tar faida hoil amhala. jase online shikshan : shaap ki vardan, shaaletil shikshan ki online shikshan, corona, social distancing etc.
Sir khup छान lihita Your Great sir
Ho kharach tumhi essay khup chan lihita thank you so much sir
this essays are very very helpful for us ... its help mi in ma diwali hw its save ma time .. thank you so much sir .
Ha eassy mla khup avadla khup bhari lihtos
Bhaari ahet majhe 8 mark purna bhetle nibandha lihilya war thank you so much ajun corona warti ek nibandha saperate dya pls
Thanks for all essays I use them for my holiday hw it save my time THANK YOU SO MUCH 😘
आपण खरोखर खूप सुंदर निबंध लिहिलेले आहेत. आमच्या शाळेत ज्या निबंध स्पर्धा होतात त्यावेळी मुले यातील refrenace घेत असतात.दहावीत शिकणाऱ्या मुलांची निबंध लेखनाची भीती आपल्या निबंधांमुळे कमी झाली आहे.
IMAGES
VIDEO
COMMENTS
Short Essay On Diwali In Marathi - (200 शब्द ) दिवाळी निबंध मराठी. दिवाळी हा हिंदूंचा अतिशय लोकप्रिय आणि महत्त्वाचा सण आहे. दिवाळी हा आपल्या भारतात साजरा ...
Short Essay on My Favourite Festival Diwali in Marathi दिवाळी हा एक हिंदू सण आहे जो जैन, शीख आणि बौद्ध देखील साजरा करतो.
दिवाळी वर १० ओळीत मराठी निबंध 10 Line On Diwali In Marathi. १) दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. २) दिवाळी हा भारतात साजरा होणारा सर्वात मोठा उत्सव आहे. ३ ...
Diwali Essay in Marathi, दिवाळी निबंध मराठी, सर्व प्रथम, हे समजून घ्या की भारत हा सणांची भूमी आहे. तथापि, कोणताही सण दिवाळीच्या जवळ येत नाही. हा नक्कीच भारतातील सर्वात ...
माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी essay on diwali in marathi :- दिवाळी हा संपूर्ण भारत देशात साजरा केला जाणारा सर्वात मोठा सण आहे. विशेष बाब म्हणजे हा सण
Essay On Diwali in Marathi: प्राचीन काळापासून सणांची भव्य परंपरा भारतात चालत येत आहे. घराचा दिवा पेटविणारी दीपावली किंवा दिवाळी खरोखरच भारतीय उत्सवांची राणी आहे.
3 Diwali Essay in Marathi 10 Lines - संच ३ 4 माझा आवडता सण दिवाळी निबंध 10 ओळी - संच ४ दिवाळी निबंध 10 ओळी - संच १
शाळेतील मुलांसाठी 10 ओळी निबंध (diwali essay in marathi 10 lines) !माझ्या तर्फे दिवाळीच्या सर्वांना भरभरून हार्दिक शुभेच्छा! दिवाळी 2022हा एक दिव्यांचा सण ...
दिवाळी निबंध (Marathi Essay on Diwali) दिवाळी किंवा दीपावली हा दीपोत्सव हिंदूंच्या प्रमुख सणां पैकी एक आहे. या सणाला घराजवळ लहान दिवे लावले जातात ...
आजच्या या लेखाद्वारे आम्ही आपल्यासोबत 4 उत्तम Diwali Essay in Marathi - दिवाळी निबंध मराठी शेअर करीत आहोत.या लेखात देण्यात आलेले दिवाळी चे निबंध 100
माझा आवडता सण दिवाळी लहान निबंध - Short Essay on My Favourite Festival Diwali in Marathi; Maza Avadta San Diwali Yavar Nibandh - माझा आवडता सण दिवाळी या विषयावर निबंध मराठी (लहान निबंध)
माझा आवडता सण दिवाळी १० ओळी मराठी निबंध | Maza Avadta San Diwali nibandh marathi 10 lines. 1.दिवाळी हा भारतातील अत्यंत लोकप्रिय सण आहे. माझा आवडता सण हा दिवाळी आहे. 2 ...
दिवाळी वर मराठी निबंध, Essay on Diwali in Marathi. भारत हा सणांचा देश मानला जातो. या सर्व सणांमध्ये होली, दिवाळी, दसरा, नवरात्री हे प्रमुख सण आहेत.
दिवाळी मराठी निबंध. Diwali Nibandh Marathi: दिवाळी हा भारतातील एक प्रमुख हिंदू सण आहे. हा उत्सव देशभरात हिंदूंनी असमान उत्साहाने व आनंदाने साजरा ...
चला तर मग सुरूवात करूया निबंधाला. diwali-nibandh-in-marathi. निबंध 1 (350 शब्दात) भारत हा सण व उत्सवांचा देश आहे आणि प्रत्येक समाज सण व उत्सवांच्या ...
माझा आवडता सण दिवाळी माहिती। Maza Avadta San Diwali Nibandh Marathi. maza avadta san essay in marathi: दिवाळी हा सण आपल्या देशात साजऱ्या केल्या जाणाऱ्या सणामध्ये सर्वात मोठा सण आहे.
short essay in Marathi about Diwali - 56563309
Essay on Diwali in Marathi | माझा आवडता सण दिवाळी | निबंध | Short Essay on Diwali in Marathi with RangoliPlease take a moment to Like & Subscribe https ...
आपल्या देशात खूप सण साजरे केले जातात आणि त्या मधे माझा सर्वात आवडता सण आहे दिवाळी. नमस्कार मित्रांनो आज आपण माझा आवडता सण दिवाळी मराठी निबंध , Maza Avadta San Essay In ...
Diwali essay in Marathi, नमस्कार मित्रांनो 🙏 आपण आज ह्या लेखामध्ये Diwali Essay in Marathi म्हणजेच दिवाळी निबंध मराठी याबाबत चर्चा करणार आहोत.
Essay on Diwali in Marathi वरील माहिती आपण भारतीय दिवाळी सण या निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तुम्ही येणाऱ्या ... maza avadta san short essay in Marathi, 10 lines on Diwali in Marathi for class 3,4,5,6,7,8,9 ...
Short essay in Marathi about Diwali See answers Advertisement Advertisement prince7064skvjjn prince7064skvjjn Explanation: दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मी, सरस्वती आणि गणपतीची पूजा केली जाते. दिवाळीच्या दिवशी ...
वेगवेगळ्या विषयांवर Marathi Nibandh lekhan करायला सांगितले जाते, म्हणूनच आम्ही येथे देत आहोत 100+ मराठी निबंध विषय. हे सर्व निबंध मराठी भाषेतील ...